शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीला शुद्ध पाणी मिळणार

By admin | Updated: May 7, 2015 04:53 IST

जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले

दिघी : जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले. रुग्णालयाच्या नूतन इमारतीमध्ये तत्काळ रुग्णसेवा चालू करावी व आळंदीकरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सुरू असलेले बेमुदत उपोषण आमदार सुरेश गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून आळंदी येथे रुग्णालयाची नवी भव्य इमारत बांधण्यात आली; परंतु नळजोडणी, वीजजोडणीसारख्या किरकोळ कारणामुळे या इमारतीमध्ये अद्यापही रुग्णसेवा सुरू करण्यात आली नाही. आळंदी येथील नागरिक गेल्या १० वर्षांपासून अशुद्ध व प्रदूषित पाणी पीत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून आळंदीकरांना तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती. मंगळवारी (दि. ५) संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या महाद्वारासमोरच हे बेमुदत उपोषण सुरू होते. आळंदी येथील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी या उपोषणाला आपला पाठिंबा देत उल्लेखनीय प्रतिक्रिया नोंदवल्या. उपोषणकर्त्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून मंगळवारी (दि. ५) दुपारी ४ वाजता न. प.मध्ये तातडीची प्रशासकीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला खेड येथील सा. बां. विभागाचे उपअभियंता काटकर, सहा. अभियंता मुरकुटे, वैद्यकीय अधिकारी पांढरे व मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी (दि. ६) सकाळीच खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी आळंदीत येऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर आढावा घेतला. त्यासोबतच आळंदी येथील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, मुख्याधिकारी विनायक औंधकर व आरोग्य उपसंचालक चव्हाण यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी आमदार सुरेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी इमारतीच्या आतील भागातील किरकोळ कामे शिल्लक राहिल्यामुळे त्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या इमारतीतील रुग्णसेवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल. यावर उपोषणकर्त्यांनी लेखी स्वरूपाची मागणी केल्याने मुख्याधिकारी औंधकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर आमदार गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत पाजून उपोषण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मागे घेण्यात आले. अलंकापुरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरीषकुमार कारेकर यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण येळवंडे, बंडुनाना काळे, तुकाराम माने, नाना कातखेडे, उमेश रानवडे यांचा उपोषणकर्त्यांमध्ये समावेश होता. (वार्ताहर)