शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

आगरकर उपेक्षित समाजसुधारक राहिले : डॉ. राजा दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

पुणे : ज्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप होते, त्या काळात आगरकर सहशिक्षण द्यावे असे म्हणत होते. त्यांचे मोजकेच ...

पुणे : ज्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप होते, त्या काळात आगरकर सहशिक्षण द्यावे असे म्हणत होते. त्यांचे मोजकेच अनुयायी असल्याने आगरकर पंथ निर्माण होऊ शकला नाही. त्या अर्थाने ते उपेक्षित समाजसुधारक राहिले. सुधारकांना अर्धा आगरकरदेखील पचला नाही, हे टिळक यांचे विधान आगरकर यांचे मोठेपणा सांगणारे आहे. ही कादंबरी आगरकरांना वाङ्मयीन न्याय देणारी आहे, असे मत विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी बुधवारी व्यक्त केले.

'सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त 'देशमुख आणि कंपनी'तर्फे प्रकाश पाठक लिखित 'इष्ट तेच बोलणार' या आगरकर यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन डॉ. दीक्षित यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 'साधना' चे संपादक विनोद शिरसाठ आणि प्रकाशक विनय हर्डीकर या वेळी उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, स्त्री हक्कांचे पुरस्कर्ते एवढीच आपल्याला गोपाळ गणेश आगरकर यांची ओळख आहे. पण, राजकीय सुधारणा, साहित्य, संस्कृती आणि आर्थिक विचार प्रभावीपणे मांडणारे आगरकर हे सर्वांगीण सुधारक होते.

शिरसाठ म्हणाले, चरित्रात्मक कादंबरी लेखकांना काही गोष्टी कल्पनेने भराव्या लागतात. अनेकांना चरित्रात्मक कादंबरी आणि चरित्र यातील फरक समजत नाही. त्यामुळे कादंबरीच्या माध्यमातून इतिहासाकडे पाहिले जाते.

हर्डीकर म्हणाले, इतिहासाकडे बघण्याचा वाचकाचा दृष्टिकोन परिपक्व होईल तेव्हा चरित्रात्मक कादंबरी या प्रकाराला न्याय मिळेल. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.

----------------------