शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

अण्णांची बहीण अन् अरुणाची आत्या हीच मोठी पदवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:29 IST

अण्णांचे काम मोठे आहे, हे पूर्वीच ओळखले होते. आयुष्यभर त्यांनी चांगल्या कार्याला महत्त्व दिले.

पुणे : अण्णांचे काम मोठे आहे, हे पूर्वीच ओळखले होते. आयुष्यभर त्यांनी चांगल्या कार्याला महत्त्व दिले. मी आणि वहिनी अण्णांना आमच्या कुवतीप्रमाणे सहाय्य करीत आलो. खरे तर अण्णांचे काम डोंगराएवढे आहे. आम्ही केवळ खारीचा वाटा उचलला. अण्णांच्या मुलांवर वेगळे असे संस्कार करावे लागले नाहीत. चांगल्या-वाईटाची परीक्षा करा, एवढचे मुलांना सदोदित सांगितले. डॉ. रा. चिं. ढेरे यांची बहीण आणि डॉ. अरुणा ढेरे यांची आत्या हीच आयुष्यातील सर्वात मोठी पदवी असल्याचे भावोद्गार श्रीमती प्रमिलाताई चिंतामण ढेरे यांनी व्यक्त केले.कला-साहित्य-सामाजिक कार्य या क्षेत्रात लक्षणीय कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी अव्याहतपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीशक्तीचा जन्मदा प्रतिष्ठान आणि स्वानंदी पुणे या संस्थांतर्फे तपस्या पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाचा पुरस्कार श्रेष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या भगिनी आणि प्रसिद्ध लेखिका, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या आत्या श्रीमती प्रमिलाताई चिंतामण ढेरे यांना सोमवारी प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदाचे दहावे वर्ष आहे.मयूर कॉलनीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात प्रसिद्ध चित्रकार शि. द. फडणीस आणि शकुंतला फडणीस यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमती प्रमिलाताई ढेरे यांच्या खंबीर; पण शांत, समर्पित व सेवाभावी जीवनकार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. जन्मदा प्रतिष्ठानचे मिलिंद सबनीस,स्वानंदी पुणेच्या अपर्णा केळकर व्यासपीठावर होत्या.आयुष्याच्या वाटचालीत रक्ताच्या नात्यापलीकडे प्रेम करणारी माणसे मिळाली, म्हणून निभावता आले, असे सांगून श्रीमती प्रमिलाताई ढेरे म्हणाल्या, की आयुष्यात धन मिळाले नाही, याची खंत वाटली नाही. अनेकांच्या प्रेमाच्या जोरावर सर्व जण आयुष्य संपन्न आणि सन्मानाने जगलो. प्रास्ताविकात मिलिंद सबनीस यांनी संस्थांच्या कार्याची महिती दिली. गंगोत्री बिल्डरचे गणेश जाधव तसेच अपर्णा आवटे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात साची कोल्हापुरे हिने गायिलेल्या भूमाता स्तोत्राने झाली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा केळकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात समजुतीच्या काठाशी... ही मैफल झाली. यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या कविता, ललितलेख, कथा यांचे वाचन आणि काही कवितांचेगायन झाले. या कार्यक्रमाचे संहितालेखन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे होते. यातअपर्णा केळकर, अनुराधा जोशी, अक्षय वाटवे, गौरी देशपांडे, स्नेहल दामले, मिलिंद गुणे, आनंद कुºहेकर यांचा सहभाग होता.>पुण्याईमुळे संमेलन यशस्वीअरुणा ढेरे यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामागील रहस्य काय आहे हे आज समजले, असे सांगून शि. द. फडणीस म्हणाले, ‘अरुणा ढेरे यांना त्यांच्या शालेय जीवनात प्रमिलाताई यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. त्यांनी शब्दांच्या माध्यमातून भरतकाम, कशिदाकाम केले असणार. नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनापूर्वी वादळे उठली. अरुणा त्याला कशी तोंड देणार, असा प्रश्न मनात आला होता. पण पुण्याईमुळे संमेलन यशस्वी झाले. संपूर्ण महाराष्ट्र तिच्यामागे उभा राहिला. कुठल्याही परिस्थितीत तोल न जाणे हा ढेरे कुटुंबाचा वारसा आहे तो तिने जपला,’ असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.