शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

आळंदीकरांचा स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: July 8, 2015 01:26 IST

नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, हजारो वारकरी, नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज आळंदीत स्वच्छतेची दिंडी काढून अवघ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला.

आळंदी : नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, हजारो वारकरी, नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज आळंदीत स्वच्छतेची दिंडी काढून अवघ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला. कीर्तनकाराचा वेष परिधान केलेले मुख्याधिकारी औंधकर, खादीचे धोतर, सदरा, त्यावर काळे जॅकेट आणि डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणारी पांढरी टोपी घालून स्वच्छतादूताच्या वेषातील नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्यासह टाळमृदंगाचा गजर करत डोक्यावर स्वच्छता संदेश देणाऱ्या टोप्या व हातात फलक घेऊन निघालेल्या चिमुकल्यांनी आळंदीलाच नव्हे, तर महाराष्ट्रालाच जणू स्वच्छतेचा संदेश दिला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत आळंदी येथे स्वच्छतेचा संकल्प स्वच्छता दिंडीतून करण्यात आला.सकाळी १० वाजता नगर परिषदेपासून शुभारंभ करण्यात आलेल्या या दिंडीत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी डोक्यावर फेटा व अंगातील सदऱ्यावरून साक्षात ख्यातनाम कीर्तनकाराचा वेष परिधान केलेला, तर नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणारी टोपी, पांढरा खादीचा सदरा, धोतर व त्यावर काळे जॅकेट, तर शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या शालेय गणवेशात डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पांढऱ्या शुभ्र टोप्या, हातात स्वच्छतेचा जागर करणारे घोषवाक्ये लिहिलेले फलक, शिक्षिका, शिक्षक, प्राध्यापक, विविध दिंडीतील दिंडीकरी, आळंदीत दाखल झालेले वारकरी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक नागरिकांनी मोठा सहभाग होऊन हा उपक्रम यशस्वी केला.नगर परिषदेपासून सुरू झालेली ही स्वच्छता दिंडी नवीन एस.टी. स्टॅण्ड, चाकण चौक, प्रदक्षिणा मार्ग, नगर परिषद चौक ते महाद्वार चौक अशा मार्गाने परिक्रमा करून इंद्रायणीच्या घाटावर पोहोचला.