शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अण्णांची बहीण अन् अरुणाची आत्या हीच मोठी पदवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:29 IST

अण्णांचे काम मोठे आहे, हे पूर्वीच ओळखले होते. आयुष्यभर त्यांनी चांगल्या कार्याला महत्त्व दिले.

पुणे : अण्णांचे काम मोठे आहे, हे पूर्वीच ओळखले होते. आयुष्यभर त्यांनी चांगल्या कार्याला महत्त्व दिले. मी आणि वहिनी अण्णांना आमच्या कुवतीप्रमाणे सहाय्य करीत आलो. खरे तर अण्णांचे काम डोंगराएवढे आहे. आम्ही केवळ खारीचा वाटा उचलला. अण्णांच्या मुलांवर वेगळे असे संस्कार करावे लागले नाहीत. चांगल्या-वाईटाची परीक्षा करा, एवढचे मुलांना सदोदित सांगितले. डॉ. रा. चिं. ढेरे यांची बहीण आणि डॉ. अरुणा ढेरे यांची आत्या हीच आयुष्यातील सर्वात मोठी पदवी असल्याचे भावोद्गार श्रीमती प्रमिलाताई चिंतामण ढेरे यांनी व्यक्त केले.कला-साहित्य-सामाजिक कार्य या क्षेत्रात लक्षणीय कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी अव्याहतपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीशक्तीचा जन्मदा प्रतिष्ठान आणि स्वानंदी पुणे या संस्थांतर्फे तपस्या पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाचा पुरस्कार श्रेष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या भगिनी आणि प्रसिद्ध लेखिका, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या आत्या श्रीमती प्रमिलाताई चिंतामण ढेरे यांना सोमवारी प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदाचे दहावे वर्ष आहे.मयूर कॉलनीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात प्रसिद्ध चित्रकार शि. द. फडणीस आणि शकुंतला फडणीस यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमती प्रमिलाताई ढेरे यांच्या खंबीर; पण शांत, समर्पित व सेवाभावी जीवनकार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. जन्मदा प्रतिष्ठानचे मिलिंद सबनीस,स्वानंदी पुणेच्या अपर्णा केळकर व्यासपीठावर होत्या.आयुष्याच्या वाटचालीत रक्ताच्या नात्यापलीकडे प्रेम करणारी माणसे मिळाली, म्हणून निभावता आले, असे सांगून श्रीमती प्रमिलाताई ढेरे म्हणाल्या, की आयुष्यात धन मिळाले नाही, याची खंत वाटली नाही. अनेकांच्या प्रेमाच्या जोरावर सर्व जण आयुष्य संपन्न आणि सन्मानाने जगलो. प्रास्ताविकात मिलिंद सबनीस यांनी संस्थांच्या कार्याची महिती दिली. गंगोत्री बिल्डरचे गणेश जाधव तसेच अपर्णा आवटे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात साची कोल्हापुरे हिने गायिलेल्या भूमाता स्तोत्राने झाली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा केळकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात समजुतीच्या काठाशी... ही मैफल झाली. यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या कविता, ललितलेख, कथा यांचे वाचन आणि काही कवितांचेगायन झाले. या कार्यक्रमाचे संहितालेखन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे होते. यातअपर्णा केळकर, अनुराधा जोशी, अक्षय वाटवे, गौरी देशपांडे, स्नेहल दामले, मिलिंद गुणे, आनंद कुºहेकर यांचा सहभाग होता.>पुण्याईमुळे संमेलन यशस्वीअरुणा ढेरे यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामागील रहस्य काय आहे हे आज समजले, असे सांगून शि. द. फडणीस म्हणाले, ‘अरुणा ढेरे यांना त्यांच्या शालेय जीवनात प्रमिलाताई यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. त्यांनी शब्दांच्या माध्यमातून भरतकाम, कशिदाकाम केले असणार. नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनापूर्वी वादळे उठली. अरुणा त्याला कशी तोंड देणार, असा प्रश्न मनात आला होता. पण पुण्याईमुळे संमेलन यशस्वी झाले. संपूर्ण महाराष्ट्र तिच्यामागे उभा राहिला. कुठल्याही परिस्थितीत तोल न जाणे हा ढेरे कुटुंबाचा वारसा आहे तो तिने जपला,’ असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.