शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

लॉकडाऊनची एक घोषणा आणि सगळे शहर.कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोनाची टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर झाली आणि सगळे शहर जणू कोमातच गेले होते. बंद दुकाने, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोनाची टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर झाली आणि सगळे शहर जणू कोमातच गेले होते. बंद दुकाने, ओस रस्ते, निर्मनुष्य चौक, गल्लीबोळ आणि जोडीला आठवणही नको वाटावी अशी जीवघेणी शांतता... हसत्या खेळत्या पुण्याला कोमात नेणाऱ्या टाळेबंदीला वर्ष झाले आहे. कोरोनाची भीती अजूनही कायमच आहे, पुन्हा ती वाढू लागली आहे. पण तरीही कोणालाच ती क्रुर, जीव घेणारी आणि सगळे चलनवलन बंद पाडणारी टाळेबंदी नको आहे.

कष्टकरी पुण्यालापुर्व भागात याचा सर्वाधिक फटका बसला तरी नोकदारांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आयुष्यावर परिणाम झाला. हातावरचे पोट असलेले विडी कामगार, वडापाव सारख्या पदार्थांच्या गाड्या लावणारे, बुट पॉलिश, फिटरकाम करून घर चालवणारे, रिक्षावाले, मोलकरणी, फुलविक्रेते असे सगळे गरीब कष्टकरी समाजघटक टाळेबंदीत रगडून निघाले. किमान ७ ते ८ लाख गरीबांची रोजीरोटीच कोरोनाने हिसकावली.

नोकरदारांची कार्यालयेच बंद झाली. त्यांनाही घरात बसावे लागले. कामच नाही, म्हणून ऊत्पादन नाही, म्हणून पगारही नाही यातून तेही बेरोजगार झाले. काहींच्या पगारावरच संक्रात आली. कर्जाचे हप्ते डोक्यावर बसले. शिल्लक घर चालवायला खर्ची पडू लागली आणि संपलीही. २ ते ४ लाख असे बेकाम झाले.

व्यापाऱ्यांची दुकाने बंद रािहल्याने तेही बेजार, वैद्यक व्यावसायिकांचीच काय ती या काळात बरकत होती. मात्र त्यालाही करूणेची किनार होती. रूग्णालयात जागा नाही, कुठे ऑक्सिजन सिलेंडर नाही, कुठे वेळेवर रूग्णवाहिकाच मिळाली नाही म्हणून अनेकांचे जीव गेले. किराणा दुकानात गर्दी ऊसळायची कारण त्यांनाही वेळेचे बंधन होते. वर्ष झाले तरीही सगळे कसे कालच झाले असावे असे अजूनही अनेकांना वाटते. तशीच वेळ पुन्हा आल्याचे दिसू लागल्याने चिंतेत भरच पडू लागली आहे.काळजी घेऊ, नियम पाळू पण लॉकडाऊन नको अशीच नागरिकांची मागणी आहे.