शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

...आणि तासात झाले उरुळी कांचन, सासवड शहर स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:48 IST

‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने.

उरुळी कांचन : ‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने. फक्त एका मोबाइलच्या मेसेजवर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी उपस्थित होऊन गावाची स्वच्छता केली.संत तुकाराममहाराज पालखी प्रस्थानानंतर गावामध्ये झालेला कचरा घाण साफ करण्यासाठी येथील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था, महिला मंडळे, गणेश मंडळे, गाव पुढारी इत्यादींना आवाहन केले होते. त्याप्रमाणे मंगळवारी (दि. १०) गावातील पालखी मार्गावर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या सातत्याचे हे तिसरे वर्ष आहे.संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी कांचन येथे आला होता. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, खासगी व सामाजिक संस्था वारकºयांसाठी चहा, बिस्किटे, फळे, अल्पोपहार, जेवण देतात व त्यामुळे परिसरात कचºयाची प्रचंडप्रमाणात वाढ झाल्याने गावाची आरोग्यसमस्या वाढते.यावर उपाय म्हणून उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, ग्रामपंचायत सदस्य, मंडलाधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी , निसर्गोपचार आश्रम ट्रस्ट, साईनाथ मित्र मंडळ, शौर्य करिअर अ‍ॅकॅडमी, शिक्षणा फाउंडेशन, पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेज यांनी स्वच्छता मोहिमेत सर्वांनी हातात झाडू घेऊन सहभागी होऊन गावातील आश्रम रोड, मुख्य बाजारपेठ, महात्मा गांधी रोड, तळवाडी चौक, शाळा परिसर आणि पालखी मार्गावरील दिंड्यांच्या विसाव्याची ठिकाणे स्वच्छ करत. एका तासाच्या आत पालखी गावात आली होती का नव्हती, असे वाटावे, असा परिसर स्वच्छ केला.हवेलीचे नायब तहसीलदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांनी पालखीलादौंड हद्दीत पोहोचवून परत येतानागाव चकाचक पाहून या उपक्रमाचे कौतुक केले. सासवड : संत ज्ञाननेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे ९ व १० जुलै रोजी होता. १० जुलै रोजी संत सोपान व संत चांगा वटेश्वर यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरला मार्गस्थ झाल्यानंतर सासवड नगर परिषदेने तातडीने सासवड येथील पालखीतळ स्वच्छ करण्यास सुरुवात केली. वारकºयांनी जेवणानंतर टाकलेले पत्रावळी, द्रोण, पाण्याच्या बाटल्या, चहाचे ग्लास, फळांच्या साली, अशा तत्सम प्रकारचा तब्बल २५ ते ३० टन कचरा यावेळी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या मदतीने संकलीत करून पालखी तळा सोबतच सासवड शहर देखील स्वच्छ केले.नगरपालिकेकडुन कचरा संकलना नंतर लगेचच शहर परिसरात जंतुनाशक पावडर टाकण्यात आली. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वाहनाच्या सहाय्याने जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. नगरपालीकेच्या अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने शहरातील रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्याचे काम चालु आहे.पालखी सोहळ्यातील दिंड्यांना नगरपालिकेने कचरा साठवुन ठेवण्याकरिता ४०० गोण्या दिल्या होत्या. यामुळे कचरा इतरत्र टाकला न जाता त्याचे एकाच ठिकाणी सहज संकलन करता आले. नगरपालिकेचे ४ बोलेरो, २ ट्रॅक्टर, आदर पुनावाला ग्रुपचे कचरा संकलनाची ४ वाहने, पुणे महानगरपालिकेचे जंतुनाशक वाहन, नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. स्वच्छता उपक्रमात सासवड नगरपालिकेस पुणे महानगरपालिका, आदरपुनावाला, थं क्रिएटीव्ह, या संस्थाचे सहकार्य लाभले, अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण व नगरसेवक अजित जगताप व संदिप जगताप यांनी दिली.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा