शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:16 IST

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी आळंदी : भामा-आसखेड धरणातून पुणे महापालिकेने कुरुळीपर्यंत आणलेले पाणी थेट बंद पाईपलाईनद्वारे ...

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

आळंदी : भामा-आसखेड धरणातून पुणे महापालिकेने कुरुळीपर्यंत आणलेले पाणी थेट बंद पाईपलाईनद्वारे आळंदीत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या हे काम ९५ टक्के पूर्ण होत असून उर्वरित कामही महिनाभरात मार्गी लागणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात आळंदीकरांना स्वच्छ व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आळंदीत पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी आळंदी पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शासनाला थेट भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार आळंदीला भामा आसखेडचे पाणी बंदीस्त नलिकांतून आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या चिंबळी येथे रस्त्यालगतची ड्रेनेजलाईन फुटली असल्याने कामात अडचण निर्माण झाली होती. सदरचे काम आळंदी नगरपरिषदेने स्वखर्चाने मार्गी लावून ठिकठिकाणी चेंबर तयार करून ड्रेनेज दुरुस्त करून घेतले आहे. त्यामुळे पुढील कामाला पुन्हा वेग येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पाईप लाइनच्या कामाची पाहणी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, अशोक उमरगेकर, नगरसेविका रुक्मिणी कांबळे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, दत्तात्रय सोनटक्के आदींनी केली. यावेळी पाईपलाईन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच पाईपलाईन कामादरम्यान सद्यस्थितीत असलेल्या अडचणींची माहिती घेत संबंधित यंत्रणांशी संवाद साधत त्यावरील उपाययोजना केल्या. येत्या एक महिन्यात सर्व काम पूर्ण होऊन चाचणी करण्यात येणार असल्याचे संबंधित ठेकेदाराने सांगितले.

फोटो ओळ : आळंदीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी करताना नगरपरिषदेचे पदाधिकारी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)