शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

शेतीच्या जागतिक दर्जा स्टार्टअप्ससाठी बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 20:46 IST

शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल.

ठळक मुद्देनीती आयोगाची घोषणा, जगातील शास्त्रज्ञांचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारनीती आयोगाच्या सेंटरसाठी देशातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर

बारामती : शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअप्ससाठी देशात एकमेव बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड नीती आयोगाने केली आहे. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमार्फत सन २०१७-१८ साठी भारतातील ७२ सेंटरची घोषणा शुक्रवारी (दि. ४) निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यकारी संचालक रमणन रामानाथन यांनी केली. त्यामध्ये ही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता शेतकरी ते कृषिउद्योजक वाटचाल सहजपणे होणार आहे. शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल.आयोगाच्या घोषणेमुळे हे महाविद्यालय आता शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे उद्योगामध्ये रुपांतरित करणारे जागतिक दर्जाचे  केंद्र बनणार आहे. ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी व स्वच्छतेत आयोगास देशभरात १०० जागतिक दर्जाची केंद्रे उभारायची आहेत. त्यामधील ७२ केंद्रांची निवड निती आयोगाच्या निवड समितीने केली. या केंद्रांमध्ये आता अटल इनक्युबेशन सेंटर्स उभारली जाणार आहेत. यामध्ये शेतीच्या क्षेत्रात आसाम विद्यापीठ व बारामतीचे कृषी महाविद्यालय या दोन संस्थांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, देशात शेतीच्या बाबतीत महाविद्यालय म्हणून एकट्या बारामतीचा समावेश आहे. नीती आयोगाच्या सेंटरसाठी देशातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते.    हे सेंटर जागतिक दर्जाच्या संशोधन केंद्राशी संलग्न राहील. नीती आयोगाच्या निवड समितीसमोर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी या नियोजित केंद्रासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सादरीकरण केले. आता या नव्या सेंटरमध्ये महाविद्यालयातील प्रा. जया तिवारी, प्रा. सोनाली सस्ते, प्रा. श्रीकांत कर्णेवार, प्रा. अमित काळे, प्रा. दादा पाटील व प्रा. चंद्रशेखर शेंडे हे प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.————-——————————————आमची जबाबदारी आता अधिक वाढली : पवारनीती आयोगाने देशातील एकमेव कृषी महाविद्यालयाची दखल घेतली. यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. महाविद्यालयात उभारले जाणारे सेंटर शेती व शेतीपूरक व्यवसायात, नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यात, शेतीपूरक व्यवसायाची गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे. यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू, असे बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सांगितले.——————

टॅग्स :Baramatiबारामतीagricultureशेती