शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मानधनात वाढ व्हावी, तसेच अनेक सुविधा मिळाव्या यांसारख्या अनेक मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील आशा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मानधनात वाढ व्हावी, तसेच अनेक सुविधा मिळाव्या यांसारख्या अनेक मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील आशा सेविकांचे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातही हे आंदोलन १५ जूनपासून सुरू आहे. मात्र, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आशा सेविकांच्या सहनशीलतेचा अंत सोमवारी झाला. मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेसमोर एकत्र येत आशा सेविकांनी धरणे आंदोलन केले. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे अशा अनेक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

जिल्ह्यात आशा सेविकांचे १५ जूनपासून संप सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी जिल्ह्यातील आशा सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. जवळपास पाचशेहून अधिक आशा सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. राज्यातील ६६ हजार आशा सेविका व ४ हजार गटप्रवर्तक संपावर आहेत. आशा स्वयंसेवकांना कराव्या लागत असलेल्या माहितीचे संकलन, अहवाल सादरीकरण, लसीकरण अशा सगळ्या कामाची दरमहा ४ हजार रुपयांची रक्कम पूर्णपणे मिळत नाही. याचबरोबर आशा सेविकांना या कामा व्यतिरिक्त अन्य बहात्तर कामे करावी लागतात. आणि त्या कामाचा मोबदला त्यांना साधारणपणे २ हजार ५०० रुपये मिळतो. पण कोरोनाकाळात त्यांना आठ तास काम करावे लागत असल्यामुळे ही रक्कम मिळणे बंद झाले. सध्या त्यांना दररोज आठ तास काम करूनसुद्धा ५ हजार रुपयांपेक्षा कमी मानधन मिळते आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांच्याकडून अधिक काम देखील करून घेतले गेले आहे. मात्र, या कामाचा मोबदला म्हणून या आशा स्वयंसेविकांना काहीही पैसे देण्यात आले नाहीत.

याच पार्श्वभूमीवर कोरोनाकाळात केल्या गेलेल्या या कामासाठी एप्रिलपासून प्रतिदिन पाचशे रुपये मिळायला हवेत, तसेच त्यांना अँड्रॉइड मोबाईल दिले जावेत, कोरोनाबाधित होऊन मृत्यू पावलेल्या आशा सेविकांच्या वारसांना सरकारी नोकरी मिळावी, तसेच त्यांची मासिक प्राप्ती किमान वेतन एवढी व्हावी या मागण्यांसाठी आशा सेविकांकडून आंदोलन केले जात आहे. त्यासाठी सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आशा सेविकांनी धरणे धरले होते.

चौकट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आशा व गटप्रवर्तकांना मानाचा मुजरा करतात, त्या आरोग्य खात्याचा कणा आहे असे म्हणतात. त्या आपाडीच्या सैनिक आहेत म्हणून त्यांचा गौरव केला जातो. परंतु सैन्य कौतुकावर चालत नाही, पोटावर चालते. यामुळे सरकारने आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा व गटप्रवर्तकांना योग्य किमान वेतन व भत्ते दिले पाहिजे, अशी मागणी यावेळी आशा सेविकांनी केली.

चौकट

कृती समितीने सनदशीर मार्गाने गेली वर्षभर शासनाला निवेदने दिली. आशांनी गेली वर्षभर जिवाची पर्वा न करता सर्व कामे केली, परंतु आशांच्या निवेदनांना कवडीचीही किंमत न दिल्यामुळे नाईलाजाने महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तकांना बेमुदत संपाचा निर्णय घ्यावा लागला आहे. महाराष्ट्र सरकारने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा अंत न पाहता, लवकरात लवकर त्यांच्या मागण्यांवर चर्चा करून समाधानकारकरीत्या सोडवाव्या, असे आवाहन कृती समितीने केले.