शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे?

By admin | Updated: May 30, 2017 02:49 IST

पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर पाणी कपात मागे घेण्याची उपरती सत्ताधाऱ्यांना आली आहे. कपातीसंदर्भात मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचाही पंचनामा महापौर करणार आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. दोन मेपासून ही कपात सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीकपात मागे घेतली आणि पाऊस वेळेवर पडला नाही, तर नियोजन कोसळेल. त्यामुळे पाणीकपात मागे घेणार नाही, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पवना धरणातील साठा ३० टक्क्यांवर आल्यानंतर महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणातील २८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परंतु, अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. चिखली, मोशी, चऱ्होली या समाविष्ट गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावर महापौरांनी टँकरवर चालक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आता जर पाणी कपात मागे घेतली आणि पावसाने ओढ दिली, तर पाण्याचे भीषण संकट ओढावू शकते. त्यामुळे कपात करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळपणाचा तोटा नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी कपात मागे घेण्याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. - नितीन काळजे, महापौर दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांना टँकर लॉबीसाठी टंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी पाणीटंचाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली.