शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST

पुणे : लॉकडाऊनच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मोठ्या व्यक्तींचे, तर ‘ऑनलाईन स्कूल’मुळे लहानग्यांचे घरातील वास्तव्य वाढले आहे. परिणामी, स्क्रीनटाइमही ...

पुणे : लॉकडाऊनच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मोठ्या व्यक्तींचे, तर ‘ऑनलाईन स्कूल’मुळे लहानग्यांचे घरातील वास्तव्य वाढले आहे. परिणामी, स्क्रीनटाइमही वाढला आहे. टीव्हीसमोर बसून जेवणे, मोबाईलवर गेम खेळता खेळता नाश्ता असे चित्र घरोघरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे, पोटदुखी, मलावरोध असे पोटाशी सबंधित विकारही वाढले आहेत.

सकाळच्या वेळेत मुलांची ऑनलाईन शाळा असते. चार-पाच तास अभ्यास करून मुले कंटाळलेली असतात. अभ्यासामुळे आलेला शीण घालवण्यासाठी विरंगुळा म्हणून मुले टीव्ही पाहत किंवा मोबाईलवर गेम खेळत दुपारचे जेवण करतात. म्हणजे पुन्हा स्क्रीनसमोरच वेळ जातो. आपण किती आणि काय खात आहोत, याकडे लक्ष नसते. पालकही दिवसभर कॉम्प्युटरवर काम केल्यावर रात्रीचे जेवण टीव्ही पाहत करतात. अर्धे लक्ष टीव्हीत असल्याने अन्नाचे घास पूर्ण चावले जात नाहीत. बरेचदा अन्न नुसते गिळले जाते. त्यामुळे अपचनाचा त्रास उद्भवतो. अन्न नीट न चावता खाल्ल्याने पोट फुगते, आतड्याशी संबंधित विकार उद्भवतात. अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रासही होतो. पित्ताशयात खडे होऊ शकतात. पोटदुखीचा त्रास होत असल्यास दुखणे अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.

---------

अन्न पचण्याची प्रक्रिया तोंडापासूनच सुरू होते. अन्न नीट न चावता गिळल्यास अपचनाचा त्रास सुरू होतो, पित्त वाढते. वारंवार पोटदुखी उद्भवते. त्यामुळे जेवताना स्क्रीनसमोर न बसण्याची शिस्त कुटुंबाने पाळायला हवी. एकमेकांशी गप्पा मारत जेवल्याने वेळेचा सदुपयोग होतो.

- डॉ. नचिकेत दुबळे, पोटविकारतज्ज्ञ

----------

अन्न चावून खाल्ल्याने दात मजबूत होतात, भूक वाढते, अन्न पचते आणि त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात. शरीराशी संबंधित बहुतांश आजार हे पोटाशी आणि पचनाशी संबंधित असतात. बरेचदा टीव्ही पाहत जेवल्याने अतिरिक्त अन्न पोटात जाते आणि वजन वाढते. अपचन झाले की अॅसिडीटीचा त्रास होतो. अॅसिडीटी वारंवार होत राहिली तर आतड्याचा किंवा पोटाचा अल्सरही होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने जेवणे टाळावे.

- डॉ. निमिष देशपांडे, कन्सल्टिंग फिजिशियन

------

पालकांचे काय म्हणणे?

मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. त्यांचा जंक फूडकडील कल वाढला आहे. पोळी-भाजी खायची म्हटली की मुले नाक मुरडतात. मग मुलांनी सर्व भाज्या खाव्यात म्हणून पालक मुलांना टीव्ही लावून देतात. पण अशा पद्धतीने जेवल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही आणि शरीराचे व्यवस्थित पोषणही होत नाही. मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे पालकांनी लहानपणापासून मुलांना स्क्रीनसमोर न बसता पूर्ण लक्ष देऊन जेवणाची सवय लावावी, पौष्टिक आहाराचे महत्त्व समजून सांगावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

------

पोटविकार टाळायचे असतील तर....

* अन्न चावून खावे आणि हळूहळू खावे.

* वेळच्या वेळी आणि प्रमाणात आहार घ्यावा.

* आहारात पालेभाज्या, सॅलड, कच्च्या भाज्या, कडधान्ये, ताक अशा पदार्थांचा समावेश असावा.

* जेवताना पाणी पिऊ नये.

* उभ्याने जेवू नये, बसून जेवावे.