शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आॅनलाइन सेवेमुळे एजंटांनाच अच्छे दिन, नागरिक आणि कर्मचा-यांमध्ये वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 07:14 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) जास्तीत जास्त सुविधा आॅनलाइन करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी आॅनलाइन फॉर्म भरण्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) जास्तीत जास्त सुविधा आॅनलाइन करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी आॅनलाइन फॉर्म भरण्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या असहायतेचा गैरफायदा उचलून एजंटांकडून नागरिकांची लूट केली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले.संगम पूल येथील आरटीओच्या मुख्य कार्यालयास शुक्रवारी ‘लोकमत’च्या टीमने भेट देऊन दिवसभर पाहणी केली. आरटीओ कार्यालयात शिकाऊ व पक्के लायसन्स काढण्यासाठी आॅनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. त्यापाठोपाठ आता आणखी काही सुविधा या केवळ आॅनलाइनच उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचा नागरिकांना मिळणाºया सेवेवर काय परिणाम झाला आहे याचा आढावा या वेळी घेण्यात आला.आॅनलाइन सुविधा उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले असले तरी आरटीओ कार्यालयातील एजंटांचे प्रमाण कमी झालेले नाही, तर उलट वाढत आहे. आरटीओ कार्यालयामध्ये विविध कामांसाठी येणाºया नागरिकांना आजही पूर्वीप्रमाणेच प्रवेशद्वारावरच गराडा घातला जात असल्याचे दिसून आले.आरटीओ लायसन्स, टॅक्स भरणे, वाहन हस्तांतरण आदी सुविधा आॅनलाइन झाल्याची माहिती अजूनही अनेक नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. आरटीओमध्ये आल्यानंतर त्यांना त्याविषयी समजते. त्या वेळी आॅनलाइनची प्रक्रिया ऐकूनच गोंधळून जातात. त्यानंतर एजंटांकडून तुम्हाला सर्व काम करून देऊ असे सांगून पैशाची मागणी केली जाते.लर्निंग लायसन्स काढण्यासाठी एकूण १६५ रुपये शुल्क आहे, मात्र एजंटांकडून त्यासाठी १५०० ते २००० रुपयांची मागणी करण्यात आली. लायसन्स काढण्यासाठी एखादे कागदपत्र कमी असेल तर ते आम्ही काढून देऊ त्याचे जास्तीचे पैसे लागतील असे एजंटांकडून सांगण्यात आले. आॅनलाइन अर्ज करताना नागरिकांकडे डेबिट कार्ड नसल्यास एजंट स्वत:च्या कार्डावरून शुल्क भरून देतो, त्यासाठी मात्र रु. १०० जादा उकळले जातात. लर्निंग लायसन्सच्या आॅनलाइन अपॉइंटमेंटसाठी एक ते दोन महिन्यांची प्रतीक्षायादी आहे, मात्र एजंटकडून ती लवकर मिळवून देऊ असे सांगितले गेले. बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असून त्यामुळे कामकाजात अडथळा व विलंब लागत असल्याचा फलक कार्यालयात लावण्यात आला आहे. मात्र नागरिकांना या सर्व्हर खंडितहोण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावरून नागरिक व कर्मचाºयांमध्ये वाद होत असल्याचेही चित्र पाहायला मिळाले.मुख्य इमारतीमध्ये विविध माहिती फलक लावलेले दिसले. त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे, सेवा हमी कायदा व त्यांतर्गत कोणत्या कामासाठी किती कालावधी, त्यासंदर्भात अपिलीय अधिकारी कोण आहेत, कोणत्या खिडकीत कोणते काम चालते, आदी माहिती दिली आहे. मात्र नागरिकांकडून फलकांवरील माहिती वाचण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले. माहिती वाचून त्यानुसार सेवेचा लाभ घेण्याऐवजी एजंटांकडून काम करून घेण्यावर भर त्यांच्याकडून दिला जात असल्याचेही चित्र पाहायला मिळाले.कार्यालयात आॅनलाइन फॉर्म भरण्याची हवी सुविधाआरटीओ कार्यालयामध्ये आॅनलाइन फॉर्म भरण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्याचाच गैरफायदा एजंटांकडून घेतला जात आहे. आरटीओ कार्यालयात आॅनलाइन फॉर्म भरण्याचे नागरिक सुविधा केंद्र सुरू झाल्यास नागरिकांच्या बहुतांश अडचणी दूर होऊ शकतील, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.टेक्नोसेव्ही असूनहीएजंटांची घ्यावी लागते मदतकाही तरुणांनी लायसन्स काढण्यासाठी आॅनलाइन अपॉइंटमेंट घेतली होती. मात्र परीक्षा देण्यासाठी ते आरटीओमध्ये आले असता त्यांनी एजंटांची मदत घेतली. एजंटांच्या मदतीशिवाय आपण परीक्षा पास होऊ शकणार नाही किंवा आपल्या कागदपत्रांमध्ये काहीतरी त्रुटी काढली जाईल, अशी भीती त्यांना वाटल्याने ते एजंटांवरच अवलंबून राहात असल्याचे चित्र दिसून आले.