शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेट उड्डाणाचा प्रयत्न अयशस्वी

By admin | Updated: August 11, 2014 23:32 IST

अयशस्वी ठरलो असलो तरी पुन्हा अधिक काळजी आणि अभ्यास करून याच ठिकाणी प्रक्षेपण यशस्वी करून दाखवू, असा विश्वास गुजरात येथील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक यांनी व्यक्त केला.

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : इंधन म्हणून साखरेचा वापर करून साडेचार किलोमीटर उडू पाहणाऱ्या रॉकेटच्या लोखंडी पाईपचे वेल्डिंग तुटल्याने त्याच्या प्रक्षेपणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तत्पूर्वी केलेले १ किलोमीटरचे प्रक्षेपण यशस्वी झाले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह हजारो विज्ञानप्रेमींच्या गर्दीने आचिर्णेतील वडाचा माळ फुलून गेला होता. दरम्यान, साडेचार किलोमीटर प्रक्षेपण चाचणीची ही पहिलीच वेळ होती. यामध्ये अयशस्वी ठरलो असलो तरी पुन्हा अधिक काळजी आणि अभ्यास करून याच ठिकाणी प्रक्षेपण यशस्वी करून दाखवू, असा विश्वास गुजरात येथील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक यांनी व्यक्त केला.साखरेचा इंधन म्हणून वापर करून देशात ५०० मीटर ते एक हजार मीटरची तीन उड्डाणे यशस्वी केल्यानंतर साडेचार किलोमीटरच्या प्रक्षेपणासाठी आचिर्णेची निवड करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून आचिर्णेच्या माळरानावर विद्यार्थ्यांसह विज्ञानप्रेमींची गर्दी झाली होती. दुपारी १.४० वाजता एक किलोमीटर अंतर पार करणाऱ्या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना जाण्यास सांगितले.सायंकाळी पाचच्या सुमारास नियोजित साडेचार किलोमीटर रॉकेट प्रक्षेपणाची चाचणी घेण्यात आली. मात्र, रॉकेटच्या लोखंडी पाईपचे वेल्डिंग तुटल्याने हे देशातील सर्वांत मोठे रॉकेट प्रक्षेपण अयशस्वी ठरले. त्यामुळे संशोधक, आयोजक आणि विज्ञानप्रेमींचा काहीसा हिरमोड झाला. रॉकेट प्रक्षेपण मोहिमेत विद्यापीठाचे कुलगुरू किरण नाईक, /पान ८ वर रॉकेट तंत्रज्ञानाचे संशोधक राजेश मुनेश्वर, भावेश परमार, प्रसाद राणे, कल्पेश रावराणे, अलंकार राणे दोन दिवसांपासून व्यस्त होते. सुमारे साडेचार फूट उंचीच्या रॉकेटमध्ये सहा किलो साखरेचा इंधन म्हणून वापर केला होता. हे रॉकेट पाच ते सहा हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकते, असा त्यांचा दावा होता. मात्र, साहित्याच्या दोषामुळे ही चाचणी यशस्वी होऊ शकली नाही.देशात संशोधनाकडे वळण्याचा कल नगण्य असल्याने बालवयात संशोधनाची रुची निर्माण करून तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे वळविण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत. त्यातूनच आचिर्णेची निवड केली होती. तंत्रज्ञानात प्रगती झाली तरच देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे पुन्हा प्रयत्न करून हा प्रयोग यशस्वी करू, असा विश्वास कुलगुरू नाईक यांनी व्यक्त केला. हा उपक्रम कोकण सेवा मंचने प्रायोजित केला होता. यावेळी मंचाचे इक्बाल वाणू, नजीर हुरजूक, सलीम अलवार, मुख्तार सुर्वे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)