शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

बारामतीचा पाणीप्रश्न सुटणार

By admin | Updated: October 9, 2016 04:17 IST

शहरातील पाणीटंचाईची समस्या नवीन साठवण तलावामुळे सुटली आहे. जवळपास ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावामुळे टंचाईच्या काळातदेखील

बारामती : शहरातील पाणीटंचाईची समस्या नवीन साठवण तलावामुळे सुटली आहे. जवळपास ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावामुळे टंचाईच्या काळातदेखील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुरेल, इतका पाणीसाठा होत आहे. या तलावात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करून तालुक्यातील दुष्काळी गावांनादेखील याच तलावातील पाणी देणे शक्य झाले. तलावाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर दि. ११ रोजी केले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी दिली. नगरपालिकेने यापूर्वी १२७ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला. त्यानंतर जुन्या माती तलावाच्या जागेत ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेचा तलाव २०१२मध्ये बांधण्यास सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी तलाव बांधून पूर्ण झाला. पाणीटंचाईच्या काळात पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन दिले. नीरा डावा कालव्यावर आधारित हा तलाव पूर्ण झाला. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ टळली होती. पिण्याच्या पाण्याबाबत बारामती शहर स्वयंपूर्ण झाले आहे. विहिरीचे पाणी ते अद्ययावत जलशुद्धीकरणाने युक्त साठवण तलावामुळे पाणीटंचाई दूर झाली आहे. यापूर्वी ७३ दशलक्ष लिटर क्षमतेचे साठवण तलाव होते; त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागे. केंद्र शासनाच्या पायाभूत सुविधा विकास योजना, राज्य सरकारच्या सुजल निर्मल योजनेअंतर्गत पहिला १२७ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला.त्यानंतर ३५५ दशलक्ष लिटरचा तलाव बांधण्यात आला आहे. त्यासाठी ४९ कोटी रुपये खर्च आला आहे. या तलावाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होईल. नीरा डावा कालव्याचे आवर्तन साधारणत: ४५ दिवसांचे असते. त्यामुळे टंचाईच्या काळातदेखील सलग २ महिने बारामतीकरांना पाणी देणे शक्य झाले आहे. वाढीव हद्दीत जळोची पाणी योजना, खंडोबानगर, तांदूळवाडीच्या योजना आहेत. त्याचबरोबर माळेगावची पाणीपुरवठा योजनादेखील नगरपालिकेच्या ताब्यात येणार आहे. याशिवाय, बारामतीच्या सर्व भागासाठी पाणीपुरवठा बृहत् बारामती पाणी योजनेचा आराखडा केला आहे.- योगेश जगताप;नगराध्यक्ष