शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नीरव मोदीला आळा न घातल्याने तो पळाला - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:13 IST

एक वर्षापूर्वी नीरव मोदीवर धाड टाकली होती तेव्हाच त्याचे गैरव्यवहार उघडकीस आले होते. त्याच वेळी आळा घातला असता, तर आज नीरव मोदी बँकांची फसवणूक करून देशाबाहेर पळाला नसता.

दौैंड/वरवंड (जि. पुणे) : एक वर्षापूर्वी नीरव मोदीवर धाड टाकली होती तेव्हाच त्याचे गैरव्यवहार उघडकीस आले होते. त्याच वेळी आळा घातला असता, तर आज नीरव मोदी बँकांची फसवणूक करून देशाबाहेर पळाला नसता. याला भाजपाचे भ्रष्ट सरकार जबाबदार आहे, असा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल सभेत गुरूवारी केला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी माझा नाद करायचा नाही, असा इशाराही त्यांनी दिला.भाजपा आणि शिवसेनेच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली असून, केवळ जनतेच्या हितासाठी हल्लाबोल आंदोलन करीत आहोत. बापट नेहमी ‘आम्ही काय केले’ म्हणून टीका करीत असतात. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय यांची नव्याने उभारणी तसेच अन्य काही सामाजिक निर्णय आमच्या राजवटीत झाले. तेव्हा गिरीश बापट यांनी विकासाचा फुकटचा आव आणू नये आणि ‘त्यांनी माझा नादच करायचा नाही,’ असे शेवटी पवार म्हणाले.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, की केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली.धनगर, मराठा, मुस्लिम या समाजांचे आरक्षण केवळ देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दिले नाही.संसद चालू देत नाही म्हणून पंतप्रधानांना उपोषण करावेलागते, ही सत्ताधाºयांचीच शोकांतिका आहे.हल्लाबोल यात्रा ही सर्वसामन्यांचे हित धान्यात ठेवून सुरू करण्यात आली आहे़ भाजपा सरकारच्या कारभारामुळे सर्व स्तरातील जनता भरडली जात आहे़या यात्रेच्या निमित्ताने जनतेचे प्रश्न पुढे येत आहेत़ आगामी लोकसभार व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला़

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार