शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

आटपाडीतील सर्व गावे टेंभू योजनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:35 IST

भारत पाटणकर : बळीराजा स्मृती धरणाचा वर्धापनदिन

आळसंद : श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने आंदोलन केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे. हे यश चळवळीच्या रेट्यामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.बलवडी-तांदळगाव (ता. खानापूर) येथे बळीराजा जलसंवर्धन विकास संस्थेतर्फे बळीराजा धरणाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, यावेळी पाटणकर बोलत होते. यावेळी राज्य संघटक मोहनराव यादव, दिलीप पाटील, गेल आॅमवेट उपस्थित होते.

राज्य संघटक मोहनराव यादव म्हणाले, राज्यातील दुष्काळी भागाला आदर्शवत ठरावे असे बळीराजा धरण आहे. हे धरण म्हणजे परिवर्तनीय चळवळीचा पाया आहे. टेंभू व ताकारी योजनेचे पाणी समन्यायी पध्दतीने देण्याचे धोरण हाती घेणार आहे.यावेळी दिलीप पाटील, अ‍ॅड. कृष्णा पाटील, आनंदराव पाटील, मारूती शिरतोडे, डॉ. संजय कांबळे, अजित खराडे यांचीही भाषणेझाली. या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे परशुराम माळी, देवकुमार दुपटे, विलास चव्हाण, सागर गोतपागर, विक्रम चव्हाण, सुरेश चव्हाण उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, आटपाडीला बंद पाईपलाईनद्वारे टेंभू योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. तो पॅटर्न राज्यभर स्वीकारावा, यासाठी डिसेंबरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणे