शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

महाराष्ट्र एटीएसच्या शौर्याचा आंध्र प्रदेश सरकारकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 04:53 IST

माओवादी चळवळीचा शहरी भागात प्रचार करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या ८ साथीदारांना अटक करणा-या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या शौर्याचा आंध्र प्रदेश सरकारने नुकताच गौरव केला

पुणे : माओवादी चळवळीचा शहरी भागात प्रचार करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या ८ साथीदारांना अटक करणा-या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या शौर्याचा आंध्र प्रदेश सरकारने नुकताच गौरव केला आहे़ ही कामगिरी तत्कालीन एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने केली होती.मुख्य आरोपी कृष्णा लिंगय्या उर्फ अजय उर्फ महेश लिंगप्पा घोषका उर्फ हरीष उर्फ सी अनिल लिंगप्पा उर्फ वेणुगोपालम उर्फ वेणु वेलगोटा याच्यावर आंध्र प्रदेश सरकारने २०१२ मध्ये तब्बल ८ लाखाची बक्षीस जाहीर केले होते़ त्याच्या बरोबरच इतर ७ आरोपींना एटीएसने मुंबईच्या विविध भागातून २०१८ मध्ये अटक केली. अटक केलेले सर्व आरोपी कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (माओवादी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, बेकायदेशीर कृत्य करून देशाची सुरक्षा व सार्वभौमत्वास धोका उत्पन्न करत असल्याचे तपासाअंती निदर्शनास आल्यामुुळे त्यांच्याविरुद्ध दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाणे मुंबई या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपींनी २००७ पासून गुजरातचा काही भाग, नाशिक , औरंगाबाद, मुंबई, पुणे या शहरी भागामध्ये नक्षलवादी चळवळीची विचारसरणी राबविण्याचे काम सुरु केले. मुख्य सूत्रधार कृष्णा लिंगय्या हा वेगवेगळी नावे धारण करून दहा वषार्पांसून भूमिगत राहून गुंगारा देत होता. त्याच्यावर गुजरात व आंध्र प्रदेशात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्यावर नक्षल चळवळीतील रँक नुसार बक्षीसे घोषित करण्यात आले होते.आंध्र प्रदेश सरकारने एटीएसच्या कामगिरीची दखल घेऊन पोरितोषिकाचा डिमांड ड्राफ्ड पोलीस महासंचालकांच्या नावाने पाठविला आहे़ तो स्वीकारण्यास शासनाने मान्यता दिली आहे़पारितोषिक जाहिर झालेले अधिकारी व कर्मचारीपोलिस उपायुक्त डॉ. मोहन कुमार दहिकर , सहाय्यक आयुक्त सुनील वाडके, पोलीस निरीक्षक संजय एस मराठे, निरीक्षक भास्कर डी. कदम, निरीक्षक संतोष डी. सावंत, सहाय्यक निरीक्षक दशरथ एम विटकर, उपनिरीक्षक विक्रम ए. पाटील, हवालदार अरुण बी. देशमुख, अरविंद एस. मोरे, शहाजी एन. सोनावने, राजेंद्र ए. खरात.