शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शहरावर ऐन सणासुदीत कचरा संकट

By admin | Updated: October 8, 2014 05:22 IST

गेल्या महिनाभराचे वीजबिल थकल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाची वीज पुन्हा ‘महावितरण’ने तोडली आहे.

पुणे : गेल्या महिनाभराचे वीजबिल थकल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाची वीज पुन्हा ‘महावितरण’ने तोडली आहे. सुमारे आठ लाख रुपयांची थकबाकी असल्याने हा प्रकल्प गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात पुन्हा पाऊस सुरू झाला असल्याने साचलेला कचरा भिजला असल्याने, या कचऱ्यावर इतर प्रकल्पांतही प्रक्रिया करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये शहरावर पुन्हा एकदा कचरासंकट ओढावले आहे.शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे १६०० टन कचऱ्यावर पालिकेकडून हंजर, दिशा, रोकेम; तसेच अजिंक्य या प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केली जाते. तर, उर्वरित कचरा उरुळी येथील कचरा डेपोमध्ये कँपिंग केला जातो. त्यात सर्वाधिक ३०० ते ३५० टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाचे वीजबिल थकबाकी असल्याने प्रकल्प व्यवस्थापनाकडून ती भरण्यास असर्मथता दर्शविण्यात आल्याने ‘महावितरण’कडून वीज तोडली जात आहे. या पूर्वी दोन वेळा ‘महावितरण’ने या प्रकल्पाची वीजजोड तोडला असताना, पालिकेने ही थकबाकी भरली आहे. दरम्यान, मागील महिन्याचे सुमारे ८ लाखांचे बिल थकल्याने तीन दिवसांपूर्वी या प्रकल्पाची वीज तोडण्यात आली होती. त्यातच महापालिकेस सलग पाच दिवसांची सुटी असल्याने हे बिल प्रशासनाने भरलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प आज दिवसभरही अंधारतच असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पात प्रक्रिया न होणारा कचरा शहरात; तसेच पालिकेच्या कचरा रॅम्पवर साठवून ठेवण्यात आलेला आहे.(प्रतिनिधी)