शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतीच्या जागतिक दर्जा स्टार्टअप्ससाठी बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 20:46 IST

शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल.

ठळक मुद्देनीती आयोगाची घोषणा, जगातील शास्त्रज्ञांचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारनीती आयोगाच्या सेंटरसाठी देशातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर

बारामती : शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअप्ससाठी देशात एकमेव बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड नीती आयोगाने केली आहे. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमार्फत सन २०१७-१८ साठी भारतातील ७२ सेंटरची घोषणा शुक्रवारी (दि. ४) निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यकारी संचालक रमणन रामानाथन यांनी केली. त्यामध्ये ही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता शेतकरी ते कृषिउद्योजक वाटचाल सहजपणे होणार आहे. शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल.आयोगाच्या घोषणेमुळे हे महाविद्यालय आता शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे उद्योगामध्ये रुपांतरित करणारे जागतिक दर्जाचे  केंद्र बनणार आहे. ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी व स्वच्छतेत आयोगास देशभरात १०० जागतिक दर्जाची केंद्रे उभारायची आहेत. त्यामधील ७२ केंद्रांची निवड निती आयोगाच्या निवड समितीने केली. या केंद्रांमध्ये आता अटल इनक्युबेशन सेंटर्स उभारली जाणार आहेत. यामध्ये शेतीच्या क्षेत्रात आसाम विद्यापीठ व बारामतीचे कृषी महाविद्यालय या दोन संस्थांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, देशात शेतीच्या बाबतीत महाविद्यालय म्हणून एकट्या बारामतीचा समावेश आहे. नीती आयोगाच्या सेंटरसाठी देशातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते.    हे सेंटर जागतिक दर्जाच्या संशोधन केंद्राशी संलग्न राहील. नीती आयोगाच्या निवड समितीसमोर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी या नियोजित केंद्रासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सादरीकरण केले. आता या नव्या सेंटरमध्ये महाविद्यालयातील प्रा. जया तिवारी, प्रा. सोनाली सस्ते, प्रा. श्रीकांत कर्णेवार, प्रा. अमित काळे, प्रा. दादा पाटील व प्रा. चंद्रशेखर शेंडे हे प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.————-——————————————आमची जबाबदारी आता अधिक वाढली : पवारनीती आयोगाने देशातील एकमेव कृषी महाविद्यालयाची दखल घेतली. यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. महाविद्यालयात उभारले जाणारे सेंटर शेती व शेतीपूरक व्यवसायात, नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यात, शेतीपूरक व्यवसायाची गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे. यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू, असे बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सांगितले.——————

टॅग्स :Baramatiबारामतीagricultureशेती