शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अरुभय्यांची गाणी कायम मनात रुंजी घालतील - अनुराधा मराठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:29 IST

सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला,’ अशी दिलखुलास दाद अरुण दाते यांच्याकडून मिळायची आणि गायला आणखी हुरूप यायचा.

सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला,’ अशी दिलखुलास दाद अरुण दाते यांच्याकडून मिळायची आणि गायला आणखी हुरूप यायचा. आता यापुढे कधीच अरुभय्यांबरोबर गाता येणार नाही याची खंत वाटते, अशा भावना गायिका अनुराधा मराठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.अरुण दाते यांच्यासह मी ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे शंभराहून अधिक प्रयोग केले. प्रत्येक मैफलीच्या वेळी अरुभय्या नव्याने उलगडत गेले. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला रसिकांची प्रचंड दाद मिळायची, प्रत्येक मैफल ‘हाऊसफुल’ असायची. त्यांच्या बरोबरीने गायन करणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट ठरली. अरुण दाते यांनी आपल्या घरंदाज गायकीने गायनाच्या क्षेत्रात स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले होते. सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. त्यांना प्रत्येक कलाकाराबद्दल कायमच आदर वाटायचा. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला’ अशी दिलखुलास दाद अरुण दाते यांच्याकडून मिळायची आणि गायला आणखी हुरूप यायचा.अरुण दाते यांनी भावसंगीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या मनात त्यांची गाणी पुढील अनेक वर्षे रुंजी घालत राहतील, यात शंका नाही. त्यामुळेच ते गेल्याची खंत कायम अस्वस्थ करणारी आहे. रसिकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणे अवघड असते. हे शिवधनुष्य अरुण दाते यांनी आपल्या गायकीतून लीलया पेलले. ते आजारी असतानाही ‘शुक्रतारा’वर रसिकांनी भरभरून प्रेम केले आणि यापुढेहीकरत राहतील, हीच अरुभय्यांच्या गाण्यांची किमया म्हणावी लागेल. अरुण दाते गाण्यांच्या रूपाने कायम चिरतरुण राहिले. त्यांची गाणी पुढील अनेक वर्षे अजरामर राहतील यात शंका नाही.अरुभय्या मूळचे इंदूरचे. त्यांना इंदूरचा, तेथील संस्कृतीचा खूप अभिमान होता. तिकडे कार्यक्रमाला जायचे असले की ते खूप खूश असत, इंदूरचे भरभरून कौतुक करत. सर्वोतोपरी अत्यंत आनंदी आयुष्य जगणारा हा कलाकार होता. एकदा कार्यक्रमासाठी देवासला गेल्यावर आम्ही पं. कुमार गंधर्व यांच्याकडे गेलो होतो. दाते त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होते. कुमार गंधर्वांच्या खोलीत बसून अरुण दाते यांच्याकडून त्यांच्या आठवणी ऐकायला मिळणे हा दुर्मिळ योग होता. त्या वेळी लागोपाठ दोन कार्यक्रम झाले. मात्र, दातेंच्या गायनात तिळमात्रही थकवा जाणवला नाही. कोणतेही गाणे गाताना ते कायम उत्साही आणि प्रसन्न असत. प्रत्येक गाणे त्याच तन्मयतेने गाण्याचा त्यांचा प्रयत्न असे.‘शुक्रतारा’चे सलग कार्यक्रम असायचे. मला सर्व कार्यक्रमांमध्ये गाणे शक्य नव्हते. एकदा श्रोता म्हणून मी पुण्यातला कार्यक्रम ऐकायला गेले. अरुण दाते यांनी मला समोर पाहिले आणि गायला स्टेजवर बोलावले. त्यांच्या आग्रहास्तव मी ‘शुक्रतारा’ गायले. एवढ्या उंचीवर पोहोचलेला मोठ्या दिलाचा आणि खुल्या मनाचा माणूस मी आजवर पाहिला नाही. एकदा सारसबागेतल्या गणपती मंदिरात आमची गाण्याची मैफल होती. मी सुरुवातीची तीन गाणी म्हणायची आणि त्यानंतर अरुभय्या गायचे. माझी गाणी गाऊन झाल्यावर मी आत आले आणि ते मला म्हणाले, ‘अहो बाई, तुम्ही खूप सुंदर गायलात. आता मला गाण्याचे टेन्शन आले आहे.’सोबतीच्या कलाकाराला याहून अधिक प्रोत्साहन काय ठरु शकेल? त्यांचा नितळ, मुलायम आणि तरल आवाज रसिकांच्या मनावर कायम अधिराज्यगाजवत राहील. त्यांच्यासह गाण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. आता यापुढे कधीच अरुभय्यांबरोबर गाता येणार नाही, याची खंत वाटते.

टॅग्स :arun datearun datemusicसंगीत