शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

जिल्ह्यात सगळ्या गावांचे सरासरी उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतरही जिल्ह्यातील १ हजार ९२५ गावांपैकी सर्वांचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतरही जिल्ह्यातील १ हजार ९२५ गावांपैकी सर्वांचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच आहे. खरीप हंगामाच्या सरकारी पाहणीनंतर नुकताच पैसेवारीचा अहवाल जाहीर करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त निदर्शनास आली आहे.

जिल्ह्यात पुणे शहरासह १५ तालुके आहेत. त्यात मिळून १ हजार ९२५ गावे आहेत. त्यातील दौंड, बारामती व इंदापूर हे तीन तालुके रब्बी हंगामाचे आहेत. त्या तालुक्यातील ५४३ गावे खरीप हंगामात जमेस धरत नाहीत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व हवेली तालुक्यातील काही गावे शहरी हद्दीत समाविष्ट आहेत. काही तालुक्यांमधील गावे ओसाड आहेत. काही गावे धरणासाठी संपादित झाली आहेत. अशा एकूण गावांची संख्या ६९ आहे. त्याशिवाय उर्वरित १२ तालुक्यात मिळून १ हजार ३७९ गावे खरीप हंगामाची आहेत. तिथे पैसेवारी मोजली जाते.

दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारी मदत देण्यासाठी म्हणून गावांची पैसेवारी मोजली जाते. त्यासाठी त्या गावांचे मागील १० वर्षांचे सरासरी उत्पन्न काढतात. आपत्तीमध्ये त्यापेक्षा कमी उत्पन्न होत असेल तर ते गाव दुष्काळी जाहीर केले जाते व त्याला त्वरित सरकारी मदत मिळते. सप्टेबर ऑक्टोबरमधील अतिवृष्टीनंतर सरकारने केलेल्या पाहणीत जिल्ह्यात असे एकही गाव आढळलेले नाही.

एकूण १ हजार २९८ गावांची पाहणी करून सन २०२०-२१ साठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पैसेवारी जाहीर करण्यात आली. पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या ६२४ आहे. अतिवृष्टीचा फटका सर्वच तालुक्यांमधील गावांना बसला होता. त्याचे पंचनामे होऊन त्यांना त्याची नुकसानभरपाईही मिळू लागली आहे. मात्र, थेट दुष्काळ किंवा सरासरी उत्पन्न घटले असे एकही गाव पैसेवारीनुसार जिल्ह्यात नाही.