शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आळंदीला शुद्ध पाणी मिळणार

By admin | Updated: May 7, 2015 04:53 IST

जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले

दिघी : जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले. रुग्णालयाच्या नूतन इमारतीमध्ये तत्काळ रुग्णसेवा चालू करावी व आळंदीकरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सुरू असलेले बेमुदत उपोषण आमदार सुरेश गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून आळंदी येथे रुग्णालयाची नवी भव्य इमारत बांधण्यात आली; परंतु नळजोडणी, वीजजोडणीसारख्या किरकोळ कारणामुळे या इमारतीमध्ये अद्यापही रुग्णसेवा सुरू करण्यात आली नाही. आळंदी येथील नागरिक गेल्या १० वर्षांपासून अशुद्ध व प्रदूषित पाणी पीत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून आळंदीकरांना तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती. मंगळवारी (दि. ५) संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या महाद्वारासमोरच हे बेमुदत उपोषण सुरू होते. आळंदी येथील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी या उपोषणाला आपला पाठिंबा देत उल्लेखनीय प्रतिक्रिया नोंदवल्या. उपोषणकर्त्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून मंगळवारी (दि. ५) दुपारी ४ वाजता न. प.मध्ये तातडीची प्रशासकीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला खेड येथील सा. बां. विभागाचे उपअभियंता काटकर, सहा. अभियंता मुरकुटे, वैद्यकीय अधिकारी पांढरे व मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी (दि. ६) सकाळीच खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी आळंदीत येऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर आढावा घेतला. त्यासोबतच आळंदी येथील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, मुख्याधिकारी विनायक औंधकर व आरोग्य उपसंचालक चव्हाण यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी आमदार सुरेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी इमारतीच्या आतील भागातील किरकोळ कामे शिल्लक राहिल्यामुळे त्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या इमारतीतील रुग्णसेवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल. यावर उपोषणकर्त्यांनी लेखी स्वरूपाची मागणी केल्याने मुख्याधिकारी औंधकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर आमदार गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत पाजून उपोषण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मागे घेण्यात आले. अलंकापुरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरीषकुमार कारेकर यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण येळवंडे, बंडुनाना काळे, तुकाराम माने, नाना कातखेडे, उमेश रानवडे यांचा उपोषणकर्त्यांमध्ये समावेश होता. (वार्ताहर)