शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे?

By admin | Updated: May 30, 2017 02:49 IST

पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर पाणी कपात मागे घेण्याची उपरती सत्ताधाऱ्यांना आली आहे. कपातीसंदर्भात मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचाही पंचनामा महापौर करणार आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. दोन मेपासून ही कपात सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीकपात मागे घेतली आणि पाऊस वेळेवर पडला नाही, तर नियोजन कोसळेल. त्यामुळे पाणीकपात मागे घेणार नाही, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पवना धरणातील साठा ३० टक्क्यांवर आल्यानंतर महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणातील २८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परंतु, अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. चिखली, मोशी, चऱ्होली या समाविष्ट गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावर महापौरांनी टँकरवर चालक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आता जर पाणी कपात मागे घेतली आणि पावसाने ओढ दिली, तर पाण्याचे भीषण संकट ओढावू शकते. त्यामुळे कपात करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळपणाचा तोटा नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी कपात मागे घेण्याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. - नितीन काळजे, महापौर दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांना टँकर लॉबीसाठी टंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी पाणीटंचाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली.