शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कीर्तनातून होते प्रबोधन आणि समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:27 IST

पुणे : कीर्तन हे भक्तीभाव व प्रबोधनाचे पवित्र आणि समृद्ध माध्यम आहे. मानसशास्त्राला जे जमले नाही, ते कीर्तन परंपरेने ...

पुणे : कीर्तन हे भक्तीभाव व प्रबोधनाचे पवित्र आणि समृद्ध माध्यम आहे. मानसशास्त्राला जे जमले नाही, ते कीर्तन परंपरेने करुन दाखवले. कोविड काळात कीर्तन हे समुपदेशनाचे महत्वाचे साधन म्हणून उपयुक्त ठरले, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सवाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांना कीर्तन कोविद कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी मंगलमूर्ती औरंगाबादकर, शाहीर हेमंतराजे मावळे, शिरीष मोहिते, प्रा. संगिता मावळे उपस्थित होते.

डॉ. उमराणी म्हणाले, आपले ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून करीत आहेत. कीर्तनाची परंपरा तरुणाईपर्यंत पोहोचायला हवी. समाजाला ताकद देण्याची क्षमता कीर्तनासारख्या कलांमध्ये आहे. प्रबोधन, शिक्षण आणि समुपदेशनासाठी कीर्तन परंपरा गरजेची आहे.

मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर म्हणाले, कीर्तन क्षेत्रात कितीही काम केले, तरी कमीच आहे. समाजाला कीर्तनातून प्रबोधनाची गरज आहे. समाजाने खऱ्या अर्थाने वंदन केलेली कीर्तनाची गादी आहे, ती आपण जपायला आणि वाढवायला हवी.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, नारदीय कीर्तन वैभवापर्यंत नेणे, हा आमचा उद्देश आहे. आज अनेक कलांना व्यासपीठ उपलब्ध नाही. त्यामुळे कीर्तनाला व्यासपीठ देण्यास कीर्तन महोत्सव आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. कीर्तन महोत्सवात संत शिरोमणी नामदेव महाराज सार्ध सप्तशती जयंती वर्ष समारोपाच्या निमित्ताने यंदा राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांनी संत नामदेव विजय यात्रा आपल्या कीर्तनातून सांगितली. होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले.