शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अरुभय्यांची गाणी कायम मनात रुंजी घालतील - अनुराधा मराठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:29 IST

सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला,’ अशी दिलखुलास दाद अरुण दाते यांच्याकडून मिळायची आणि गायला आणखी हुरूप यायचा.

सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला,’ अशी दिलखुलास दाद अरुण दाते यांच्याकडून मिळायची आणि गायला आणखी हुरूप यायचा. आता यापुढे कधीच अरुभय्यांबरोबर गाता येणार नाही याची खंत वाटते, अशा भावना गायिका अनुराधा मराठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.अरुण दाते यांच्यासह मी ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे शंभराहून अधिक प्रयोग केले. प्रत्येक मैफलीच्या वेळी अरुभय्या नव्याने उलगडत गेले. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला रसिकांची प्रचंड दाद मिळायची, प्रत्येक मैफल ‘हाऊसफुल’ असायची. त्यांच्या बरोबरीने गायन करणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट ठरली. अरुण दाते यांनी आपल्या घरंदाज गायकीने गायनाच्या क्षेत्रात स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले होते. सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. त्यांना प्रत्येक कलाकाराबद्दल कायमच आदर वाटायचा. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला’ अशी दिलखुलास दाद अरुण दाते यांच्याकडून मिळायची आणि गायला आणखी हुरूप यायचा.अरुण दाते यांनी भावसंगीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या मनात त्यांची गाणी पुढील अनेक वर्षे रुंजी घालत राहतील, यात शंका नाही. त्यामुळेच ते गेल्याची खंत कायम अस्वस्थ करणारी आहे. रसिकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणे अवघड असते. हे शिवधनुष्य अरुण दाते यांनी आपल्या गायकीतून लीलया पेलले. ते आजारी असतानाही ‘शुक्रतारा’वर रसिकांनी भरभरून प्रेम केले आणि यापुढेहीकरत राहतील, हीच अरुभय्यांच्या गाण्यांची किमया म्हणावी लागेल. अरुण दाते गाण्यांच्या रूपाने कायम चिरतरुण राहिले. त्यांची गाणी पुढील अनेक वर्षे अजरामर राहतील यात शंका नाही.अरुभय्या मूळचे इंदूरचे. त्यांना इंदूरचा, तेथील संस्कृतीचा खूप अभिमान होता. तिकडे कार्यक्रमाला जायचे असले की ते खूप खूश असत, इंदूरचे भरभरून कौतुक करत. सर्वोतोपरी अत्यंत आनंदी आयुष्य जगणारा हा कलाकार होता. एकदा कार्यक्रमासाठी देवासला गेल्यावर आम्ही पं. कुमार गंधर्व यांच्याकडे गेलो होतो. दाते त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होते. कुमार गंधर्वांच्या खोलीत बसून अरुण दाते यांच्याकडून त्यांच्या आठवणी ऐकायला मिळणे हा दुर्मिळ योग होता. त्या वेळी लागोपाठ दोन कार्यक्रम झाले. मात्र, दातेंच्या गायनात तिळमात्रही थकवा जाणवला नाही. कोणतेही गाणे गाताना ते कायम उत्साही आणि प्रसन्न असत. प्रत्येक गाणे त्याच तन्मयतेने गाण्याचा त्यांचा प्रयत्न असे.‘शुक्रतारा’चे सलग कार्यक्रम असायचे. मला सर्व कार्यक्रमांमध्ये गाणे शक्य नव्हते. एकदा श्रोता म्हणून मी पुण्यातला कार्यक्रम ऐकायला गेले. अरुण दाते यांनी मला समोर पाहिले आणि गायला स्टेजवर बोलावले. त्यांच्या आग्रहास्तव मी ‘शुक्रतारा’ गायले. एवढ्या उंचीवर पोहोचलेला मोठ्या दिलाचा आणि खुल्या मनाचा माणूस मी आजवर पाहिला नाही. एकदा सारसबागेतल्या गणपती मंदिरात आमची गाण्याची मैफल होती. मी सुरुवातीची तीन गाणी म्हणायची आणि त्यानंतर अरुभय्या गायचे. माझी गाणी गाऊन झाल्यावर मी आत आले आणि ते मला म्हणाले, ‘अहो बाई, तुम्ही खूप सुंदर गायलात. आता मला गाण्याचे टेन्शन आले आहे.’सोबतीच्या कलाकाराला याहून अधिक प्रोत्साहन काय ठरु शकेल? त्यांचा नितळ, मुलायम आणि तरल आवाज रसिकांच्या मनावर कायम अधिराज्यगाजवत राहील. त्यांच्यासह गाण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. आता यापुढे कधीच अरुभय्यांबरोबर गाता येणार नाही, याची खंत वाटते.

टॅग्स :arun datearun datemusicसंगीत