शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

आणि विमाही मिळाला

By admin | Updated: July 31, 2015 03:49 IST

माळीण दुर्घटनेत मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना मिळणारा विद्यार्थी विमा लालफितीच्या कारभारात अडकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग खडबडून जागे झाले

माळीण दुर्घटनेत मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना मिळणारा विद्यार्थी विमा लालफितीच्या कारभारात अडकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग खडबडून जागे झाले व त्यांनी आज माळीणमध्ये जाऊन १६ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना चेकचे वाटप केले. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी शालेय विद्यार्थी अपघात विमा ही योजना आहे. अपघातात मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना ७५ हजार रुपये मिळतात. माळीण दुर्घटनेत २८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यातील २४ विद्यार्थ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिला होता. यातील ७ वारसांना हा विमा मिळाला होता. ३ विद्यार्थ्यांचे वारस निश्चित होत नसल्याने त्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते. ‘लोकमत’ने ही बाब जिल्हा परिषदेच्या शिक्षणअधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर फाईलची शोधाशोध सुरू झाली आणि फक्त ७ विद्यार्थ्यांच्या वारसांना ही रक्कम वाटप झाल्याचे समोर आले. २२ जुलै रोजी यासाठी रक्कम शिक्षणअधिकाऱ्यांच्या खात्यात जमाही झाली होती. मात्र, ३0 जुलै रोजी माळीण दुर्घटनेला वर्ष होत असल्याचे स्मरण करून दिल्यानंतर शिक्षण अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना चेक तयार करण्याचे आदेश दिले. आणि आज हे चेक त्यांच्या वारसांना देण्यात आले. आज जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कांतीलाल उमाप स्वत: हे १६ चेक घेऊन माळीणला गेले होते. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, मी तेथे या चेकचे वाटप करणार होतो; मात्र तेथील वातावरण पाहता त्या व्यासपीठावर ते देणे योग्य वाटले नाही. म्हणून आंबेगावच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे ते चेक देऊन त्या वारसांना व्यक्तिश: भेटून द्या, अशा सूचना दिल्याचे सांगितले. त्यानुसार ते चेक वाटप करण्यात आले आहेत. विद्यार्थी अपघात विमा वाटपासाठी जिल्हा परिषदेकडे २१ लाखांची रक्कम आली आहे. त्यामुळे माळीणच्या १६ लाभार्थींसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील १२ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांचेही चेक तयार केले असून संबंधित वारसांशी संपर्क साधून त्याचे वाटप सुरू असल्याचे शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)