शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

...अन् त्यांना पुन्हा मिळाला हक्काचा निवारा

By admin | Updated: November 16, 2016 02:38 IST

ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पै-पै जमा केली; त्यांनीच उतारवयात आई-वडिलांना बेघर केले़ मात्र, अशा अवस्थेतही खचून न जाता आई-वडिलांनी मुलांविरोधात लढा दिला़

नवनाथ शिंदे / पिंपरीज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पै-पै जमा केली; त्यांनीच उतारवयात आई-वडिलांना बेघर केले़ मात्र, अशा अवस्थेतही खचून न जाता आई-वडिलांनी मुलांविरोधात लढा दिला़ अखेर तहसीलदारांच्या कार्यवाहीनंतर सत्तरी पार केलेल्या पाटील दाम्पत्याला पुन्हा एकदा हक्काचा निवारा असलेले घर मिळाले. सुरेंद्र नरसगोंडा पाटील (वय ७८) सुनंदा सुरेंद्र पाटील (वय ७३) हे दाम्पत्य निगडीत राहते़ वर्षभरापासून त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना बेघर केले होते़ उतारवयात दोघांनाही घराच्या माळ्यावरील एका कोपऱ्यात ठेवले. त्यामुळे त्यांचे हाल सुरू होते़ मुलांकडून या वयात अवहेलना सोसवत नव्हती. तरीही त्यांच्याविरोधात लढा देण्याचा निर्णय पाटील दाम्पत्याने घेतला. शासनाच्या ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणकारी कायद्यानुसार पाटील दाम्पत्याने हक्काचा निवारा मिळण्यासाठी २० फे बु्रवारीमध्ये प्रांत कार्यालयाकडे अर्ज दाखल केला़ पाटील यांनी केलेल्या अर्जावर प्रांत कार्यालयाने तातडीने दखल घेतली. दोन्ही मुलांनी आई-वडिलांना पोटगी म्हणून प्रत्येकी अडीच हजार रूपये देण्याचा आदेश दिला़ मात्र, मुलांनी आई-वडिलांना पोटगीची रक्कम दिली नाही़ त्यामुळे पाटील दाम्पत्याने पुन्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे घराचा ताबा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला़ संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मे रोजी मुलांना घराचा ताबा आई-वडिलांकडे देण्याचा आदेश दिला़ या निर्णयाविरोधात पाटील यांच्या मुलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ मात्र, न्यायालयाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत घराचा ताबा पाटील दाम्पत्याला देण्याचा आदेश दिला़ त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पोलिसांना आदेश देऊन मुलांना ताब्यातील घर सोडण्यास सांगितले़ अखेर प्रशासनाने त्वरेने घेतलेल्या निर्णयामुळे ८ नोव्हेंबरला पोलिसांच्या सहकार्याने पाटील दाम्पत्याला घराचा ताबा परत देण्यात आला़या सर्व संघर्षात त्यांना कौटुंबिक मित्र असलेले मोहन डोरले यांनी सहकार्य केले.