शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे सर्व सिग्नल्स होणार ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 04:49 IST

बंदच पडलाय, नुसताच चालू-बंद होतोय, रंग उडालाय, एकच रंग दाखवतोय..., पुण्यातील सिग्नल्सच्या अशा तक्रारी यापुढे करता येणार नाहीत. पुण्याच्या सर्व रस्त्यांवरील सिग्नल्स

पुणे : बंदच पडलाय, नुसताच चालू-बंद होतोय, रंग उडालाय, एकच रंग दाखवतोय..., पुण्यातील सिग्नल्सच्या अशा तक्रारी यापुढे करता येणार नाहीत. पुण्याच्या सर्व रस्त्यांवरील सिग्नल्स आता स्मार्ट होत आहेत. ते वाहनांच्या संख्येनुसार स्वत:च्या वेळेत बदल करतील, नियंत्रण कक्षाबरोबर स्वत:च सतत संवाद साधतील, वीज खंडित झाली तर सौरऊर्जेवर आपोआप सुरू होतील.स्मार्ट सिटीअतंर्गत महापालिकेने स्थापन केलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा हा बहुधा पहिलाच उपक्रम ठरेल. त्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. काही प्रशासकीय पूर्ततेनंतर या कामाच्या निविदाच जाहीर होतील. एकूण ३४० सिग्नल्सचा यात समावेश करण्यात आला आहे. वाहनांची गर्दी असलेल्या मोठ्या रस्त्यांपासून ते बसवण्यास सुरुवात होईल. त्यातील काही सिग्नल्स पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही आहेत. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. नव्या तंत्रज्ञानानेयुक्त असे हे सिग्नल्स असतील. या सिग्नल्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते वाहनांच्या संख्येनुसार स्वत:ची वेळ अ‍ॅडजस्ट करतात. त्यासाठी त्यांना सेन्सर बसवण्यात आले आहेत. एरवीच्या सिग्नल्सना विशिष्ट टायमिंग दिलेले असते. वाहनांची संख्या वाढली किंवा कमी झाली तरीही ते तेवढा वेळ सुरूच असतात. त्यामुळे वाहनांची गर्दी नसली तरी लाल दिवा असेल तर वाहनांना तेवढा वेळ थांबावेच लागते. त्यात वेळ व इंधनही वाया जाते. वाहतूकही खोळंबून राहते.याशिवाय हे सिग्नल्स त्यांच्यासमोरच्या चारी रस्त्यांवरच्या वाहनांच्या संख्येची माहिती सतत नियंत्रण केंद्राला पाठवत राहतील. त्यावरून त्यात्या रस्त्यावरील वाहतुकीचे विश्लेषण करणे वाहतूक शाखेला शक्य होणार आहे. हे सिग्नल्सही विजेवरच चालतात, मात्र वीजपुरवठा खंडित झाला तर ते आपोआप सौरऊर्जेवर सुरू होतील, अशी व्यवस्था त्यात आहे. (प्रतिनिधी)कोंडी फुटण्यास होणार मदतगर्दीच्या वेळी या सिग्नलमुळे कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. तसेच कोंडी जास्त वेळ राहणार नाही.कोणत्या वेळेस किती वाहने असतात, गर्दीची वेळ कधी, गर्दी नसणारी वेळ कोणती, वाहने किती वेळ थांबून असतात, अशी सर्व माहिती नियंत्रण कक्षाला सतत मिळत राहील. नवे सिग्नल्स वाहनांच्या संख्येनुसार वेळ अ‍ॅडजस्ट करणारे आहेत. म्हणजे गर्दीची वेळ असेल तिथे लाल रंगाचा दिवा जास्त वेळ असेल. गर्दीची वेळ नसेल तेव्हा त्याची वेळ आपोआप कमी होईल. पिवळा व हिरवा दिवाही याचप्रकारे वेळ अ‍ॅडजस्ट करेल. यामुळे वाहने चौकांमध्ये थांबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे. वाहतूक सतत प्रवाही राहण्यास मदत होणार आहे. नवीन सिग्नलची वैशिष्ट्येते वाहनांच्या संख्येनुसार स्वत:च्या वेळेत बदल करतील. जास्त वाहने असतील तिकडे जास्त वेळ देतील.नियंत्रण कक्षाबरोबर स्वत:चा सतत संवाद साधतील. नियंत्रण कक्षातील अधिकारी उपाययोजना करतील.वीज खंडित झाली तर सौरऊर्जेवर आपोआप सुरू होतील. या सिग्नलला विजेची गरज लागणार नाही.पुणे बदलत आहे या नव्या सिग्नल्समधून लक्षात येईल. वाहतूक शाखेची या सिग्नल्ससाठी परवानगी मिळाली आहे. हैदराबाद येथे असे सिग्नल्स सुरू असून तिथे वाहतूक नियंत्रणासाठी त्याचा चांगला उपयोग झाला आहे. - कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका