शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचा पाणीप्रश्न सुटणार

By admin | Updated: October 9, 2016 04:17 IST

शहरातील पाणीटंचाईची समस्या नवीन साठवण तलावामुळे सुटली आहे. जवळपास ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावामुळे टंचाईच्या काळातदेखील

बारामती : शहरातील पाणीटंचाईची समस्या नवीन साठवण तलावामुळे सुटली आहे. जवळपास ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावामुळे टंचाईच्या काळातदेखील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुरेल, इतका पाणीसाठा होत आहे. या तलावात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करून तालुक्यातील दुष्काळी गावांनादेखील याच तलावातील पाणी देणे शक्य झाले. तलावाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर दि. ११ रोजी केले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी दिली. नगरपालिकेने यापूर्वी १२७ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला. त्यानंतर जुन्या माती तलावाच्या जागेत ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेचा तलाव २०१२मध्ये बांधण्यास सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी तलाव बांधून पूर्ण झाला. पाणीटंचाईच्या काळात पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन दिले. नीरा डावा कालव्यावर आधारित हा तलाव पूर्ण झाला. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ टळली होती. पिण्याच्या पाण्याबाबत बारामती शहर स्वयंपूर्ण झाले आहे. विहिरीचे पाणी ते अद्ययावत जलशुद्धीकरणाने युक्त साठवण तलावामुळे पाणीटंचाई दूर झाली आहे. यापूर्वी ७३ दशलक्ष लिटर क्षमतेचे साठवण तलाव होते; त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागे. केंद्र शासनाच्या पायाभूत सुविधा विकास योजना, राज्य सरकारच्या सुजल निर्मल योजनेअंतर्गत पहिला १२७ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला.त्यानंतर ३५५ दशलक्ष लिटरचा तलाव बांधण्यात आला आहे. त्यासाठी ४९ कोटी रुपये खर्च आला आहे. या तलावाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होईल. नीरा डावा कालव्याचे आवर्तन साधारणत: ४५ दिवसांचे असते. त्यामुळे टंचाईच्या काळातदेखील सलग २ महिने बारामतीकरांना पाणी देणे शक्य झाले आहे. वाढीव हद्दीत जळोची पाणी योजना, खंडोबानगर, तांदूळवाडीच्या योजना आहेत. त्याचबरोबर माळेगावची पाणीपुरवठा योजनादेखील नगरपालिकेच्या ताब्यात येणार आहे. याशिवाय, बारामतीच्या सर्व भागासाठी पाणीपुरवठा बृहत् बारामती पाणी योजनेचा आराखडा केला आहे.- योगेश जगताप;नगराध्यक्ष