शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

आयुष्यात कधी ना कधी तरी ‘बॅड पॅच’ येतोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:09 IST

हे कधी करियरच्या बाबतीत होतं. तर कधी नात्यांच्या.. तर कधी वरवर सगळं आलबेल दिसत असतं आणि आत मात्र उलथापालथ ...

हे कधी करियरच्या बाबतीत होतं. तर कधी नात्यांच्या..

तर कधी वरवर सगळं आलबेल दिसत असतं आणि आत मात्र उलथापालथ सुरू असते.

कधी व्यवहारांची गणितं चुकतात, तर कधी अंदाज फसतात.

कधी आपला काहीही दोष नसताना अपयशाचे फास आवळले जातात.

आणि बऱ्याचदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

मग चहूबाजूनी जी कोंडी होते त्यालाच आपण म्हणतो बॅड पॅच !

असा बॅड पॅच आला की, तो आपल्या आयुष्यात किती काळ राहील हे सांगता येत नाही. मात्र, एकदा आला की आयुष्य नकोसं करून सोडतो...कधी कधी जगण्याला फूलस्टॉप द्यावा असंही वाटून जातं.

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅडपॅच कधीतरी येतोच. आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

पण बॅडपॅच जगण्याचा भाग असेल तर नाकारून कसं चालेल. यायचा तर येउद्या.

आपण दोन गोष्टींची मानसिक तयारी ठेवली तर त्यातील त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. एक म्हणजे आपला दृष्टिकोन आणि स्वीकारण्याची मानसिकता.

आहे ही परिस्थिती जशीच्या तशी मनापासून स्वीकारली की निदान त्या परिस्थितीविषयीच्या तक्रारी कमी होऊन जातात. आणि मगच त्यावर मात करण्याच्या काही आशा निर्माण होऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन! आपण पाहतो कसं हे फार महत्त्वाचं. दृष्टिकोन जितका सकारात्मक ठेवू तेवढं लढण्याचं, जगण्याचं बळ मिळतं.

बॅडपॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं राहातं हे फक्त आणि फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत राहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,

काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो

हे आपलं आपल्याला समजू शकतं...

आपली शक्तिस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. हा वाईट काळ खूप काही काही शिकवून जातो.

यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो.

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या हातात असतं... ते मात्र आत्मसात करायला हवं.

आपला बॅडपॅच आहे हेच नाकारून उद्दामपणे जगत राहायचं आणि आंधळेपणाने स्वतःचं नुकसान करत राहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव शिकवत राहतात बरंच काही. सगळं संपलंय असं कधीच नसतं आयुष्यात. कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे आयुष्य बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.