शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 13:56 IST

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती.

पुणे - जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मेजर शशिधर नायर यांना वीरमरण आले. शहीद मेजर शशिधर नायर हे दहा दिवसांपूर्वीच पत्नीला अलविदा करून कर्तव्यावर निघाले होते. त्यावेळी, मी लवकरच परत येईन असे वचन शशिधर यांनी आपल्या पत्नीला दिले होते. पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शशिधर परत आले पण काहीही बोलले नाहीत. यावेळी ते परतले ते थेट तिरंग्यात लपेटून. 

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. कारण, नुकतीच कुठे तृप्ती आणि शशिधर यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती. एका नजरेतील प्रेमापासून लग्नापर्यंतचा या दोघाच्या प्रेमविवाहाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आर्मीच्या सर्कलमध्येही या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा नेहमीच रंगत होती. मात्र, काळाने घात केला आणि तृप्ती अन् भारतमातेचा रिअल हिरो आपल्याला सोडून गेला. 

शशिधर आणि तृप्ती यांची पुण्यातच एका म्युचुअल मित्रामुळे भेट झाली. पहिल्याच नजरेत दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. त्यावेळी, शशि 27 वर्षांचे आणि तृप्ती 26 वर्षांच्या होत्या. दोघांनीही सहा महिन्यानंतर साखरपुडा केला. मात्र, साखरपुड्याच्या 8 महिन्यानंतर तृप्ती यांना गंभीर आजार झाला. या आजारामुळे त्यांच्या शरीराची हालचाल मंदावली. त्यांना चक्क व्हीलचेअरची गरज भासू लागली. त्यावेळी, मित्रांनी शशि यांना लग्न मोडण्याचा सल्ला दिला. मात्र, भारतमातेप्रमाणेच तृप्तीवरही तितकेच प्रेम करणाऱ्या शशिधर यांनी मित्रांना स्पष्ट नकार दिला. तसेच तृप्तीला दिलेल्या वचनाप्रमाणे 2012 मध्ये तिच्याशी लग्न केलं. तृप्तीला स्वीकारून आयुष्याच्या परीक्षेत मेजर शशि फर्स्ट क्लास उत्तीर्ण झाला होता. पण, तृप्ती यांचा हा आजार अधिकच वाढत गेला. तरीही, शशि यांनी कधीच तक्रार केली नाही. उलट, रुग्णालयात नेण्यापासून तिची सर्व काळजी ते घेऊ लागले. त्यामुळे काही दिवसांतच आर्मीच्या सर्कलमध्येही हा जोडा सर्वांचा लाडका बनला. 

शशि यांची पोस्टींग हा तृप्ती यांच्यासाठी नेहमीच चिंतेच कारण असायचा. मात्र, शशि दरवेळी जाताना मी लवकच परत येईन, असे सांगून जायचे. पुण्यात एक महिन्यांची सुट्टी घालवल्यानंतर 2 जानेवारी रोजी शशि यांनी पत्नीला अलविदा केले. जाताना, लवकरच परत येईल, असे वचनही दिले. नेहमीप्रमाणे यावेळीही शशिने तृप्तीला दिलेलं वचन पूर्ण केलं. पण, यावेळी तो परतला, ते तिरंग्यात लपेटून. तृप्तीवर जिवापाड प्रेम करणारा शशि भारतमातेवरील प्रेमाखातर शहीद झाला होता. शशिला वीरमरण आले होते. 

टॅग्स :Indian Army Dayभारतीय सैन्य दिनMartyrशहीदLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान