शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

साखरेला आधारभूत किंमत द्यावी

By admin | Updated: October 1, 2015 00:54 IST

उसाला एफआरपीप्रमाणे बाजारभाव देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेला आधारभूत किंमत द्यावी, या मागणीचा ठराव रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या

न्हावरे : उसाला एफआरपीप्रमाणे बाजारभाव देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेला आधारभूत किंमत द्यावी, या मागणीचा ठराव रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.न्हावरे येथे कारखान्याची २४ वी वार्षिक सभा अध्यक्ष अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके, माऊली काळे, विजय मोकाशी, खासेराव घाटगे, कुंडलीक शितोळे उपस्थित होता.कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांनी स्वागत केले. त्यानंतर गतवर्षी दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पवार म्हणाले, कारखान्याची आगामी गळीत हंगामाची एफआरपी २२७७ रुपये इतकी असून, साखरेचे भाव असेच राहिल्यास ही रक्कम शासकीय अनुदानाशिवाय देणे अशक्य आहे. तरीदेखील कारखान्याच्या प्रत्येक खर्चात काटकसर करून शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळवून देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा राहील. सध्याच्या काळात साखर कारखानदारी फार मोठ्या आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत आहे. राज्यामध्ये एकही साखर कारखाना असा नाही की ज्याने एफआरपीसाठी कर्ज घेतले नाही.घोडगंगाने २०१३-१४ व १४-१५ या दोन्ही हंगामाची एफआरपी देण्यासाठी चाळीस कोटी रुपये कर्ज काढले आहे. सध्याच्या काळात साखर कारखानदारीसमोर असलेल्या आर्थिक अडचणी विचारात घेऊन या कर्जाचे शासनाने अनुदानात रुपांतरित करावे. एफआरपीची रक्कम देताना प्रत्येक कारखान्यास मागील हंगामाच्या साखर उताऱ्याचा निकष लावला जातो. परंतु काही कारखान्यांकडे को-जन, आसवणी प्रकल्प असले, तरी त्यांची एफआरपी साखर उताऱ्याच्या निकषामुळे सहप्रकल्प नसलेल्या कारखान्याइतकीच आहे. घोडगंगाकडे फक्त सध्या आसवणी प्रकल्पच आहे. अशा परिस्थितीत सर्व सहप्रकल्प असणाऱ्या कारखान्यांशी घोडगंगाला एफआरपी देताना आज स्पर्धा करावी लागत आहे, असे पवार म्हणाले.कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजीराव पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन करुन सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. मागील सभेचा इतिवृत्त व विषयपत्रिकेवरील पहिले तेरा विषय सभासदांनी पंधरा मिनिटांतच एकमताने मंजूर केले. देशामध्ये उत्पादित होणाऱ्या साखरेच्या २८ टक्के साखर घरगुती वापरासाठी, तर उर्वरित ७२ टक्के साखर विविध उद्योगधंद्यांसाठी वापरली जाते. शासनाने घरगुती वापरासाठीच्या साखरेसाठी ३० रुपये, तर औद्योगिक वापरासाठीच्या साखरेचा दर ५० रुपये ठरवावा, असा ठराव शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घाटगे यांनी केंद्र व राज्य सरकारवर खरमरीत टीका करत आक्रमकपणे मांडला. या ठरावाला सभासदांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून हात उंचावून एकमुखी मंजुरी दिली.सी. रंगराजन समितीच्या अहवालातील शिफारशी शासनाने मान्य कराव्यात. या शेतकरी संघटनेच्या शरद गद्रे व घाटगे यांनी मांडल्या ठरावाला सभेने तत्काळ मान्यता दिली.सभेच्या कामकाजातील चर्चेत दिगंबर फराटे, विजय कोंडे, भरत चोरमले, काकासाहेब खळदकर, आंबुजी बोरकर, अशोक शितोळे आदींनी सहभाग घेतला. सभेचे सूत्रसंचालन मंगेश ढवळे यांनी, तर आभार कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी यांनी मानले. (वार्ताहर)