शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

विवाह नोंदणीला वाटाण्याच्या अक्षदा

By admin | Updated: April 24, 2016 04:28 IST

वर्षभर विवाहांचे मुहूर्त गाजत असताना संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात मात्र गेल्या आर्थिक वर्षात फक्त ४ हजार ३२७ विवाहनोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार १९२ इतकी नोंदणी

पिंपरी : वर्षभर विवाहांचे मुहूर्त गाजत असताना संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात मात्र गेल्या आर्थिक वर्षात फक्त ४ हजार ३२७ विवाहनोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार १९२ इतकी नोंदणी ‘ड’ प्रभागात झाली आहे. विवाहनोंदणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. विवाहबंधनातून एकमेकांची मने जुळली असली, तरी त्याची कागदोपत्रीदेखील नोंद असणे आवश्यक असते.विवाहनोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात क्षेत्रीय कार्यालयांत विवाहनोंदणीचे कामकाज चालते. नागरी सुविधा केंद्रातून अर्ज घेऊन अथवा आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची तपासणी केली जाते. त्यानंतर वधू-वर, पुरोहित, दोन साक्षीदार यांना विवाहनोंदणीसाठी अपॉर्इंटमेंट दिली जाते. ठरवून दिलेल्या दिवशी सर्व मंडळी हजर राहिल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी आणि नोंदणी करून विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र दिले जाते. यापूर्वी विवाहनोंदणीच्या प्रक्रियेबाबत नागरिक अनभिज्ञ होते. कोणती कागदपत्रे लागतात, ती कोठे जमा करायची, प्रमाणपत्राची कोठे आवश्यकता भासते याबाबत सहज माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात दर बुधवारी हे प्रमाणपत्र घेण्यासाठी वधू-वर हजर असल्याचे चित्र दिसते. अजूनही अनेक नागरिकांमध्ये विवाहनोंदणीबाबत जागृती झालेली नाही. नवीन दाम्पत्य असल्यास तातडीने नोंदणी करतात. मात्र, अनेकांना याबाबत माहितीच नाही. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या कामावेळी अडचण निर्माण होते. यासाठी नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. शहरातील जोडप्यांनाही यापूर्वी विवाहनोंदणीसाठी दुय्यम निबंधक अथवा विवाह निबंधक कार्यालयात पुण्यात, पिंपरीत जावे लागायचे. एकाच ठिकाणी ही व्यवस्था असल्याने यंत्रणेवर ताण यायचा. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यासाठी महिनोन् महिन्यांचा कालावधी लागायचा. मात्र, नंतर विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था महापालिका स्तरावर करण्यात आली. सध्या हे कामकाज प्रभाग स्तरावर चालत आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत हे पत्र दिले जाते. (प्रतिनिधी)नोंदणी शुल्क आकारणी विवाहास तीन महिने झाले असल्यास पन्नास रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. त्यानंतर वर्षभरापर्यंत दीडशे रुपये आणि एक वर्षाच्या पुढे अडीचशे रुपये शुल्क आकारले जाते. विवाह नोंदणीबाबत जागृती नाहीअनेक जोडप्यांमध्ये विवाहनोंदणीबाबत जागृती झालेली नाही. अनेकांना याबाबत माहितीच नाही. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या कामावेळी अडचण निर्माण होते.नोंदणीसाठी थांबावे लागते तासन्तासविवाहनोंदणीसाठी बुधवारची अपॉइंटमेंट दिली जाते. नोकरदार व्यक्ती रजा टाकून नोंदणीसाठी हजर राहतात. मात्र, महापालिका मुख्यालयातील बैठका, विविध कामांच्या ठिकाणी भेटी देणे आदी कारणांमुळे क्षेत्रीय अधिकारी वेळेवर कार्यालयात नसतात. त्यामुळे त्यांची वाट पाहत ताटकळावे लागते. यासह अनेकदा सॉफ्टवेअरमध्ये देखील बिघाड असल्याने नोंदणीस उशीर होतो. त्यामुळे अपॉइंटमेंट घेऊनही फायदा होत नाही. ‘ड’ प्रभागात सर्वाधिक नोंदगेल्या वर्षभरात महापालिकेच्या ‘ड’ प्रभागात सर्वाधिक विवाहनोंदणी झाली आहे. या प्रभागात आयटी कंपन्या असल्याने येथे नोकरीसाठी अथवा परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. त्यासाठी विवाहनोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने अनेकांकडून तातडीने नोंदणी करून घेतली जाते.