शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

अण्णांची बहीण अन् अरुणाची आत्या हीच मोठी पदवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:29 IST

अण्णांचे काम मोठे आहे, हे पूर्वीच ओळखले होते. आयुष्यभर त्यांनी चांगल्या कार्याला महत्त्व दिले.

पुणे : अण्णांचे काम मोठे आहे, हे पूर्वीच ओळखले होते. आयुष्यभर त्यांनी चांगल्या कार्याला महत्त्व दिले. मी आणि वहिनी अण्णांना आमच्या कुवतीप्रमाणे सहाय्य करीत आलो. खरे तर अण्णांचे काम डोंगराएवढे आहे. आम्ही केवळ खारीचा वाटा उचलला. अण्णांच्या मुलांवर वेगळे असे संस्कार करावे लागले नाहीत. चांगल्या-वाईटाची परीक्षा करा, एवढचे मुलांना सदोदित सांगितले. डॉ. रा. चिं. ढेरे यांची बहीण आणि डॉ. अरुणा ढेरे यांची आत्या हीच आयुष्यातील सर्वात मोठी पदवी असल्याचे भावोद्गार श्रीमती प्रमिलाताई चिंतामण ढेरे यांनी व्यक्त केले.कला-साहित्य-सामाजिक कार्य या क्षेत्रात लक्षणीय कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी अव्याहतपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीशक्तीचा जन्मदा प्रतिष्ठान आणि स्वानंदी पुणे या संस्थांतर्फे तपस्या पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाचा पुरस्कार श्रेष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या भगिनी आणि प्रसिद्ध लेखिका, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या आत्या श्रीमती प्रमिलाताई चिंतामण ढेरे यांना सोमवारी प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदाचे दहावे वर्ष आहे.मयूर कॉलनीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात प्रसिद्ध चित्रकार शि. द. फडणीस आणि शकुंतला फडणीस यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमती प्रमिलाताई ढेरे यांच्या खंबीर; पण शांत, समर्पित व सेवाभावी जीवनकार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. जन्मदा प्रतिष्ठानचे मिलिंद सबनीस,स्वानंदी पुणेच्या अपर्णा केळकर व्यासपीठावर होत्या.आयुष्याच्या वाटचालीत रक्ताच्या नात्यापलीकडे प्रेम करणारी माणसे मिळाली, म्हणून निभावता आले, असे सांगून श्रीमती प्रमिलाताई ढेरे म्हणाल्या, की आयुष्यात धन मिळाले नाही, याची खंत वाटली नाही. अनेकांच्या प्रेमाच्या जोरावर सर्व जण आयुष्य संपन्न आणि सन्मानाने जगलो. प्रास्ताविकात मिलिंद सबनीस यांनी संस्थांच्या कार्याची महिती दिली. गंगोत्री बिल्डरचे गणेश जाधव तसेच अपर्णा आवटे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात साची कोल्हापुरे हिने गायिलेल्या भूमाता स्तोत्राने झाली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा केळकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात समजुतीच्या काठाशी... ही मैफल झाली. यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या कविता, ललितलेख, कथा यांचे वाचन आणि काही कवितांचेगायन झाले. या कार्यक्रमाचे संहितालेखन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे होते. यातअपर्णा केळकर, अनुराधा जोशी, अक्षय वाटवे, गौरी देशपांडे, स्नेहल दामले, मिलिंद गुणे, आनंद कुºहेकर यांचा सहभाग होता.>पुण्याईमुळे संमेलन यशस्वीअरुणा ढेरे यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामागील रहस्य काय आहे हे आज समजले, असे सांगून शि. द. फडणीस म्हणाले, ‘अरुणा ढेरे यांना त्यांच्या शालेय जीवनात प्रमिलाताई यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. त्यांनी शब्दांच्या माध्यमातून भरतकाम, कशिदाकाम केले असणार. नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनापूर्वी वादळे उठली. अरुणा त्याला कशी तोंड देणार, असा प्रश्न मनात आला होता. पण पुण्याईमुळे संमेलन यशस्वी झाले. संपूर्ण महाराष्ट्र तिच्यामागे उभा राहिला. कुठल्याही परिस्थितीत तोल न जाणे हा ढेरे कुटुंबाचा वारसा आहे तो तिने जपला,’ असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.