शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सेन्सॉरशिपमुळे कलाकारांसह रसिकांच्या अभिव्यक्तिवरही बंधन - अमोल पालेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 19:05 IST

सेन्सॉरशिपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा हा फक्त मूठभर कलावंतांसाठी राहिला नसून त्यामध्ये प्रेक्षकांनाही स्वातंत्र्य मिळायला हवे त्यांच्या अभिव्यक्तीवर अजिबात बंधने नको, असे मत ज्येष्ठ कलावंत अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.

पुणे, दि. 16 - सेन्सॉरशिपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा हा फक्त मूठभर कलावंतांसाठी राहिला नसून त्यामध्ये प्रेक्षकांनाही स्वातंत्र्य मिळायला हवे त्यांच्या अभिव्यक्तीवर अजिबात बंधने नको, असे मत ज्येष्ठ कलावंत अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान आयोजित रंगभान २०१७ या कार्यशाळेच्या मराठी नाटक आणि दृश्यत्मकता याविषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी निखिल राणे फाऊंडेशनच्या अश्विनी राणे, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत, रंगभानचे अशोक कुलकर्णी, प्रमोद काळे व सर्व सदस्य उपस्थित होते. 

अमोल पालेकर म्हणाले, सेन्सॉरशिप म्हणजे आपण एका समितीला आम्ही काय सादर करणार आहोत हे दाखवतो ती समिती ते सादरीकरण योग्य आहे की नाही हे पाहते आणि सादर करण्यासाठी प्रमाणपत्र देते. नाटकाची सेन्सॉरशिप ही महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना लागू आहे. इतर राज्यात नाटक करताना कायदा आणि सुव्यवस्था हा अडथळा येत नाही परंतु महाराष्ट्रात नाटक करताना कायदा, सुव्यवस्था आणि नैतिकता यामुळे हिंसाचार वाढेल का?,असे प्रश्न सेन्सॉरशिपशी जोडले गेल्यामुळे कलावंत आणि प्रेक्षकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावे यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि हे एक सेन्सॉरशिपसाठी उचलले गेलेले मोठे पाऊल आहे. मराठी नाटके ही प्रवासी नाटकाप्रमाणे विकसित होत गेली. पण त्यामध्ये नैपथ्याचा विचार केला जात नाही. आपण आपल्याला सोयीस्कर नैपथ्य तयार करतो आणि रंगमंचावर दाखवतो. पण यातून दृश्यत्मकता दिसून येत नाही. साधारणतः मराठी नाटकात दृश्याचा विचार झाला  नाही. एका बाजूने मराठी नाटकातील विषय, आशय, विविधता यामध्ये खूप काही नवीन सांगण्याची क्षमता आढळते त्याचप्रकारे दृश्यात्मक प्रभाव हा विरोधी दिसत आहे. 

राजाभाऊ नातूच्या काळात रंगमंचावरील चौकट देखणी आहे की नाही? यांच्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. प्रेक्षकांना दिवासुद्धा दिसता कामा नये, अशी दर्शनी चौकट ते रंगमंचावर देखणी दिसती का नाही इथून सुरुवात करत असे. याची जाणीव सर्व नाट्यकर्मीना नसेल तर दृष्टमतेकडे पाऊल टाकता येणार नाही. एका बाजूने वेगळाच आशय आणि त्यांच्या विरोधीचा प्रवास यात दृश्यत्मकता जागृत राहिली नाही तर हा प्रवास असच मागे जात राहील. अमराठी नाटके म्हणजे दिल्ली, कर्नाटक अशा ठिकाणी अतिशय वास्तववादी, स्वप्नरंजित विश्व उभे करणारा प्रवास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टी दृश्यत्मकत्यामधून लोकांपर्यंत पोहोचवत होती.  मराठी नाटकात शब्दाच्या पलीकडे जाऊन आता सादरीकरण दृश्यात्मक पद्धतीने व्हायला पाहिजे. तसेच लेखकाने सर्व शक्यतांचा विचार करा दिवाणखानासारखी सुरुवात करू नका. रंगमंचीय भाषेचा विचार कराल तर दृश्यत्मकतेचा विचार प्रामुख्याने करा. आपण वास्तववादी वाट चालू ठेऊन इतर वाटांचा अवलंब केला तर दृष्य नक्कीच दिसून येईल. अशोक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर प्रमोद काळे यांनी सूत्रसंचालन  केले.