शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दारूगोळा उत्पादक कंपन्या; कामगार संघटनांचा खासगीकरणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील कंपन्यांचे (ॲॅम्युनेशन व ऑर्डिनन्स फॅॅक्टरी) खासगीकरण करण्यास तेथील कामगार संघटनांनी तीव्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील कंपन्यांचे (ॲॅम्युनेशन व ऑर्डिनन्स फॅॅक्टरी) खासगीकरण करण्यास तेथील कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. इंटकसह सर्वच कामगार संघटना त्यासाठी २७ सप्टेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी होत आहेत.

पुण्यात खडकीमध्ये ॲॅम्युनेशन व देहूरोडला ऑर्डिनन्स फॅॅक्टरी आहे. त्यात ११ हजार कामगार आहेत. देशभरात असे ४१ कारखाने आहेत. त्यात ८९ हजार कामगार आहेत. इंग्रजी अमलापासून हे कारखाने कार्यरत आहेत.

केंद्र सरकारने त्यात सुरुवातीला सात, नंतर ४० व आता १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. या कंपन्यांमध्ये उत्पादित होणारी १७४ उत्पादने बाहेरील कंपन्यांमधून घेण्यास सुरुवात केली, अशी माहिती ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनच्या पुणे युनिटचे पदाधिकारी प्रसाद कातकडे यांनी दिली.

कामगार संघटनांचा विरोध सुरू झाल्यावर केंद्र सरकारने आता अत्यावश्यक सेवा कायद्याखाली संप केल्यास कामगाराला १ महिना कैद व १० हजार रुपये दंड, संपाला प्रवृत्त केले म्हणून संघटनेला २० हजार रुपये दंड असा कायदा केला. या कायद्याला व केंद्राच्या खासगीकरणाला तीव्र विरोध असल्याचे ‘इंटक’चे जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले.

देशातील या ४१ कारखान्यांमधील ३ प्रमुख व अन्य स्थानिक कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. संरक्षण विभागाशी संबंधित उत्पादने करणाऱ्या कंपन्यांमध्ये परदेशी व खासगी कंपन्यांचा सहभाग गंभीर असून, त्याच्याविरोधात कामगार संघटना २७ सप्टेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार असल्याचे कदम म्हणाले.