शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

नीरा-भीमा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारवाढीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:11 IST

लाखेवाडी: केंद्र शासनाचे इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याने साखर उद्योगाला इथेनॉलचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे कारखान्याच्या इथेनॉल ...

लाखेवाडी: केंद्र शासनाचे इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याने साखर उद्योगाला इथेनॉलचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची क्षमता प्रतिदिनी ३० हजारावरून एक लाख पाच हजार केएलपीडी करण्यासाठी विस्तारवाढ केली जाणार आहे. त्याकरिता प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळाली असून लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होईल, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची सन २०२०-२१ वर्षाची २३ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी कारखान्याच्या शहाजीराव पाटील सभागृहामध्ये उत्साहात पार पडली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. यावेळी सभेत मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.

यंदाच्या गळीत हंगामापासून कारखाना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने बायो सीएनजी गॅस निर्मितीचा देशातील सहकारी तत्त्वावरील पहिला महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करीत आहे. सदर प्रकल्प देशात आदर्शवत असा असणार आहे, अशी माहिती देऊन हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. कारखान्याने अहवाल २०२०-२१ वर्षात ५, ५९, ७९६ मे.टन उसाचे गाळप करून ४, ८९, ८०३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा १०.२७ मिळाला आहे. तर सहवीज निर्मिती प्रकल्पातून ४, ६६, ३०, ३६३ युनिट उत्पादन घेऊन २, ८०, ३३, २०० युनिट वीज विक्री केली आहे. तसेच इथेनॉल प्रकल्पातून १, ८,२,७७९ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. त्याचप्रमाणे कृषिरत्न सेंद्रिय खताच्या ५१ हजार बॅगची निर्मिती करण्यात आली आहे. कारखान्याची उसाची एफआरपी २२६९ रुपये असून आजअखेर २१५० रुपये रक्कम अदा केली आहे. उर्वरित देय ११९ रुपये लवकरच अदा केली जाईल,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

कारखान्याचे चालू वर्षीच्या गळीत हंगामापासून ऊस वाहतुकीचे २५० ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर चालविण्यात येणार आहेत. आगामी गळीत हंगामात कारखाना सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे. इथेनॉलचे १ कोटी ७५ लाख लिटर निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे पाटील यांनी भाषणात सांगितले.

सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, किरण पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, माणिकराव खाडे, गोविंद रणवरे, युवराज रणमोडे उपस्थित होते. सभेत विषयांचे वाचन कार्यकारी संचालक डी.एन.मरकड यांनी केले. आभार उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले.

नीरा -भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभेत मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

२५०९२०२१-बारामती-०६