शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीकरांची कसरत संपणार

By admin | Updated: October 26, 2015 01:49 IST

गेल्या कित्येक वर्षांपासून करावी लागलेली ही तारेवरची कसरत आता संपणार आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आळंदी : गेल्या कित्येक वर्षांपासून करावी लागलेली ही तारेवरची कसरत आता संपणार आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवीन पूल (साधकाश्रम) ते नगरपालिका हद्दीपर्यंत तयार करण्यात येत असलेल्या डांबरी रस्त्याबाबत या परिसरातील तमाम नागरिकांसह साधक व भाविकांनी समाधान व्यक्त करीत नगरपालिकेने आमच्यासाठी जणू ही दिवाळी भेटच दिली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.आषाढी वारी असो, कार्तिकी वारी असो, आळंदीत येणाऱ्या साधकांची गर्दी, यात्रेकरू व भाविकांची होणारी गर्दी अंघोळीसाठी इंद्रायणी पात्राच्या कडेला जमून साधकाश्रम परिसराचा उपयोग करायचे.मात्र, या बाजूला येण्यासाठी रस्ताच नसल्याने या भागात येणाऱ्या भाविकांना नदीपात्रालगतच्या भिंतीचा आधार घेत पुढे जावे लागायचे. नवीन पुलापासून निघणारा हा रस्ता पूर्वीचा शिव रस्ता म्हणून ओळखला जातो. इंद्रायणी काठालगत असलेल्या या भागात आषाढी व कार्तिकीनिमित्त आळंदीत येणारी भाविक मंडळी, साधक, यात्रेकरू अशी बहुतांश मंडळी याच परिसरात अंघोळीसाठी जमतात. कोणी इंद्रायणी पात्रात उतरून अंघोळ करतो, तर कोणी इंद्रायणीच्या कडेला बसून अंघोळ करतो. मात्र, या परिसरात येण्यासाठी रस्ताच नसल्याने भाविकांना चक्क तारेवरची कसरत करावी लागायची. जीव मुठीत घेऊन चालावे लागायचे. या परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या जनतेने तर भयंकर बिकट प्रसंगाचा सामना केला. उन्हाळा, पावसाला, हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये या परिसरातील जनतेने कमालीचे कष्ट सोसले असल्याचे येथील जनतेने सांगितले. येथील जनतेसह तमाम भाविकांची बाराही महिने होत असलेली अडचण विचारात घेऊन नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी या रस्त्याबाबत पाठपुरावा करीत निधी आणला. येथील कामे सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांबरोबर भाविकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. (वार्ताहर)