शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर समाजाने स्वीकारले : ज्ञानदेव कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:09 IST

-- इंदापूर : तृतीयपंथी म्हणून समाजात वावरत असताना, अनेकांनी नावे ठेवली. समाजापेक्षा जास्त नातलगांनी वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली. मात्र ...

--

इंदापूर : तृतीयपंथी म्हणून समाजात वावरत असताना, अनेकांनी नावे ठेवली. समाजापेक्षा जास्त नातलगांनी वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली. मात्र आयुष्यातील प्रत्येक अडचणीशी धैर्याने व हिंमतीने दोन हात करून मात केली. पहिला तृतीयपंथी सरपंच म्हणून निवडून आलो. कर्तृत्व सिद्ध केले तेव्हा मला समाजाने स्वीकारले, अशी भावना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावचे सरपंच ज्ञानदेव ऊर्फ माऊली कांबळे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य क्रांतिसूर्य सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावंत यांनी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील रत्नपुरी येथे पार पडला. यावेळी विविध मान्यवर पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी ज्ञानदेव कांबळे बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य क्रांतिसूर्य सामजिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार २०२१ मध्ये क्रांतिसूर्य आरोग्य संजीवनी पुरस्कार डॉ. पोपट कुंभार यांना शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रांतिसूर्य सामजिक संघटना, समाजात समता निर्माण करण्यासाठी अग्रगण्य आहे असे मत डॉ. कुंभार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राचा क्रांतिसूर्य पुरस्कार, प्रसिद्ध मानवाधिकारतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांना देण्यात आला, तर आदर्श सरपंच शशिकला बाबर (डिकसळ, सांगोला), आदर्श शिक्षक प्रा. बाळासाहेब सर्वगोड (वालचंदनगर), प्रा. राहुल वाघमारे (पुणे), क्रांतिसूर्य समाजरत्न पुरस्कार रत्नाकर मखरे (इंदापूर), किशोर ददारे ( पंढरपूर), नितीन वाघमारे ( सांगोला ), राहुल खरात (नाशिक), डॉ. रघुनाथ जोगदंड ( अंबेजोगाई), क्रांतिसूर्य समाजभूषण पुरस्कार सागर बाबा मिसाळ (जंक्शन ), प्रविण शिंदे ( पुणे ), सरपंच ज्ञानदेव (माऊली) शंकर कांबळे (तरंगफळ, माळशिरस) यांना देण्यात आला.

तर महिला समाजरत्न पुरस्कार ज्योती अदाटे ( सांगली ), जयश्री झिंगळे ( सोलापूर), क्रांतिसूर्य कविरत्न पुरस्कार सुनिल साबळे ( वालचंदनगर ), कलारत्न पुरस्कार प्रियंका काळे, गणेश वसव, ( सातारा ), गजानन गडकर ( अभिनेते ) यांना देण्यात आला तर आदर्श पत्रकार म्हणून सागर शिंदे ( इंदापूर ) यांना पुरस्कार यांना देण्यात आला.

--

फोटो क्रमांक : २९ इंदापूर पुरस्कार वितरण

फोटो ओळ : महाराष्ट्र राज्य क्रांतिसूर्य सामजिक संघटनेच्या वतीने सरपंच ज्ञानदेव ( माऊली ) कांबळे यांना पुरस्कार देताना पदाधिकारी.