शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आकाशनिरीक्षण प्रदूषणाच्या विळख्यात : डॉ. जयंत नारळीकर; खगोलशास्त्रज्ञ प्रकाश तुपे यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 11:58 IST

अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन या संस्थेतर्फे बारावा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देआकाशात भिरभिरणारी नजर खाली आल्यामुळे जंगल जाणून घेता आले : डॉ. प्रकाश तुपे निसर्गाचे तत्त्वज्ञान जीवनात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा : राम ताकवले

पुणे : पूर्वीचे आणि आताचे पुणे यात कमालीचा फरक पडला आहे. उपनगरे विस्तारली आहेत. शहर आणि उपनगरे ‘प्रकाश’ प्रदूषणाच्या छायेखाली आहेत. आकाशनिरीक्षण करताना प्रकाश नको असतो. त्यामुळे निरीक्षणासाठी शहरांपासून लांब जावे लागते. कारण, आकाशनिरीक्षण प्रकाश प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी केले.अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन या संस्थेतर्फे बारावा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, वनमहर्षी मारुती चितमपल्ली उपस्थित होते. डॉ. जयंत नारळीकर म्हणाले, ‘आकाश तुपे यांच्याशी माझा पूर्वीपासूनचा परिचय आहे. हडपसरला शेतात राहताना तुपे यांना आकाशदर्शनाची गोडी लागली. एकदा उल्कावर्षाव दिसणार आहे, असे समजल्यावर तुपे यांच्या विनंतीवरून मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ‘रात्रीच्या वेळी शहरातील वीज काही काळ बंद ठेवावी’, असे पत्र लिहिले. सुरक्षेच्या कारणास्तव असे करता येणार नाही, अशी दिलगिरी व्यक्त करणारे उत्तर त्यांच्याकडून मिळाले’.‘१९९१ च्या सुमारास एन. सी. राणा यांच्या मदतीने आयुका नुकतीच अस्तित्वात आली होती. त्या वेळी पुण्यातील सर्व खगोलशास्त्र संस्थांची एकत्रित बैठक बोलावली होती. या सर्व संस्थाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न त्या काळी राहून गेला होता. तो अजूनही करता येईल, अशी आशा आहे’, असेही ते म्हणाले.विवेक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कोठडिया यांनी सूत्रसंचालन केले.

तुपे म्हणाले, ‘डॉ. जयंत नारळीकर, डॉ. राम ताकवले, मारुती चितमपल्ली यांसारख्या दिग्गजांचा सहवास मला लाभला. तोंड बंद ठेवले आणि डोळे, कान उघडे ठेवल्यास जंगल कळते, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आकाशात भिरभिरणारी नजर खाली आल्यामुळे जंगल जाणून घेता आले. आकाशाप्रमाणे जंगलाच्याही प्रेमात पडलो.’

राम ताकवले म्हणाले, ‘ज्ञानाने प्रश्न सुटणार असतील, जीवनविषयक दृष्टिकोन व्यापक होणार असेल, तर त्या शिक्षणाचा मूलभूत उद्देश पूर्ण होतो. ज्ञान केवळ ज्ञानासाठी मिळवायचे की जीवनासाठी, हे आपण ठरवायला हवे. चौकटीपासून मुक्त होणे, निसर्गाच्या जवळ जाणे, वैश्विकता, व्यापकता आत्मसात करणे हेच खऱ्या अर्थाने मूल्यात्मक शिक्षण आहे. निसर्गाचे तत्त्वज्ञान जीवनात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.’

विवेक देशपांडे संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना निसर्गाचा परिचय तसेच गड-किल्ले, जंगलाचे दर्शन घडवत आहेत. शिस्तबद्ध कार्यक्रमातून हे ज्ञानार्जन केले जाते. मात्र, आजपर्यंत या कामाची दखल घेण्यात आलेली नाही. तरीही, ते अविरतपणे कार्यरत आहेत.- मारुती चितमपल्ली 

टॅग्स :Puneपुणे