शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मुस्लीम महिलांमध्ये जागरुकता यावी : अजमल कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:02 IST

महिलांनी शरियतच्या आधारे नव्हे तर शिक्षणाच्या जोरावरच सर्वोच्च स्थान संपादन केले...

ठळक मुद्देमुस्लीम महिला जागृत झाल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे अशक्य

पुणे : तिहेरी तलाकच्या मुद्दयावर राजकीय पातळीवर काही होईल, अशी अपेक्षा करण्यापेक्षाही मुस्लीम महिलांमधूनच विरोधी आवाज उठला पाहिजे. मुस्लीम महिला जागृत झाल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे अशक्य आहे, असे मत नवी दिल्ली येथील सार्क विद्याापीठामध्ये संशोधन करणारे अभ्यासक अजमल कमाल यांनी गुरुवारी व्यक्त केले. हमीद दलवाई स्टडी सर्कलतर्फे आयोजित कार्यक्रमात मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या ‘इंधन’ या कादंबरीचा ऊर्दू अनुवाद करून पाकिस्तानमध्ये प्रकाशन करणारे अजमल कमाल आणि ‘मोदीखान्याच्या दोन गोष्टी’ व ‘बिनसावल्यांच्या गावात’ या लघुपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शिका गौरी पटवर्धन या दांपत्याशी संवाद साधण्यात आला. प्रा. शमसुद्दीन तांबोळी, प्रा. बेनझीर तांबोळी आणि बशीर शेख यावेळी उपस्थित होते.  कमाल म्हणाले, मुस्लिमांप्रती कळवळा असलेल्या काँग्रेसने काही केले नाही. शहाबानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोटगीचा आदेश दिलेला असतानाही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले नाही. तर, मोदी का करतील? महिलांची स्थिती चांगली व्हावी, असा कोणाचाच विचार नसल्यामुळे काही बदल होणार नाही. शरियतमध्ये बदल झाला नाही. सरकारला राज्यघटनेमध्येच बदल करावा लागला होता. तिहेरी तलाक संपविण्याची चळवळ झाली पाहिजे. अशी चळवळ शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. पाकिस्तानामध्ये मोजक्या महिलांनी शरियतच्या आधारे नव्हे तर शिक्षणाच्या जोरावरच सर्वोच्च स्थान संपादन केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMuslimमुस्लीमWomenमहिला