शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

लोकसहभागातून केलेले जलसंधारणाचे काम कौतुस्कापद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST

सासवड : गावाच्या एकीचे बळ काय असते हे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. लोकसहभागातून जलसंधारणाबरोबर मन संधारणाचे केलेले काम ...

सासवड : गावाच्या एकीचे बळ काय असते हे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. लोकसहभागातून जलसंधारणाबरोबर मन संधारणाचे केलेले काम अत्यंत कौतुस्कापद आहे, अशा शब्दात ग्रामस्थांचे कौतूक करतानाच आपण केलेल्या कामात सातत्य ठेवावे. मायक्रो प्लॅनिंग करून यापुढील कामांचे नियोजन करावे. तुम्ही एक पाऊल पुढे आल्यास शासन दोन पावले पुढे येण्यास तयार आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.

उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथील गावाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देवून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामांची पाहणी केली. लोकसहभागातून केलेली कामे पाहून डॉ. देशमुख यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. या वेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गावात पाणीसाठा वाढल्याने गावचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी मोठा उपयोग होईल. त्याचबरोबर पाणी पातळी वाढली म्हणून पाण्याचा गैरवापर किंवा अतिवापर न करता काटकसरीने वापर करा. जी मदत लागेल ती सर्व मदत देण्यासाठी शासन तयार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, विभागीय अधिकारी आबासाहेब लाड, तालुका समन्वयक मयूर साळुंखे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे, छोटे पाटबंधारे विभागाचे अभियंता ए. एस. दिलपाक, सरपंच संतोष कुंभारकर, माजी चेअरमन मानसिंग झेंडे, नामदेव कुंभारकर, जलमित्र रामदास भोसले, भालेकर, अमोल नेटवे आदी उपस्थित होते. फाउंडेशनचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले कि, एखाद्या गावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली की, गावातील नागरिक अगदी हुरळून जातात आणि कामे मागे पडतात. त्यामुळे प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता जमिनीवर राहून कामात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा आणि पुढील कामात जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून जल व्यवस्थापन, माती व्यवस्थापन, गवताची लागवड, पाण्याचा योग्य वापर या कामांना प्राधान्य द्या. सरपंच संतोष कुंभारकर यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक अर्जुन कुंभारकर यांनी आभार मानले.

फोटो ओळ ; उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देवून जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, रूपाली सरनोबत तसेच उपस्थित अधिकारी आणि गावचे ग्रामस्थ.

संलग्‍नके क्षेत्र

फाउंडेशनचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले कि, एखाद्या गावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली कि, गावातील नागरिक अगदी हुरळून जातात आणि कामे मागे पडतात. त्यामुळे प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता जमिनीवर राहून कामात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील कामात जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून जलव्यवस्थापन, माती व्यवस्थापन, गवताची लागवड, पाण्याचा योग्य वापर या कामांना प्राधान्य द्या असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले आहे. सरपंच संतोष कुंभारकर यांनी प्रास्ताविक करताना गावाने केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच पुढील काळात करण्यात येणाऱ्या कामासाठी शासकीय निधी देण्याचे आवाहन केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक अर्जुन कुंभारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

फोटो : उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देवून जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. या वेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, रूपाली सरनोबत तसेच अधिकारी आणि गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.