शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

सराटी परिसरातील बंधारे फुल्ल

By admin | Updated: November 16, 2016 02:57 IST

सराटी (ता. इंदापूर) परिसरातील नीरा नदीवरील बंधाऱ्यामध्ये बारामती पाटंबधारे विभागाकडून वेळीच बंधारे अडविले गेल्यामुळे सध्या हे

बावडा : सराटी (ता. इंदापूर) परिसरातील नीरा नदीवरील बंधाऱ्यामध्ये बारामती पाटंबधारे विभागाकडून वेळीच बंधारे अडविले गेल्यामुळे सध्या हे बंधारे फुल्ल झाले आहेत. यामुळे या परिसरातील पाणीप्रश्न मिटला आहे. मागील ३-४ वर्षे दुष्काळाशी सामना करताना मेटाकुटीला आलेल्या शेतकरी वर्गात यंदा उशिरा का होईना परंतु मेघराजाने साथ दिल्याने दुष्काळी परिस्थिती मिटली आहे. बावडा व परिसरात रब्बी हंगामाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. उसाच्या लागणीही वाढल्या आहेत. या परिसरात सातत्याने तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नीरा नदी कोरडी ठणठणीत पडली होती. मात्र, परतीच्या पावसाने ही कसर भरून काढून पावसाने या परिसरातील सरासरी पूर्ण केली. यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली. तसेच बंद पडलेल्या विंधनविहिरींनाही उभारी मिळाली. यंदा रब्बी हंगामातील ज्वारीपिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली असून, पिकेही समाधानकारक उगवली आहेत. काही भागात आंतरमशागतीची कामे सुरू झाल्याने शेतकरीवर्ग शेतीच्या कामात गुंतला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे बारामती उपविभागाचे उपअभियंता ए.आर. भोसले यांनी केले आहे. या उपविभागांतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम २०१६-१७ मध्ये कालव्याचे पाणी मिळविण्यासाठी नमुना नं.७ वर ज्या पिकांना पाणी हवे असेल त्याबाबतचे मागणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात जमिनीचा सातबारा उतारा घेऊन व पाणीपट्टी थकबाकी भरून मागणी अर्ज सादर करावेत, असेही आवाहन भोसले यांनी केले आहे. (वार्ताहर)