शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

आळंदीला शुद्ध पाणी मिळणार

By admin | Updated: May 7, 2015 04:53 IST

जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले

दिघी : जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले. रुग्णालयाच्या नूतन इमारतीमध्ये तत्काळ रुग्णसेवा चालू करावी व आळंदीकरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सुरू असलेले बेमुदत उपोषण आमदार सुरेश गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून आळंदी येथे रुग्णालयाची नवी भव्य इमारत बांधण्यात आली; परंतु नळजोडणी, वीजजोडणीसारख्या किरकोळ कारणामुळे या इमारतीमध्ये अद्यापही रुग्णसेवा सुरू करण्यात आली नाही. आळंदी येथील नागरिक गेल्या १० वर्षांपासून अशुद्ध व प्रदूषित पाणी पीत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून आळंदीकरांना तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती. मंगळवारी (दि. ५) संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या महाद्वारासमोरच हे बेमुदत उपोषण सुरू होते. आळंदी येथील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी या उपोषणाला आपला पाठिंबा देत उल्लेखनीय प्रतिक्रिया नोंदवल्या. उपोषणकर्त्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून मंगळवारी (दि. ५) दुपारी ४ वाजता न. प.मध्ये तातडीची प्रशासकीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला खेड येथील सा. बां. विभागाचे उपअभियंता काटकर, सहा. अभियंता मुरकुटे, वैद्यकीय अधिकारी पांढरे व मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी (दि. ६) सकाळीच खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी आळंदीत येऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर आढावा घेतला. त्यासोबतच आळंदी येथील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, मुख्याधिकारी विनायक औंधकर व आरोग्य उपसंचालक चव्हाण यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी आमदार सुरेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी इमारतीच्या आतील भागातील किरकोळ कामे शिल्लक राहिल्यामुळे त्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या इमारतीतील रुग्णसेवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल. यावर उपोषणकर्त्यांनी लेखी स्वरूपाची मागणी केल्याने मुख्याधिकारी औंधकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर आमदार गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत पाजून उपोषण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मागे घेण्यात आले. अलंकापुरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरीषकुमार कारेकर यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण येळवंडे, बंडुनाना काळे, तुकाराम माने, नाना कातखेडे, उमेश रानवडे यांचा उपोषणकर्त्यांमध्ये समावेश होता. (वार्ताहर)