शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 13:56 IST

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती.

पुणे - जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मेजर शशिधर नायर यांना वीरमरण आले. शहीद मेजर शशिधर नायर हे दहा दिवसांपूर्वीच पत्नीला अलविदा करून कर्तव्यावर निघाले होते. त्यावेळी, मी लवकरच परत येईन असे वचन शशिधर यांनी आपल्या पत्नीला दिले होते. पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शशिधर परत आले पण काहीही बोलले नाहीत. यावेळी ते परतले ते थेट तिरंग्यात लपेटून. 

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. कारण, नुकतीच कुठे तृप्ती आणि शशिधर यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती. एका नजरेतील प्रेमापासून लग्नापर्यंतचा या दोघाच्या प्रेमविवाहाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आर्मीच्या सर्कलमध्येही या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा नेहमीच रंगत होती. मात्र, काळाने घात केला आणि तृप्ती अन् भारतमातेचा रिअल हिरो आपल्याला सोडून गेला. 

शशिधर आणि तृप्ती यांची पुण्यातच एका म्युचुअल मित्रामुळे भेट झाली. पहिल्याच नजरेत दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. त्यावेळी, शशि 27 वर्षांचे आणि तृप्ती 26 वर्षांच्या होत्या. दोघांनीही सहा महिन्यानंतर साखरपुडा केला. मात्र, साखरपुड्याच्या 8 महिन्यानंतर तृप्ती यांना गंभीर आजार झाला. या आजारामुळे त्यांच्या शरीराची हालचाल मंदावली. त्यांना चक्क व्हीलचेअरची गरज भासू लागली. त्यावेळी, मित्रांनी शशि यांना लग्न मोडण्याचा सल्ला दिला. मात्र, भारतमातेप्रमाणेच तृप्तीवरही तितकेच प्रेम करणाऱ्या शशिधर यांनी मित्रांना स्पष्ट नकार दिला. तसेच तृप्तीला दिलेल्या वचनाप्रमाणे 2012 मध्ये तिच्याशी लग्न केलं. तृप्तीला स्वीकारून आयुष्याच्या परीक्षेत मेजर शशि फर्स्ट क्लास उत्तीर्ण झाला होता. पण, तृप्ती यांचा हा आजार अधिकच वाढत गेला. तरीही, शशि यांनी कधीच तक्रार केली नाही. उलट, रुग्णालयात नेण्यापासून तिची सर्व काळजी ते घेऊ लागले. त्यामुळे काही दिवसांतच आर्मीच्या सर्कलमध्येही हा जोडा सर्वांचा लाडका बनला. 

शशि यांची पोस्टींग हा तृप्ती यांच्यासाठी नेहमीच चिंतेच कारण असायचा. मात्र, शशि दरवेळी जाताना मी लवकच परत येईन, असे सांगून जायचे. पुण्यात एक महिन्यांची सुट्टी घालवल्यानंतर 2 जानेवारी रोजी शशि यांनी पत्नीला अलविदा केले. जाताना, लवकरच परत येईल, असे वचनही दिले. नेहमीप्रमाणे यावेळीही शशिने तृप्तीला दिलेलं वचन पूर्ण केलं. पण, यावेळी तो परतला, ते तिरंग्यात लपेटून. तृप्तीवर जिवापाड प्रेम करणारा शशि भारतमातेवरील प्रेमाखातर शहीद झाला होता. शशिला वीरमरण आले होते. 

टॅग्स :Indian Army Dayभारतीय सैन्य दिनMartyrशहीदLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान