शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

जिल्ह्यात सगळ्या गावांचे सरासरी उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतरही जिल्ह्यातील १ हजार ९२५ गावांपैकी सर्वांचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतरही जिल्ह्यातील १ हजार ९२५ गावांपैकी सर्वांचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच आहे. खरीप हंगामाच्या सरकारी पाहणीनंतर नुकताच पैसेवारीचा अहवाल जाहीर करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त निदर्शनास आली आहे.

जिल्ह्यात पुणे शहरासह १५ तालुके आहेत. त्यात मिळून १ हजार ९२५ गावे आहेत. त्यातील दौंड, बारामती व इंदापूर हे तीन तालुके रब्बी हंगामाचे आहेत. त्या तालुक्यातील ५४३ गावे खरीप हंगामात जमेस धरत नाहीत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व हवेली तालुक्यातील काही गावे शहरी हद्दीत समाविष्ट आहेत. काही तालुक्यांमधील गावे ओसाड आहेत. काही गावे धरणासाठी संपादित झाली आहेत. अशा एकूण गावांची संख्या ६९ आहे. त्याशिवाय उर्वरित १२ तालुक्यात मिळून १ हजार ३७९ गावे खरीप हंगामाची आहेत. तिथे पैसेवारी मोजली जाते.

दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारी मदत देण्यासाठी म्हणून गावांची पैसेवारी मोजली जाते. त्यासाठी त्या गावांचे मागील १० वर्षांचे सरासरी उत्पन्न काढतात. आपत्तीमध्ये त्यापेक्षा कमी उत्पन्न होत असेल तर ते गाव दुष्काळी जाहीर केले जाते व त्याला त्वरित सरकारी मदत मिळते. सप्टेबर ऑक्टोबरमधील अतिवृष्टीनंतर सरकारने केलेल्या पाहणीत जिल्ह्यात असे एकही गाव आढळलेले नाही.

एकूण १ हजार २९८ गावांची पाहणी करून सन २०२०-२१ साठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पैसेवारी जाहीर करण्यात आली. पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या ६२४ आहे. अतिवृष्टीचा फटका सर्वच तालुक्यांमधील गावांना बसला होता. त्याचे पंचनामे होऊन त्यांना त्याची नुकसानभरपाईही मिळू लागली आहे. मात्र, थेट दुष्काळ किंवा सरासरी उत्पन्न घटले असे एकही गाव पैसेवारीनुसार जिल्ह्यात नाही.