शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 13:56 IST

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती.

पुणे - जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मेजर शशिधर नायर यांना वीरमरण आले. शहीद मेजर शशिधर नायर हे दहा दिवसांपूर्वीच पत्नीला अलविदा करून कर्तव्यावर निघाले होते. त्यावेळी, मी लवकरच परत येईन असे वचन शशिधर यांनी आपल्या पत्नीला दिले होते. पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शशिधर परत आले पण काहीही बोलले नाहीत. यावेळी ते परतले ते थेट तिरंग्यात लपेटून. 

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. कारण, नुकतीच कुठे तृप्ती आणि शशिधर यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती. एका नजरेतील प्रेमापासून लग्नापर्यंतचा या दोघाच्या प्रेमविवाहाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आर्मीच्या सर्कलमध्येही या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा नेहमीच रंगत होती. मात्र, काळाने घात केला आणि तृप्ती अन् भारतमातेचा रिअल हिरो आपल्याला सोडून गेला. 

शशिधर आणि तृप्ती यांची पुण्यातच एका म्युचुअल मित्रामुळे भेट झाली. पहिल्याच नजरेत दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. त्यावेळी, शशि 27 वर्षांचे आणि तृप्ती 26 वर्षांच्या होत्या. दोघांनीही सहा महिन्यानंतर साखरपुडा केला. मात्र, साखरपुड्याच्या 8 महिन्यानंतर तृप्ती यांना गंभीर आजार झाला. या आजारामुळे त्यांच्या शरीराची हालचाल मंदावली. त्यांना चक्क व्हीलचेअरची गरज भासू लागली. त्यावेळी, मित्रांनी शशि यांना लग्न मोडण्याचा सल्ला दिला. मात्र, भारतमातेप्रमाणेच तृप्तीवरही तितकेच प्रेम करणाऱ्या शशिधर यांनी मित्रांना स्पष्ट नकार दिला. तसेच तृप्तीला दिलेल्या वचनाप्रमाणे 2012 मध्ये तिच्याशी लग्न केलं. तृप्तीला स्वीकारून आयुष्याच्या परीक्षेत मेजर शशि फर्स्ट क्लास उत्तीर्ण झाला होता. पण, तृप्ती यांचा हा आजार अधिकच वाढत गेला. तरीही, शशि यांनी कधीच तक्रार केली नाही. उलट, रुग्णालयात नेण्यापासून तिची सर्व काळजी ते घेऊ लागले. त्यामुळे काही दिवसांतच आर्मीच्या सर्कलमध्येही हा जोडा सर्वांचा लाडका बनला. 

शशि यांची पोस्टींग हा तृप्ती यांच्यासाठी नेहमीच चिंतेच कारण असायचा. मात्र, शशि दरवेळी जाताना मी लवकच परत येईन, असे सांगून जायचे. पुण्यात एक महिन्यांची सुट्टी घालवल्यानंतर 2 जानेवारी रोजी शशि यांनी पत्नीला अलविदा केले. जाताना, लवकरच परत येईल, असे वचनही दिले. नेहमीप्रमाणे यावेळीही शशिने तृप्तीला दिलेलं वचन पूर्ण केलं. पण, यावेळी तो परतला, ते तिरंग्यात लपेटून. तृप्तीवर जिवापाड प्रेम करणारा शशि भारतमातेवरील प्रेमाखातर शहीद झाला होता. शशिला वीरमरण आले होते. 

टॅग्स :Indian Army Dayभारतीय सैन्य दिनMartyrशहीदLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान