शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ज्योतिष शास्त्र हे मार्गदर्शक - भारत देसडला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:55 IST

ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. आपल्या भविष्याचे सर्वांनाच आकर्षण असल्याने ही गरज भागविण्यासाठी सर्व वर्तमानपत्रांसह वृत्तवाहिन्यांवर राशीभविष्य देण्यात येते. ज्योतिषशास्त्राचे वैज्ञानिकदृष्ट्या स्वत:चे वेगळे महत्त्व असल्याचे प्रतिपादन उद्योजक भारत देसडला यांनी केले.

पुणे : ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. आपल्या भविष्याचे सर्वांनाच आकर्षण असल्याने ही गरज भागविण्यासाठी सर्व वर्तमानपत्रांसह वृत्तवाहिन्यांवर राशीभविष्य देण्यात येते. ज्योतिषशास्त्राचे वैज्ञानिकदृष्ट्या स्वत:चे वेगळे महत्त्व असल्याचे प्रतिपादन उद्योजक भारत देसडला यांनी केले.भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अ‍ॅकॅडमी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ३५ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी हस्तमुद्रिकातज्ज्ञ प्रतिभा मोडक, पं. राजीव शर्मा, बी. जी. पाचार्णे, डॉ. दिलीपकुमार, चंद्रकांत शेवाळे, पुष्पलता शेवाळे, नवीनकुमार शहा, उल्हास पाटकर आदी उपस्थित होते. या वेळी ज्योतिषविषयक १३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. महिला सत्रामध्ये डॉ. प्रीती दवे, शाल्मिका पुंड, अंजू अगरवाल यांनी ज्योतिषविद्येविषयी माहिती दिली.पं. गणेश दुबे, पं. विजय जकातदार, डॉ. सुनंदा राठी, पं. सदाशिव शाळीग्राम यांनी सत्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. या अधिवेशनाला देशाच्या विविध शहरांमधून ६०० च्यावर प्रतिनिधींनी हजेरी लावली. डॉ. अंजली ठोंबरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अरुंधती पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. शुभांगी काटे यांनी आभार मानले.तज्ज्ञांकडून मार्गदर्शनविविध विषयांवर अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पंजाबमधील मोगा येथील पं. अक्षय शर्मा यांनी विवाहज्योतिष, दिल्लीतील अशोक भाटी यांनी अंकज्योतिष, चंदीगडचे राजेश वशिष्ठ यांनी वास्तू आणि ऊर्जा, अहमदाबादहून आलेल्या डॉ. त्रिशला शेठ यांनी वृक्ष आणि वास्तू, पं. मौलेशभाई पटेल यांनी तंत्रशास्त्र व दुर्गाप्रसाद शास्त्री यांनी मंत्रशास्त्र, सोलापूरचे पं. प्रदीप जाधव यांनी श्रीविद्या, दिल्लीचे पं. पद्म उपाध्याय यांनी अध्यात्म ज्योतिष याविषयी मार्गदर्शन केले.