शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मार्केट यार्डातील सर्व व्यवहार रोखीनेच; नोटाबंदीनंतर व्यापारात मंदीची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 12:18 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला वर्ष झाले, तरी मार्केट यार्डातील व्यवहाराची स्थिती ‘जैसे थे’ आहे. आजही मार्केट यार्डामध्ये ९० ते ९५ टक्के व्यवहार रोखीनेच सुरू आहेत.

ठळक मुद्देनोव्हेंबर, डिसेंबर ते जानेवारी २०१७ या तीन महिन्यांत सुमारे ५ ते १० टक्के व्यवहार झाले कॅशलेशनोटाबंदीमुळे व्यवहार कॅशलेस झाले नाहीत अथवा काळा पैसाही बाहेर आला नाहीगेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी व्यवहार घटले

पुणे : काळापैसा बाहेर काढण्यासाठी व सर्व व्यवहार कॅशलेस करण्याच्या उद्देशाने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला वर्ष झाले, तरी मार्केट यार्डातील व्यवहाराची स्थिती ‘जैसे थे’ आहे. आजही मार्केट यार्डामध्ये ९० ते ९५ टक्के व्यवहार रोखीनेच सुरू आहेत. यामध्ये केवळ ५ टक्के व्यवहार हे धनादेशाद्वारे चालत असल्याचे चित्र भुसार, फळे, फुले, तरकारी, कांदा-बटाटा, केळी आणि पान बाजारात पाहण्यास मिळत आहे. नोटाबंदीनंतर काही दिवस लोकांकडे पैशाचा अभाव होता. त्यामुळे मार्केट यार्डातील सर्व व्यवहार सुमारे ७० ते ८० टक्क्यापर्यंत मंदावले होते. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर ते जानेवारी २०१७ या तीन महिन्यांत सुमारे ५ ते १० टक्के व्यवहार कॅशलेश झाले. त्यानंतर मात्र सर्वच विभागातील व्यवहार रोखीनेच सुरू आहेत. कामाच्या व्यापात व्यापार्‍यांना पेटीएम अथवा स्वाइप मशिन ठेवणे त्यावर व्यवहार करणे सोयीचे ठरत नाही. तसेच, नोटाबंदीच्या घोषणेनंतर स्वाइप मशिनसाठी वेटिंग होती. त्यामुळे व्यापारी मशिन खरेदीच्या भानगडीत पडलेच नाहीत. परिणामी, आजही पूर्वीप्रमाणेच रोखीने व्यवहार होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. नोटाबंदीमुळे व्यवहार कॅशलेस झाले नाहीत अथवा काळा पैसाही बाहेर आला नाही. मात्र, त्याचा फटका बाजारातील व्यवहाराला बसला आहे. आदी नोटाबंदीनंतर परतावा आणि जीएसटी या तिन्ही गोष्टींमुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी व्यवहार घटले आहेत. त्याचा फटका शेतकरी, ग्राहक, व्यापारी, तसेच विक्रेत्यांनाही सहन करावा लागत आहे. नोटाबंदीमुळे बाजारातील व्यवहार मंदावल्याने कृषी उत्पन्न समितीच्या उत्पन्नातही मोठी घट झाली असल्याचे बोलले जात आहे. आज बाजारातील व्यवहार सुरू असले, तरी पैशाअभावी व्यापार बर्‍याच प्रमाणात घटला असल्याचेही आडते सांगत आहेत. मार्केट यार्डातील व्यवहाराबाबत माहिती देताना व्यापारी युवराज काची म्हणाले की, नोटाबंदीनंतर फळ विभागातील व्यवहार मोठ्या प्रमाणात घटला आहे. सुरुवातीच्या काळात कॅशलेस व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला आहे. सद्य:स्थिती बहुतांश व्यवहार रोखीने होतात. तर काही व्यवहार धनादेश अथवा आरटीजीने केले जातात. कॅशलेसचे व्यवहार शून्य प्रमाणात होत आहेत. नोटाबंदीनंतर व्यवहार कॅशलेस झाले नाहीत. उलट या निर्णयामुळे व्यापारात मंदी आली आहे.

टॅग्स :Note BanनोटाबंदीdigitalडिजिटलMarketबाजार