शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आळंदीला शुद्ध पाणी मिळणार

By admin | Updated: May 7, 2015 04:53 IST

जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले

दिघी : जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले. रुग्णालयाच्या नूतन इमारतीमध्ये तत्काळ रुग्णसेवा चालू करावी व आळंदीकरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सुरू असलेले बेमुदत उपोषण आमदार सुरेश गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून आळंदी येथे रुग्णालयाची नवी भव्य इमारत बांधण्यात आली; परंतु नळजोडणी, वीजजोडणीसारख्या किरकोळ कारणामुळे या इमारतीमध्ये अद्यापही रुग्णसेवा सुरू करण्यात आली नाही. आळंदी येथील नागरिक गेल्या १० वर्षांपासून अशुद्ध व प्रदूषित पाणी पीत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून आळंदीकरांना तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती. मंगळवारी (दि. ५) संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या महाद्वारासमोरच हे बेमुदत उपोषण सुरू होते. आळंदी येथील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी या उपोषणाला आपला पाठिंबा देत उल्लेखनीय प्रतिक्रिया नोंदवल्या. उपोषणकर्त्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून मंगळवारी (दि. ५) दुपारी ४ वाजता न. प.मध्ये तातडीची प्रशासकीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला खेड येथील सा. बां. विभागाचे उपअभियंता काटकर, सहा. अभियंता मुरकुटे, वैद्यकीय अधिकारी पांढरे व मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी (दि. ६) सकाळीच खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी आळंदीत येऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर आढावा घेतला. त्यासोबतच आळंदी येथील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, मुख्याधिकारी विनायक औंधकर व आरोग्य उपसंचालक चव्हाण यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी आमदार सुरेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी इमारतीच्या आतील भागातील किरकोळ कामे शिल्लक राहिल्यामुळे त्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या इमारतीतील रुग्णसेवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल. यावर उपोषणकर्त्यांनी लेखी स्वरूपाची मागणी केल्याने मुख्याधिकारी औंधकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर आमदार गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत पाजून उपोषण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मागे घेण्यात आले. अलंकापुरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरीषकुमार कारेकर यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण येळवंडे, बंडुनाना काळे, तुकाराम माने, नाना कातखेडे, उमेश रानवडे यांचा उपोषणकर्त्यांमध्ये समावेश होता. (वार्ताहर)