शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अजित पवारांचे राजकीय कसब पणाला

By admin | Updated: March 18, 2015 22:59 IST

नीरा खोऱ्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांनी वातावरण ढवळून निघाले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ५४ उमेदवार रिंगणात आहेत.

बारामती : नीरा खोऱ्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांनी वातावरण ढवळून निघाले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ५४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये मुख्य लढत राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनल आणि शेतकरी कृती समिती पुरस्कृत सहकार बचाव पॅनलमध्ये होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढवाण यांनी ९ उमेदवारांचे पॅनल आज अचानक जाहीर केले. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत काकडे विरुद्ध पवार गटामध्ये चुरशीची लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोमेश्वर कारखाना १९९२ साली काकडे गटाकडून ताब्यात घेताना अजित पवार यांनी काकडे यांच्यातच सत्तासंघर्ष लावून दिला. प्रमोद काकडे, सतीश काकडे, शहाजी काकडे यांना वेगवेगळ्या वेळी बरोबर घेऊन कारखान्याची सत्ता हस्तगत केली. सोमेश्वर कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. प्रतापगड कारखाना सोमेश्वरने चालविण्यास घेतला. तेव्हापासून विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्प, शैक्षणिक संस्था सुरू करून वेगळा आदर्श निर्माण केलेल्या कारखान्याला आर्थिक घरघर लागली. ऊस दर देताना देखील अडचणी आल्या. गैर व्यवहार प्रकरणे पुढे आली. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे यांनी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीला पहिला धक्का बसला. निवडणुकीच्या सुरुवातीलाच काकडे-पवार यांच्यातील वाक्युद्ध रंगू लागले आहे. शहाजी काकडे यांनी थेट कोणाच्या बाजुने जाण्याचा निर्णय घेतला नसला तरी अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. सोमेश्वरच्या अगोदर माळेगाव कारखान्याची निवडणूक होणार आहे. माळेगाववर वर्चस्व गाजविलेली चंदरराव तावरे, रंजन तावरे ही जोडगोळी पुन्हा एकत्र आली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घरनिहाय ऊस उत्पादकांची माहिती असलेल्या तावरे यांचे आव्हान पेलण्यासाठी अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. उमेदवारी देताना जातीय समीकरणावर भर दिला. त्याचबरोबर तावरे यांच्या बाजुने झुकलेल्या मंडळींच्या घरातीलच काही लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळे कौटुंबिक कलह काही ठिकाणी निर्माण झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची आंदोलने बारामती सलग दोन वर्ष झाली. सत्तास्थानावरच घाव घालण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही उमेदवार रिंगणात राहिले. त्यांना बरोबर घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ९ उमेदवारांचा पॅनल जाहीर केला. सहकार बचाव पॅनलच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला. आम्ही सुचविलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे या ९ जणांना घेऊन स्वतंत्र निवडणूक लढविली जात असल्याचे ढवाण यांनी सांगितले. स्वाभिमानीच्या या ९ उमेदवारांचा त्रास कोणाला होणार, याची चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री पदावर नसताना अजित पवार यांना विरोधकांबरोबरच पक्षातील मंडळींनी आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय कसब या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.४विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली आहे. मात्र, अजित पवार यांना त्यांच्या ताब्यातील कारखाने बिनविरोध करणे शक्य झाले नाही. ४किंबहुना अगदी बारामती सहकारी बँकेची निवडणूक देखील बिनविरोध झाली नाही़ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या बरोबर मागील १५ वर्षांपासून विविध पदांवर काम केलेल्या मंडळींनी नेत्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करून बंडाचा झेंडा उगारला. त्यामुळे सत्तांतरानंतर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या अजित पवार यांच्यावर ‘ताक’ सुद्धा फुंकुन पिण्याची वेळ आली आहे.