शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मेट्रोबाबत बापट समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

By admin | Updated: April 5, 2015 00:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मुदत मंगळवारी (दि.७ एप्रिल) संपत आहे.

पुणे : बहुचर्चित ‘वनाज ते रामवाडी’ हा मेट्रो मार्ग जमिनीवरून असावा की भुयारी, याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मुदत मंगळवारी (दि.७ एप्रिल) संपत आहे. या मार्गासंदर्भात आक्षेप नोंदविणारे एक तज्ज्ञ विजय केळकर यांचे मत नोंदविल्यानंतर हा अहवाल अंतिम करून पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुदतीत सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे या अहवालावरच या मार्गांचे भवितव्य अवलंबून असणार असून, त्यानंतर राज्यशासन काय निर्णय घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केळकर यांचे मत उद्या (रविवारी) होणऱ्या बैठकीत घेतले जाणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)1शहराच्या मेट्रो प्रकल्पातील ‘पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट’ प्रकल्पास ७ मार्च रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. मात्र, मेट्रो प्रकल्पातील ‘वनाज ते रामवाडी’ या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाला शहरातील स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने, या बैठकीत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा, फडणवीस यांनी बैठकीमध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंसेवी संस्थांचे प्रातिनिधिक प्रतिनिधी, दोन्ही महापालिकांचे आयुक्तांचा समावेश असलेली समिती नेमली. 2या समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदत संपत असून, अंतिम अहवालाचे काम कुठपर्यंत आले आहे, या संदर्भात महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे विचारणा केली. ते म्हणाले, की समितीतील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि अर्थ खात्याचे माजी अधिकारी विजय केळकर हे मागील काही दिवस बाहेरगावी गेल्याने ते बैठकांना उपस्थित राहू शकले नाहीत. ते पुण्यात परतले असून, रविवारी त्यांचा अभिप्राय लिखित स्वरूपात देणार आहेत. हा अभिप्राय पालकमंत्र्यांकडे दिल्यानंतर समितीचा एकत्रित अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला जाईल. त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.