शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

लेखक-प्रकाशक वाद पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 02:17 IST

अनिता पाध्ये यांनी प्रकाशन अधिकार काढून घेतले : अनिल कुलकर्णी यांचा इन्कार

पुणे : महाराष्ट्रातील काही प्रकाशकांकडून लेखकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप करीत लेखिका अनिता पाध्ये यांनी अनुबंध प्रकाशनाकडून ‘एकटा जीव’, ‘इष्काचा जहरी प्याला’ आणि ‘एक होता गोल्डी’ या पुस्तकांच्या पुढील आवृत्तीचे प्रकाशन अधिकार काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी ‘हक्क काढून घेतले नसून, आपणहून सोडले’ असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे लेखक-प्रकाशक यांच्यातील वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून अनुबंध प्रकाशनाशी लेखिका अनिता पाध्ये संबंधित आहेत. त्यांच्या ‘एकटा जीव’ या लोकप्रिय पुस्तकाच्या दहा आवृत्या प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्याच कमाल अमरोही-मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारित ‘इष्काचा जहरी प्याला’ व दिग्दर्शक विजय आनंद यांचे जीवनचरित्र ‘एक होता गोल्डी’ या पुस्तकांच्या प्रकाशनाचे अधिकार अनुबंधकडे आहेत. मात्र, हे सर्व अधिकार प्रकाशकांकडून काढून घेत असल्याचे पाध्ये यांनी जाहीर केले आहे. लेखकाला कोणते पुस्तक कुणाकडून करून घ्यायचे, याबाबत अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? प्रकाशक लेखकाला वेठीस धरू शकतो का, असा सवाल अनिता पाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. त्या म्हणाल्या, ‘दहा क्लासिक’ पुस्तक करण्यासाठी २०१५ मध्ये अनुबंधशी करार झाला. त्यांनी ३१ हजारांचा चेक मला दिला. त्यांना माझ्याकडची दुर्मिळ छायाचित्र दिली होती. मात्र, मार्च २०१६ उजाडले, तरी पुस्तक झाले नाही. दरम्यान, जो चेक मला दिला तो वटवला नाही. माझी गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. मग, मीच या पुस्तकाचे स्वत: प्रकाशन केले. मला यापुढे तुमच्याबरोबर एकही पुस्तक करायचे नाही, असे सांगून चेक परत दिला आणि जे दुर्मिळ फोटोग्राफ होते ते मागितले. त्याबदल्यात त्यांनी पुस्तकासाठी ज्या प्रिंट आऊट काढल्या त्याची ९ हजार रक्कम द्यावी, असे सांगितले. कॉपी राईट संपुष्टात आणण्यासाठीचा आर्थिक व्यवहार पूर्ण करून पुस्तकांच्या शिल्लक प्रती परत घेतल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘दहा क्लासिक’ या पुस्तकासाठी झाला होता करार४प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी त्यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. पाध्ये यांच्या तिन्ही पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या मी प्रकाशित केल्या आहेत. आजपर्यंत कोणतीही वादावादी झाली नाही. चांगले नाते असल्याशिवाय इतक्या आवृत्या प्रकाशितकेल्या असत्या का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.‘दहा क्लासिक’ या पुस्तकासाठी आमच्यात करार झाला होता. दोन प्रूफरीडिंगसाठी पाठवले, मात्र ते एक महिन्यानी आले. मात्र, त्यांनी ७० टक्के पुस्तक बदलले, ४०० पाने करायची होती पण त्यांनी स्वत:कडे ठेवले. माझे पुस्तक प्रकाशित करू नका, असे सांगून स्वत: पुस्तक प्रकाशित करून कराराचा भंग केला.४कोणताही प्रकाशक लेखकाला आगाऊ रॉयल्टी देत नाही, तरीही मी प्रत्येक पुस्तकाच्या आवृत्तीसाठी दिली. कॉपीराईट संपुष्टात आल्यावर मी लेखिकेकडे रक्कम मागितली. आणि सोडहक्क पत्र पैसे पूर्ण मिळाल्यानंतरच ग्राह्य धरण्यात यावे असे लिहून दिल्याने, त्यांचा अहंकार दुखावला असल्याने त्यांनी हे पाऊल टाकले असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे