शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अनुपम खेर यांचा 'राजीनामा' नाही तर 'यशस्वी' माघार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 17:29 IST

अवघ्या वर्षभराच्या कारकिर्दीत केवळ दोन वेळा एफटीआयआय'ला भेट देणाऱ्या खेर यांची कारकीर्द कामापेक्षा गैरहजेरीमुळे लक्षात राहणारी आहे. 

पुणे :फिल्म अँड टेलिव्हिजन इस्टिट्यूटचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी कामाच्या व्यस्ततेमुळे राजीनामा दिला आहे. अवघ्या वर्षभराच्या कारकिर्दीत केवळ दोन वेळा एफटीआयआय'ला भेट देणाऱ्या खेर यांची कारकीर्द कामापेक्षा गैरहजेरीमुळे लक्षात राहणारी आहे. 

                 गजेंद्र चौहान यांची एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर तिथे झालेला विरोध संपूर्ण देशाने अनुभवला होता. या काळात घडलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे आंदोलनाला मिळालेले वळण  आणि त्यातून संस्थेची झालेली बेअब्रू अजूनही भरून निघालेली नाही. सरकारने हट्टाने चौहान यांची कारकीर्द पूर्ण झाल्यावर खेर यांची त्यांच्याजागी नेमणूक केली होती. त्यांच्या नेमणुकीमुळे अभिनय आणि अनुभव संपन्न व्यक्तीची निवड झाल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र दुर्दैवाने कामाच्या व्यस्ततेमुळे खेर यांनी संस्थेला फारशी हजेरीचं लावली नाही. अगदी सुरुवातीला ऑक्टोबर २०१७मध्ये सूत्र हातात घेतल्यावर त्यांचे थेट नऊ महिन्यांनी अर्थात जुलै २०१८मध्ये दर्शन झाले. त्यानंतर आला तो त्यांचा राजीनामाचं !

             मुळात आधी चौहान यांना काम करू न दिल्याने आणि खेर यांना काम करण्यास वेळ न मिळाल्याने संस्थेत अनेक गैरसोयी असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा सूर आहे. स्वतः खेर यांनी जुलैत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या मात्र त्यावर काहीही ऍक्शन घेण्यात आली नसल्याची तक्रार वारंवार करण्यात आली आहे. त्यात सध्या सोशल मीडियात सूरु असलेल्या 'मी टू' आंदोलनात एफटीआयआयच्या विद्यार्थिनींनी उडी घेतली आहे. हे सर्व प्रकरण वाढण्याच्या आधीच खेर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे वादात अडकून टीका होण्याआधीचं खेर यांची माघार 'यशस्वी' मानायला हरकत नाही. 

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरFTIIएफटीआयआयResignationराजीनामा