शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

बारामती, दौंडचे पाणी गेले खोल !

By admin | Updated: April 2, 2015 05:54 IST

जिल्ह्यात सर्वत्र कडक उन्हाळा जाणवू लागला असून, गावा-गावांत पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. ५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

बापू बैलकर, पुणेजिल्ह्यात सर्वत्र कडक उन्हाळा जाणवू लागला असून, गावा-गावांत पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. ५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत मार्च महिन्यात केलेल्या पाहणीनुसार बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, शिरूर , मावळच्या पाणीपातळीत १ मीटरपर्यंत घट झाली आहे. यावर्षी अवकाळीने ही पातळी स्थिरावण्यास थोडासा दिलासा मिळाला असला तरी उन्हाळ््यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल पातळीचा अभ्यास करण्यासाठी वर्षातून चार वेळा जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर/ आॅक्टोबर महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. यासाठी जिल्ह्यात १९२ निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. आॅक्टोबरमधील पाणीपातळी व मागील पाच वर्षांतील पाणीपातळी, तसेच पर्जन्यमानातील घट वा वाढ याचा शास्त्रीय अभ्यास करून संभाव्य पाणीटंचाई अहवाल केला जातो. यानुसार आंबेगाव, भोर, जुन्नर, खेड, पुरंदर, मुळशी व वेल्हा या सात तालुक्यांतील भूजलपातळीत घट झाली नसल्याचे दिसून आले आहे. तर बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, शिरूर, व मावळ तालुक्यात 0 ते १ मीटर भूजलपातळीत घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील भूजलपातळीचा सरासरी अभ्यास केला असता यंदा 0.१0 मीटरर्सने घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे यावर्षी भूजलपातळीला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तवली आहे.