शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

मुस्लीम महिलांमध्ये जागरुकता यावी : अजमल कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:02 IST

महिलांनी शरियतच्या आधारे नव्हे तर शिक्षणाच्या जोरावरच सर्वोच्च स्थान संपादन केले...

ठळक मुद्देमुस्लीम महिला जागृत झाल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे अशक्य

पुणे : तिहेरी तलाकच्या मुद्दयावर राजकीय पातळीवर काही होईल, अशी अपेक्षा करण्यापेक्षाही मुस्लीम महिलांमधूनच विरोधी आवाज उठला पाहिजे. मुस्लीम महिला जागृत झाल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे अशक्य आहे, असे मत नवी दिल्ली येथील सार्क विद्याापीठामध्ये संशोधन करणारे अभ्यासक अजमल कमाल यांनी गुरुवारी व्यक्त केले. हमीद दलवाई स्टडी सर्कलतर्फे आयोजित कार्यक्रमात मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या ‘इंधन’ या कादंबरीचा ऊर्दू अनुवाद करून पाकिस्तानमध्ये प्रकाशन करणारे अजमल कमाल आणि ‘मोदीखान्याच्या दोन गोष्टी’ व ‘बिनसावल्यांच्या गावात’ या लघुपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शिका गौरी पटवर्धन या दांपत्याशी संवाद साधण्यात आला. प्रा. शमसुद्दीन तांबोळी, प्रा. बेनझीर तांबोळी आणि बशीर शेख यावेळी उपस्थित होते.  कमाल म्हणाले, मुस्लिमांप्रती कळवळा असलेल्या काँग्रेसने काही केले नाही. शहाबानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोटगीचा आदेश दिलेला असतानाही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले नाही. तर, मोदी का करतील? महिलांची स्थिती चांगली व्हावी, असा कोणाचाच विचार नसल्यामुळे काही बदल होणार नाही. शरियतमध्ये बदल झाला नाही. सरकारला राज्यघटनेमध्येच बदल करावा लागला होता. तिहेरी तलाक संपविण्याची चळवळ झाली पाहिजे. अशी चळवळ शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. पाकिस्तानामध्ये मोजक्या महिलांनी शरियतच्या आधारे नव्हे तर शिक्षणाच्या जोरावरच सर्वोच्च स्थान संपादन केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMuslimमुस्लीमWomenमहिला