शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेदाचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST

डॉ. प्रेरणा बर्वे आयुर्वेद व योग तज्ज्ञ ----------------- साधारण दीड वर्षापासून कोरोना ह्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाची ...

डॉ. प्रेरणा बर्वे

आयुर्वेद व योग तज्ज्ञ

-----------------

साधारण दीड वर्षापासून कोरोना ह्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाची घोडदौड सुरूच आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे, भीतीचे वातावरण आहे. त्याउलट काहीजण मला काही होणार नाही, ह्या भ्रमात आहेत. त्यांना कोरोना होईल तेव्हाच त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे.

___ कोरोना विरुद्धची लढाई सोपी नक्कीच नाही त्यासाठी मास्क लावणे, हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब तर केलाच पाहिजे व कोरोनाचा प्रतिबंध केला पाहिजे. पण, हा प्रतिबंध करायचा कसा? तर... व्याधिक्षमत्वरुपी ढाल आपल्याला ह्या लढाईत कामी येणार आहे. पण, व्याधिक्षमत्व काही जादूची कांडी फिरवल्याने मिळणार नाही. त्यासाठी ईच्छाशक्ती, संयम व सातत्य हवे असते. अशावेळी शाश्वत आयुर्वेद शास्त्र मदतीला येते. आपण म्हणतो Prevention is better than cure. हाच आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत आहे.

स्वास्थस्य स्वास्थ रक्षणम |

आतुरस्य विकार प्रशमन च ॥

अर्थ- स्वस्थ लोकांच्या आरोग्याचे रक्षण करायचे व जे रोगी आहेत त्यांना निरोगी बनवायचे. आयुर्वेद शास्त्रावर विश्वास ठेवून जर सर्वांनी आचरण केले तर कोरोना सारखे विषाणू संक्रमण करणार नाहीत, केले तरी आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही व झालेच तर थोड्या प्रमाणात होईल. कोरोना प्रतिबंधसाठी काही उपाय बघूया -

१) लवंग, धणे, सुंठ, आले, जिरे, ओवा इ. घटक पाण्यात चहासारखे उकळून घोट घोट प्यावे.

२) तुळशीचा काढा- चार कप पाण्यात दहा ते पंधरा तुळशीची पाने व थोडा गूळ घालून एक कप उरेपर्यंत उकळून हे मिश्रण थर्मास मध्ये भरून ठेवावे व दोन ते चार चमचे येता-जाता सेवन करावे.

३) हळद टाकून दुध प्यावे. ४) नियमित च्यवनप्राश सेवन करावे.

५) नस्य - नाकामध्ये तीळतेल, तूप याने प्रतीमर्ष नस्य करावे.

६) गंडूष- तोंडामध्ये एक चमचा तीळतेल किवा खोबरेल तेल घेऊन , २ - ३ मिनीट ठेवून नंतर थुंकून द्यावे. असे दिवसातून एक दोन वेळा करावे.

७) जेवण बनवताना हळद, जिरे, दालचिनी, धने, लसूण, तमालपत्र इ. मसाल्याचा प्रयोग करावा.

८) अन्न हे पूर्णब्रह्म आहे म्हणून सात्विक आहार घ्यावा.

९) AYUSH मंत्रालयाने सूचित केलेल्या आयुषकाढा मध्ये तुळस, काळी मिरे, दालचिनी, सुंठ व मनुका हे घटक आहेत. त्याचे प्राशन करावे. त्यातील घटक द्रव्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म खालील प्रमाणे आहेत -

अ) तुळस - पार्श्वस्क कफवातजित |

(भावप्रकाश)

तुळशिमुळे कफ व वात कमी होतो, ताप कमी होतो व श्वसन संस्थेला लाभ होतो.

ब) मिरे - सर्वकासहरम श्रेष्ठं

लेहयं कासार्दीतो नर; |

(चरक)

मिरे सगळ्या प्रकारच्या काससाठी श्रेष्ठ व ज्वरघ्न आहे. क) दालचिनी- कृमिपीनसकासजित |

(भावप्रकाश)

दालचिनी सर्दी व खोकल्यावर गुणकारी आहे.

ड) सुंठ - जिव्हा कंठ विशोधनम | __सुंठीमुळे जीभ व गळ्याच्या भागाची शुद्धी होते तसेच अग्निप्रदीपन होते.

इ) काळा मनुका - रक्तपितज्वरश्वास |

तृष्णादाहक्षयापहा ॥

काळा मनुकामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते, ज्वर कमी होतो. आपल्याला माहीत आहे की शरीर कमजोर तर जंतू शिरजोर. त्यासाठी उपरोक्त आयुर्वेदिक प्रतिबंध उपायांचा अवलंब केला तर आपली प्रतिकारशक्ती वाढून आपण सर्दी, खोकला, कोरोना सारख्या विषाणूजन्य आजारांपासून स्वतःचे व आपल्या निकटवर्तीयांचे संरक्षण करू शकतो.