पीएमपी प्रशासनाकडून जेजुरी, चाकण, रांजणगांव यांसह विविध भागातील एमआयडीसी, पर्यटन व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बससेवा सुरू केली जात आहे. या भागात अधिकाधिक मार्ग व बस वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पुमटा, पीएमपीआरडीएकडे संचलन तुटीच्या माध्यमातून आर्थिक मदत व विविध सुविधा मिळण्याची अपेक्षा पीएमपीला आहे. प्रशासनाच्या या भुमिकेला शहरातील प्रवासी संघटना व प्रवाशांनी थेट विरोध केलेला नाही. पण बससेवेचा विस्तार करताना मुळ शहरातील बससेवेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी प्रवाशांची मागणी आहे. पीएमपीप्रवासी मंच देखील अनेक वर्षांपासून काही मागण्या करीत आहे. प्रत्येक बस थांब्यावर बसेसचे मार्ग, वारंवारिता, वेळापत्रक व इतर संबंधित माहिती स्पष्टपणे दिसून येईल अशी लावावी, प्रमुख बस थांब्यावर बसण्याच्या व्यवस्थेसह निवारा शेड, पिण्याचे पाणी, किमान महिलांच्या साठी स्वच्छ स्वच्छतागृह, बसेसची माहिती देण्यासाठी स्पीकर, स्वच्छ प्रकाश योजना, बसमधील उपलब्ध डिजिटल स्थलदर्शक पाट्या नियमितपणे योग्य माहितीसह सुरु राहतील याची दक्षता घेणे, काल्पनिक स्टेज नुसार केली जाणारी भाडे आकारणीची पद्धत रद्द करुन, प्रवास अंतरावर आधारित भाडे आकारणी करण्यात यावी, अशा प्रवाशांच्या मागण्या आहेत.
-----------
वातानुकूलित विमानतळ सेवा, टोलनाक्यापलीकडे सेवा, जिल्हाभर पीएमपीचा विस्तार करा. पण त्याचबरोबर पीएमपीचा संपूर्ण असह्य भार आपल्या खांद्यावर वाहणाºया पुणे, पिंपरी-चिंचवड येथील लाखो सामान्य प्रवाशांचेही काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांचाही विचार व्हावा ही कळकळीची आहे.
- जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच
-------------
पुणे व पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना भरवश्याची बस सेवा पुरवल्या नंतर हद्दीबाहेर बस सेवा पुरवण्यात हरकत नाही. पण स्थानिक प्रशासनाने पीएमपीला आवश्यकता असलेल्या सुविधा, नवीन बसेस, बस डेपोसाठी जागा द्यावी.
- रुपेश केसकर, प्रवासी
--------