शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
4
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
5
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
6
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
7
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
8
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
9
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
10
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
11
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
12
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
13
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
14
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
15
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
16
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
17
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
18
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
19
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
20
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

बारामती उपविभाग : १७.७५ टक्के पेरण्या

By admin | Updated: July 7, 2015 02:48 IST

बारामती उपविभागामध्ये खरीप हंगामाच्या १७.७५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता; मात्र जूनअखेर

बारामती : बारामती उपविभागामध्ये खरीप हंगामाच्या १७.७५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता; मात्र जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने समाधानकारक पेरण्या झाल्या नाहीत. येत्या दोन ते तीन दिवसांत बारामती उपविभागात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. खरीप वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. बारामती कृषी उपविभागामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यांचा समावेश आहे. उपविभागाच्या शुक्रवारच्या (दि. ३) अहवालानुसार दौंड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ५.३५ क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. तर बारामती तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ३८.५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र सरासरीच्या तुलनेत अद्याप पेरण्या कमी आहेत. इंदापूर आणि पुरंदरमध्येही खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांत अनुक्रमे ८.८९ आणि ७.६८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.बारामती, इंदापूर आणि पुरंदरमध्ये प्रामुख्याने खरीप हंगामात बाजरीच्या पेरण्या होतात. बारामती तालुक्यात बाजरीच्या ९१.६९ क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, तर इंदापूर आणि पुरंदरमध्ये ७.६९ व १०.३१ टक्के क्षेत्रावर बाजरीच्या पेरण्या झाल्या आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती भागात प्रामुख्याने खरिपाचा हंगाम घेतला जातो. मात्र या परिसरात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आहे त्या पावसावर येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार पेरण्या झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. बारामतीच्या जिरायती भागात मागील चार वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती आहे. खरिपाच्या जीवावरच येथील अर्थकारण चालते. त्यामुळे हा खरीप हंगाम तरी हाताशी लागावा असा धावा येथील शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)सुपे : सुपे परिसरामध्ये खरिपाच्या काही पेरण्या खोळंबल्या आहेत. तर, काही भागांत झालेल्या पेरण्या पावसाअभावी वाया जाण्याच्या भीती आहे. त्यामुळे येथील बाजार पेठेवरही परिणाम झाला आहे. पंधरवड्यापूर्वी झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या सुमारे ६५ टक्के पेरण्या पूर्ण केलेल्या आहेत. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. या भागातील शेतकऱ्यांनी मागील पावसावर बाजरी, हळवी कांदा, जनावरांचा हिरवा चारा, मूग आदी पिके घेतली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्याला एकरी साडेतीन ते चार हजार रुपये मशागतीसाठी खर्च आला. पावसाअभावी हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने खरीप पिकासाठी एकरी साडेतीन ते चार हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कोळोलीचे ज्येष्ठ शेतकरी संपतराव काटे, पानसरेवाडीचे यादव कुदळे यांनी केली आहे. बोरकवाडी येथील शेतकऱ्यांनी बाजरी, हळवी कांदा आदी पिके घेतली आहेत. मात्र, मागील आठवड्यापासून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे पिकांची ओल कमी होऊ लागली आहे. तसेच दररोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे खरीप पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती बोरकवाडी येथील शेतकरी मधुकर बोरकर यांनी दिली. बारामतीचे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी यामध्ये खरीप पिके वाचविण्यासाठी पिकांवर डीएएफ फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.