शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:16 IST

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी आळंदी : भामा-आसखेड धरणातून पुणे महापालिकेने कुरुळीपर्यंत आणलेले पाणी थेट बंद पाईपलाईनद्वारे ...

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

आळंदी : भामा-आसखेड धरणातून पुणे महापालिकेने कुरुळीपर्यंत आणलेले पाणी थेट बंद पाईपलाईनद्वारे आळंदीत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या हे काम ९५ टक्के पूर्ण होत असून उर्वरित कामही महिनाभरात मार्गी लागणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात आळंदीकरांना स्वच्छ व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आळंदीत पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी आळंदी पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शासनाला थेट भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार आळंदीला भामा आसखेडचे पाणी बंदीस्त नलिकांतून आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या चिंबळी येथे रस्त्यालगतची ड्रेनेजलाईन फुटली असल्याने कामात अडचण निर्माण झाली होती. सदरचे काम आळंदी नगरपरिषदेने स्वखर्चाने मार्गी लावून ठिकठिकाणी चेंबर तयार करून ड्रेनेज दुरुस्त करून घेतले आहे. त्यामुळे पुढील कामाला पुन्हा वेग येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पाईप लाइनच्या कामाची पाहणी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, अशोक उमरगेकर, नगरसेविका रुक्मिणी कांबळे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, दत्तात्रय सोनटक्के आदींनी केली. यावेळी पाईपलाईन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच पाईपलाईन कामादरम्यान सद्यस्थितीत असलेल्या अडचणींची माहिती घेत संबंधित यंत्रणांशी संवाद साधत त्यावरील उपाययोजना केल्या. येत्या एक महिन्यात सर्व काम पूर्ण होऊन चाचणी करण्यात येणार असल्याचे संबंधित ठेकेदाराने सांगितले.

फोटो ओळ : आळंदीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी करताना नगरपरिषदेचे पदाधिकारी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)