शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील योगदान समोर यावे

By admin | Updated: April 15, 2015 00:57 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दलितांचे, उपेक्षितांचे नेते म्हणून पाहिले जाते. परंतु, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली नाही,

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दलितांचे, उपेक्षितांचे नेते म्हणून पाहिले जाते. परंतु, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली नाही, अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त आणि सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर स्मारक व संग्रहालयाच्या कोनशिला समारंभाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, संजय काकडे, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. आंबेडकर स्मारक व संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रीय जल आयोगाची निर्मिती आंबेडकरांनी केली तसेच भाक्रा नांगलसारखा मोठा प्रकल्प तयार करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथे पाणी घेऊन जाण्याचा विचार आंबेडकरांनी केला. राज्या-राज्यांत विद्युत मंडळांची स्थापना करण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. त्यामुळे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक विचार समाजासमोर यायला हवेत.’’गिरीश बापट म्हणाले, ‘‘महामानवाच्या पुतळ्याला हार घालून भावना व्यक्त होतात. परंतु, एखाद्याचे जीवन उभे करण्यासाठी त्याला मदत करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी घ्यायला हवी.’’लिखाणाची जबाबदारी स्वीकारावीविकासातील आंबेडकरांचे योगदान, त्यांचे आर्थिक विचार यावर लिखाण करण्याची जबाबदारी स्वीकारावी. अभ्यासू व्यक्तीची नियुक्ती सिम्बायोसिससारख्या संस्थेने करावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.टागोरांच्या विश्वभारती आणि सानेगुरुजींच्या आंतरभारती संकल्पनेप्रमाणे देशाला आज समानता, ऐक्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजात ‘ऐक्य भारती’ ही संकल्पना रुजविणे आवश्यक आहे.- शां. ब. मुजुमदार, संस्थापक अध्यक्ष, सिम्बायोसिस