शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉरशिपमुळे कलाकारांसह रसिकांच्या अभिव्यक्तिवरही बंधन - अमोल पालेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 19:05 IST

सेन्सॉरशिपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा हा फक्त मूठभर कलावंतांसाठी राहिला नसून त्यामध्ये प्रेक्षकांनाही स्वातंत्र्य मिळायला हवे त्यांच्या अभिव्यक्तीवर अजिबात बंधने नको, असे मत ज्येष्ठ कलावंत अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.

पुणे, दि. 16 - सेन्सॉरशिपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा हा फक्त मूठभर कलावंतांसाठी राहिला नसून त्यामध्ये प्रेक्षकांनाही स्वातंत्र्य मिळायला हवे त्यांच्या अभिव्यक्तीवर अजिबात बंधने नको, असे मत ज्येष्ठ कलावंत अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान आयोजित रंगभान २०१७ या कार्यशाळेच्या मराठी नाटक आणि दृश्यत्मकता याविषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी निखिल राणे फाऊंडेशनच्या अश्विनी राणे, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत, रंगभानचे अशोक कुलकर्णी, प्रमोद काळे व सर्व सदस्य उपस्थित होते. 

अमोल पालेकर म्हणाले, सेन्सॉरशिप म्हणजे आपण एका समितीला आम्ही काय सादर करणार आहोत हे दाखवतो ती समिती ते सादरीकरण योग्य आहे की नाही हे पाहते आणि सादर करण्यासाठी प्रमाणपत्र देते. नाटकाची सेन्सॉरशिप ही महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना लागू आहे. इतर राज्यात नाटक करताना कायदा आणि सुव्यवस्था हा अडथळा येत नाही परंतु महाराष्ट्रात नाटक करताना कायदा, सुव्यवस्था आणि नैतिकता यामुळे हिंसाचार वाढेल का?,असे प्रश्न सेन्सॉरशिपशी जोडले गेल्यामुळे कलावंत आणि प्रेक्षकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावे यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि हे एक सेन्सॉरशिपसाठी उचलले गेलेले मोठे पाऊल आहे. मराठी नाटके ही प्रवासी नाटकाप्रमाणे विकसित होत गेली. पण त्यामध्ये नैपथ्याचा विचार केला जात नाही. आपण आपल्याला सोयीस्कर नैपथ्य तयार करतो आणि रंगमंचावर दाखवतो. पण यातून दृश्यत्मकता दिसून येत नाही. साधारणतः मराठी नाटकात दृश्याचा विचार झाला  नाही. एका बाजूने मराठी नाटकातील विषय, आशय, विविधता यामध्ये खूप काही नवीन सांगण्याची क्षमता आढळते त्याचप्रकारे दृश्यात्मक प्रभाव हा विरोधी दिसत आहे. 

राजाभाऊ नातूच्या काळात रंगमंचावरील चौकट देखणी आहे की नाही? यांच्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. प्रेक्षकांना दिवासुद्धा दिसता कामा नये, अशी दर्शनी चौकट ते रंगमंचावर देखणी दिसती का नाही इथून सुरुवात करत असे. याची जाणीव सर्व नाट्यकर्मीना नसेल तर दृष्टमतेकडे पाऊल टाकता येणार नाही. एका बाजूने वेगळाच आशय आणि त्यांच्या विरोधीचा प्रवास यात दृश्यत्मकता जागृत राहिली नाही तर हा प्रवास असच मागे जात राहील. अमराठी नाटके म्हणजे दिल्ली, कर्नाटक अशा ठिकाणी अतिशय वास्तववादी, स्वप्नरंजित विश्व उभे करणारा प्रवास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टी दृश्यत्मकत्यामधून लोकांपर्यंत पोहोचवत होती.  मराठी नाटकात शब्दाच्या पलीकडे जाऊन आता सादरीकरण दृश्यात्मक पद्धतीने व्हायला पाहिजे. तसेच लेखकाने सर्व शक्यतांचा विचार करा दिवाणखानासारखी सुरुवात करू नका. रंगमंचीय भाषेचा विचार कराल तर दृश्यत्मकतेचा विचार प्रामुख्याने करा. आपण वास्तववादी वाट चालू ठेऊन इतर वाटांचा अवलंब केला तर दृष्य नक्कीच दिसून येईल. अशोक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर प्रमोद काळे यांनी सूत्रसंचालन  केले.