शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

...आणि तासात झाले उरुळी कांचन, सासवड शहर स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:48 IST

‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने.

उरुळी कांचन : ‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने. फक्त एका मोबाइलच्या मेसेजवर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी उपस्थित होऊन गावाची स्वच्छता केली.संत तुकाराममहाराज पालखी प्रस्थानानंतर गावामध्ये झालेला कचरा घाण साफ करण्यासाठी येथील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था, महिला मंडळे, गणेश मंडळे, गाव पुढारी इत्यादींना आवाहन केले होते. त्याप्रमाणे मंगळवारी (दि. १०) गावातील पालखी मार्गावर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या सातत्याचे हे तिसरे वर्ष आहे.संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी कांचन येथे आला होता. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, खासगी व सामाजिक संस्था वारकºयांसाठी चहा, बिस्किटे, फळे, अल्पोपहार, जेवण देतात व त्यामुळे परिसरात कचºयाची प्रचंडप्रमाणात वाढ झाल्याने गावाची आरोग्यसमस्या वाढते.यावर उपाय म्हणून उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, ग्रामपंचायत सदस्य, मंडलाधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी , निसर्गोपचार आश्रम ट्रस्ट, साईनाथ मित्र मंडळ, शौर्य करिअर अ‍ॅकॅडमी, शिक्षणा फाउंडेशन, पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेज यांनी स्वच्छता मोहिमेत सर्वांनी हातात झाडू घेऊन सहभागी होऊन गावातील आश्रम रोड, मुख्य बाजारपेठ, महात्मा गांधी रोड, तळवाडी चौक, शाळा परिसर आणि पालखी मार्गावरील दिंड्यांच्या विसाव्याची ठिकाणे स्वच्छ करत. एका तासाच्या आत पालखी गावात आली होती का नव्हती, असे वाटावे, असा परिसर स्वच्छ केला.हवेलीचे नायब तहसीलदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांनी पालखीलादौंड हद्दीत पोहोचवून परत येतानागाव चकाचक पाहून या उपक्रमाचे कौतुक केले. सासवड : संत ज्ञाननेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे ९ व १० जुलै रोजी होता. १० जुलै रोजी संत सोपान व संत चांगा वटेश्वर यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरला मार्गस्थ झाल्यानंतर सासवड नगर परिषदेने तातडीने सासवड येथील पालखीतळ स्वच्छ करण्यास सुरुवात केली. वारकºयांनी जेवणानंतर टाकलेले पत्रावळी, द्रोण, पाण्याच्या बाटल्या, चहाचे ग्लास, फळांच्या साली, अशा तत्सम प्रकारचा तब्बल २५ ते ३० टन कचरा यावेळी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या मदतीने संकलीत करून पालखी तळा सोबतच सासवड शहर देखील स्वच्छ केले.नगरपालिकेकडुन कचरा संकलना नंतर लगेचच शहर परिसरात जंतुनाशक पावडर टाकण्यात आली. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वाहनाच्या सहाय्याने जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. नगरपालीकेच्या अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने शहरातील रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्याचे काम चालु आहे.पालखी सोहळ्यातील दिंड्यांना नगरपालिकेने कचरा साठवुन ठेवण्याकरिता ४०० गोण्या दिल्या होत्या. यामुळे कचरा इतरत्र टाकला न जाता त्याचे एकाच ठिकाणी सहज संकलन करता आले. नगरपालिकेचे ४ बोलेरो, २ ट्रॅक्टर, आदर पुनावाला ग्रुपचे कचरा संकलनाची ४ वाहने, पुणे महानगरपालिकेचे जंतुनाशक वाहन, नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. स्वच्छता उपक्रमात सासवड नगरपालिकेस पुणे महानगरपालिका, आदरपुनावाला, थं क्रिएटीव्ह, या संस्थाचे सहकार्य लाभले, अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण व नगरसेवक अजित जगताप व संदिप जगताप यांनी दिली.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा