शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे?

By admin | Updated: May 30, 2017 02:49 IST

पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर पाणी कपात मागे घेण्याची उपरती सत्ताधाऱ्यांना आली आहे. कपातीसंदर्भात मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचाही पंचनामा महापौर करणार आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. दोन मेपासून ही कपात सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीकपात मागे घेतली आणि पाऊस वेळेवर पडला नाही, तर नियोजन कोसळेल. त्यामुळे पाणीकपात मागे घेणार नाही, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पवना धरणातील साठा ३० टक्क्यांवर आल्यानंतर महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणातील २८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परंतु, अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. चिखली, मोशी, चऱ्होली या समाविष्ट गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावर महापौरांनी टँकरवर चालक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आता जर पाणी कपात मागे घेतली आणि पावसाने ओढ दिली, तर पाण्याचे भीषण संकट ओढावू शकते. त्यामुळे कपात करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळपणाचा तोटा नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी कपात मागे घेण्याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. - नितीन काळजे, महापौर दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांना टँकर लॉबीसाठी टंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी पाणीटंचाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली.