शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेट उड्डाणाचा प्रयत्न अयशस्वी

By admin | Updated: August 11, 2014 23:32 IST

अयशस्वी ठरलो असलो तरी पुन्हा अधिक काळजी आणि अभ्यास करून याच ठिकाणी प्रक्षेपण यशस्वी करून दाखवू, असा विश्वास गुजरात येथील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक यांनी व्यक्त केला.

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : इंधन म्हणून साखरेचा वापर करून साडेचार किलोमीटर उडू पाहणाऱ्या रॉकेटच्या लोखंडी पाईपचे वेल्डिंग तुटल्याने त्याच्या प्रक्षेपणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तत्पूर्वी केलेले १ किलोमीटरचे प्रक्षेपण यशस्वी झाले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह हजारो विज्ञानप्रेमींच्या गर्दीने आचिर्णेतील वडाचा माळ फुलून गेला होता. दरम्यान, साडेचार किलोमीटर प्रक्षेपण चाचणीची ही पहिलीच वेळ होती. यामध्ये अयशस्वी ठरलो असलो तरी पुन्हा अधिक काळजी आणि अभ्यास करून याच ठिकाणी प्रक्षेपण यशस्वी करून दाखवू, असा विश्वास गुजरात येथील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक यांनी व्यक्त केला.साखरेचा इंधन म्हणून वापर करून देशात ५०० मीटर ते एक हजार मीटरची तीन उड्डाणे यशस्वी केल्यानंतर साडेचार किलोमीटरच्या प्रक्षेपणासाठी आचिर्णेची निवड करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून आचिर्णेच्या माळरानावर विद्यार्थ्यांसह विज्ञानप्रेमींची गर्दी झाली होती. दुपारी १.४० वाजता एक किलोमीटर अंतर पार करणाऱ्या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना जाण्यास सांगितले.सायंकाळी पाचच्या सुमारास नियोजित साडेचार किलोमीटर रॉकेट प्रक्षेपणाची चाचणी घेण्यात आली. मात्र, रॉकेटच्या लोखंडी पाईपचे वेल्डिंग तुटल्याने हे देशातील सर्वांत मोठे रॉकेट प्रक्षेपण अयशस्वी ठरले. त्यामुळे संशोधक, आयोजक आणि विज्ञानप्रेमींचा काहीसा हिरमोड झाला. रॉकेट प्रक्षेपण मोहिमेत विद्यापीठाचे कुलगुरू किरण नाईक, /पान ८ वर रॉकेट तंत्रज्ञानाचे संशोधक राजेश मुनेश्वर, भावेश परमार, प्रसाद राणे, कल्पेश रावराणे, अलंकार राणे दोन दिवसांपासून व्यस्त होते. सुमारे साडेचार फूट उंचीच्या रॉकेटमध्ये सहा किलो साखरेचा इंधन म्हणून वापर केला होता. हे रॉकेट पाच ते सहा हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकते, असा त्यांचा दावा होता. मात्र, साहित्याच्या दोषामुळे ही चाचणी यशस्वी होऊ शकली नाही.देशात संशोधनाकडे वळण्याचा कल नगण्य असल्याने बालवयात संशोधनाची रुची निर्माण करून तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे वळविण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत. त्यातूनच आचिर्णेची निवड केली होती. तंत्रज्ञानात प्रगती झाली तरच देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे पुन्हा प्रयत्न करून हा प्रयोग यशस्वी करू, असा विश्वास कुलगुरू नाईक यांनी व्यक्त केला. हा उपक्रम कोकण सेवा मंचने प्रायोजित केला होता. यावेळी मंचाचे इक्बाल वाणू, नजीर हुरजूक, सलीम अलवार, मुख्तार सुर्वे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)