शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील योगदान समोर यावे

By admin | Updated: April 15, 2015 00:57 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दलितांचे, उपेक्षितांचे नेते म्हणून पाहिले जाते. परंतु, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली नाही,

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दलितांचे, उपेक्षितांचे नेते म्हणून पाहिले जाते. परंतु, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली नाही, अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त आणि सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर स्मारक व संग्रहालयाच्या कोनशिला समारंभाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, संजय काकडे, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. आंबेडकर स्मारक व संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रीय जल आयोगाची निर्मिती आंबेडकरांनी केली तसेच भाक्रा नांगलसारखा मोठा प्रकल्प तयार करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथे पाणी घेऊन जाण्याचा विचार आंबेडकरांनी केला. राज्या-राज्यांत विद्युत मंडळांची स्थापना करण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. त्यामुळे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक विचार समाजासमोर यायला हवेत.’’गिरीश बापट म्हणाले, ‘‘महामानवाच्या पुतळ्याला हार घालून भावना व्यक्त होतात. परंतु, एखाद्याचे जीवन उभे करण्यासाठी त्याला मदत करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी घ्यायला हवी.’’लिखाणाची जबाबदारी स्वीकारावीविकासातील आंबेडकरांचे योगदान, त्यांचे आर्थिक विचार यावर लिखाण करण्याची जबाबदारी स्वीकारावी. अभ्यासू व्यक्तीची नियुक्ती सिम्बायोसिससारख्या संस्थेने करावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.टागोरांच्या विश्वभारती आणि सानेगुरुजींच्या आंतरभारती संकल्पनेप्रमाणे देशाला आज समानता, ऐक्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजात ‘ऐक्य भारती’ ही संकल्पना रुजविणे आवश्यक आहे.- शां. ब. मुजुमदार, संस्थापक अध्यक्ष, सिम्बायोसिस