शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मेट्रोबाबत बापट समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

By admin | Updated: April 5, 2015 00:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मुदत मंगळवारी (दि.७ एप्रिल) संपत आहे.

पुणे : बहुचर्चित ‘वनाज ते रामवाडी’ हा मेट्रो मार्ग जमिनीवरून असावा की भुयारी, याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मुदत मंगळवारी (दि.७ एप्रिल) संपत आहे. या मार्गासंदर्भात आक्षेप नोंदविणारे एक तज्ज्ञ विजय केळकर यांचे मत नोंदविल्यानंतर हा अहवाल अंतिम करून पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुदतीत सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे या अहवालावरच या मार्गांचे भवितव्य अवलंबून असणार असून, त्यानंतर राज्यशासन काय निर्णय घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केळकर यांचे मत उद्या (रविवारी) होणऱ्या बैठकीत घेतले जाणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)1शहराच्या मेट्रो प्रकल्पातील ‘पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट’ प्रकल्पास ७ मार्च रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. मात्र, मेट्रो प्रकल्पातील ‘वनाज ते रामवाडी’ या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाला शहरातील स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने, या बैठकीत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा, फडणवीस यांनी बैठकीमध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंसेवी संस्थांचे प्रातिनिधिक प्रतिनिधी, दोन्ही महापालिकांचे आयुक्तांचा समावेश असलेली समिती नेमली. 2या समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदत संपत असून, अंतिम अहवालाचे काम कुठपर्यंत आले आहे, या संदर्भात महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे विचारणा केली. ते म्हणाले, की समितीतील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि अर्थ खात्याचे माजी अधिकारी विजय केळकर हे मागील काही दिवस बाहेरगावी गेल्याने ते बैठकांना उपस्थित राहू शकले नाहीत. ते पुण्यात परतले असून, रविवारी त्यांचा अभिप्राय लिखित स्वरूपात देणार आहेत. हा अभिप्राय पालकमंत्र्यांकडे दिल्यानंतर समितीचा एकत्रित अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला जाईल. त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.