शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:16 IST

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी आळंदी : भामा-आसखेड धरणातून पुणे महापालिकेने कुरुळीपर्यंत आणलेले पाणी थेट बंद पाईपलाईनद्वारे ...

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

आळंदी : भामा-आसखेड धरणातून पुणे महापालिकेने कुरुळीपर्यंत आणलेले पाणी थेट बंद पाईपलाईनद्वारे आळंदीत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या हे काम ९५ टक्के पूर्ण होत असून उर्वरित कामही महिनाभरात मार्गी लागणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात आळंदीकरांना स्वच्छ व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आळंदीत पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी आळंदी पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शासनाला थेट भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार आळंदीला भामा आसखेडचे पाणी बंदीस्त नलिकांतून आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या चिंबळी येथे रस्त्यालगतची ड्रेनेजलाईन फुटली असल्याने कामात अडचण निर्माण झाली होती. सदरचे काम आळंदी नगरपरिषदेने स्वखर्चाने मार्गी लावून ठिकठिकाणी चेंबर तयार करून ड्रेनेज दुरुस्त करून घेतले आहे. त्यामुळे पुढील कामाला पुन्हा वेग येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पाईप लाइनच्या कामाची पाहणी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, अशोक उमरगेकर, नगरसेविका रुक्मिणी कांबळे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, दत्तात्रय सोनटक्के आदींनी केली. यावेळी पाईपलाईन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच पाईपलाईन कामादरम्यान सद्यस्थितीत असलेल्या अडचणींची माहिती घेत संबंधित यंत्रणांशी संवाद साधत त्यावरील उपाययोजना केल्या. येत्या एक महिन्यात सर्व काम पूर्ण होऊन चाचणी करण्यात येणार असल्याचे संबंधित ठेकेदाराने सांगितले.

फोटो ओळ : आळंदीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी करताना नगरपरिषदेचे पदाधिकारी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)