शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

डोकलामसारखे वाद पुन्हा होण्याची शक्यता,जवानांना सज्ज राहण्याच्या सूचना - लष्करप्रमुख बिपिन रावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:10 IST

‘‘भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुणे : ‘‘भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना जवानांना दिल्या आहेत,’’ असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे जनरल बी. सी. जोशी मेमोरिअल व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. ‘वर्तमानातील भू-सामरिक स्थितीतील भारतासमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एन. हॅरिस, संरक्षण आणि सामरिक विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, उपस्थित होते.रावत म्हणाले, की दहशतवाद आणि कट्टरतावाद वेगाने वाढत आहेत. आशिया खंड जगाचे केंद्र बनत आहे. जगात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी चीन राजकीय, आर्थिक आणि लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही देशांत डोकलाम प्रश्नावरून तणावपूर्ण वातावरण आहे. सीमा अस्पष्ट असल्याने चीन अनेक भागांवर मालकी हक्क सांगत आहे. त्यामुळेच भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा होऊ शकतात. फाळणी आणि वसाहतवादी धोरणामुळे काश्मीरप्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तान छुप्या युद्धाद्वारे काश्मीर अशांत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. कट्टरपंथीय छुप्या पद्धतीने मदत करीत आहेत. देशातील आंतरिक सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अशा घटकांना नष्ट करणे महत्त्वाचे असल्याचेही रावत यांनी सांगितले.चीन आणि भारतातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांतील लष्करांचा संयुक्तिक सराव घेण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी भारताने चीनच्या सैनिकांना सरावासाठी आमंत्रित केले होते. या वर्षी चीनकडून हा प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप कुठलेच निमंत्रण आलेले नाही. - बिपिन रावत, लष्करप्रमुख.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDoklamडोकलाम