शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आकाशनिरीक्षण प्रदूषणाच्या विळख्यात : डॉ. जयंत नारळीकर; खगोलशास्त्रज्ञ प्रकाश तुपे यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 11:58 IST

अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन या संस्थेतर्फे बारावा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देआकाशात भिरभिरणारी नजर खाली आल्यामुळे जंगल जाणून घेता आले : डॉ. प्रकाश तुपे निसर्गाचे तत्त्वज्ञान जीवनात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा : राम ताकवले

पुणे : पूर्वीचे आणि आताचे पुणे यात कमालीचा फरक पडला आहे. उपनगरे विस्तारली आहेत. शहर आणि उपनगरे ‘प्रकाश’ प्रदूषणाच्या छायेखाली आहेत. आकाशनिरीक्षण करताना प्रकाश नको असतो. त्यामुळे निरीक्षणासाठी शहरांपासून लांब जावे लागते. कारण, आकाशनिरीक्षण प्रकाश प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी केले.अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन या संस्थेतर्फे बारावा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, वनमहर्षी मारुती चितमपल्ली उपस्थित होते. डॉ. जयंत नारळीकर म्हणाले, ‘आकाश तुपे यांच्याशी माझा पूर्वीपासूनचा परिचय आहे. हडपसरला शेतात राहताना तुपे यांना आकाशदर्शनाची गोडी लागली. एकदा उल्कावर्षाव दिसणार आहे, असे समजल्यावर तुपे यांच्या विनंतीवरून मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ‘रात्रीच्या वेळी शहरातील वीज काही काळ बंद ठेवावी’, असे पत्र लिहिले. सुरक्षेच्या कारणास्तव असे करता येणार नाही, अशी दिलगिरी व्यक्त करणारे उत्तर त्यांच्याकडून मिळाले’.‘१९९१ च्या सुमारास एन. सी. राणा यांच्या मदतीने आयुका नुकतीच अस्तित्वात आली होती. त्या वेळी पुण्यातील सर्व खगोलशास्त्र संस्थांची एकत्रित बैठक बोलावली होती. या सर्व संस्थाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न त्या काळी राहून गेला होता. तो अजूनही करता येईल, अशी आशा आहे’, असेही ते म्हणाले.विवेक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कोठडिया यांनी सूत्रसंचालन केले.

तुपे म्हणाले, ‘डॉ. जयंत नारळीकर, डॉ. राम ताकवले, मारुती चितमपल्ली यांसारख्या दिग्गजांचा सहवास मला लाभला. तोंड बंद ठेवले आणि डोळे, कान उघडे ठेवल्यास जंगल कळते, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आकाशात भिरभिरणारी नजर खाली आल्यामुळे जंगल जाणून घेता आले. आकाशाप्रमाणे जंगलाच्याही प्रेमात पडलो.’

राम ताकवले म्हणाले, ‘ज्ञानाने प्रश्न सुटणार असतील, जीवनविषयक दृष्टिकोन व्यापक होणार असेल, तर त्या शिक्षणाचा मूलभूत उद्देश पूर्ण होतो. ज्ञान केवळ ज्ञानासाठी मिळवायचे की जीवनासाठी, हे आपण ठरवायला हवे. चौकटीपासून मुक्त होणे, निसर्गाच्या जवळ जाणे, वैश्विकता, व्यापकता आत्मसात करणे हेच खऱ्या अर्थाने मूल्यात्मक शिक्षण आहे. निसर्गाचे तत्त्वज्ञान जीवनात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.’

विवेक देशपांडे संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना निसर्गाचा परिचय तसेच गड-किल्ले, जंगलाचे दर्शन घडवत आहेत. शिस्तबद्ध कार्यक्रमातून हे ज्ञानार्जन केले जाते. मात्र, आजपर्यंत या कामाची दखल घेण्यात आलेली नाही. तरीही, ते अविरतपणे कार्यरत आहेत.- मारुती चितमपल्ली 

टॅग्स :Puneपुणे