शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

चार पिढ्यानंतर आलं दारात पाणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 20:54 IST

पुण्यापासून साधारण ८० किलोमीटर अंतरावरील वेल्हे तालुक्यातील पोळे या दुर्गम भागामधील धनगरांची वस्ती असलेले गाव आहे.

ठळक मुद्देवेल्हा तालुक्यातील दुर्गभ भागात पाण्यासाठी व्हायची पायपीट 

पुणे : ''चार पिढ्यानंतर आता आमच्या दारात पाणी आलंय, नाय तर त्या डोंगराहून पाणी आणावं लागायचं बाबा ! आमी कसं बी पालापाचोळा खाऊ पण पाण्याचं काय करणार बा ! उन्हा-तान्हाचं आम्हाला किती तरी मैल पाण्यासाठी हिडावं लागायचं. पण आता दारात पाणी पाहून लय आनंद व्हतंय बाबा !'' या भावना आहेत सुलाबाई ढेबे यांच्या. 

पुण्यापासून साधारण ८० किलोमीटर अंतरावरील वेल्हे तालुक्यातील पोळे या दुर्गम भागामधील धनगरांची वस्ती असलेले गाव आहे. धनगर समाजातील अनेक घरे इथे आहेत. गेल्या अनेक वषार्पासून हे लोक या ठिकाणी ते राहत आहेत. गेले अनेक वर्षे पाण्यासाठी रोज दोन ते तीन किलोमीटर अंतर डोंगरात पायपीट करून धनगर लोक घरात पाणी आणतात. तसेच पाणी नाही म्हणून नाईलाजाने  तरूण वर्गास वस्ती सोडून शहराकडे कामाचा शोधात जावे लागत आहे.  पाण्याच्या अभावी दुभती जनावरेही दूध देईनाशी झाली. इथे एका उंच डोंगराळ भागात एक जीवंत  झरे असलेले मोठे टाके आहे. या भागातून  डोंगरात  जाऊन  पाणी आणायचे म्हणजे खूप जिकिरीचे काम आहे. ही सर्व स्थिती टेलस  आॅर्गनायझेशन संस्थेचे लोकेश बापट व जान्हवी  बापट यांनी पाहिली. तेथे प्रत्यक्ष जाऊन या लोकांच्या घरापर्यंत पाणी कसे आणता येईल, ते पाहिले.  टेलस ऑर्गनायझेशन व देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे यांच्या एकत्रितपणे येथे पाईप लाईन व पाण्याच्या टाक्या सुलाबाई रामचंद्र ढेबे,  रामभाऊ ढेबे यांच्या घराच्या अंगणात पाण्याची व्यवस्था करून दिली. 

वेल्हा तालुक्यात काही कामानिमित्त मी माझ्या गाडीने जात होतो. तेव्हा एका आजीबाई मला रस्त्यातून चालताना दिसल्या. त्या दळण करण्यासाठी पायपीट करत होत्या. त्यानंतर त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या अनेक समस्या उलगडल्या. त्यात पाण्याची समस्या गंभीर असल्याचे समोर आले. डोंगरावरून पाणी आणावे लागत असल्याचे पाहिले. त्यामुळे त्यांच्यासाठी २६०० फूटांची पाइपलाइन टाकून त्यांच्या दारात पाणी आणले. - लोकेश बापट, टेल्स ऑर्गनायझेशन संस्था 

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही डोंगरावरील टाकवेतून पाणी आणतोय. तिथं जीवंत झरा असल्याने बारामाही पाणी असते. त्यामुळे आमच्या जगण्यासाठी ते टाकवे हेच आवश्यक बनले आहे. कारण इतर कुठेही पाणी नाही. परंतु, आता पाइपलाइन झाल्याने आम्हाला डोंगरावर जाऊन पाणी आणावे लागणार नाही. - रामभाऊ ढेबे, ग्रामस्थ, पोळे गाव 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीdroughtदुष्काळ